शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भिवंडी-वाडा रोडच्या दुरुस्तीसाठी श्रमजीवीचा एल्गार; महामार्ग तब्बल तीन तास रोखला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:43 IST

Wada-Bhiwandi highway: अंबाडी नाक्यासह पूर्ण महामार्गावर १३ ठिकाणी श्रमजीवी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करीत तब्बल ३ तास रस्ता रोखून धरला होता.

- नितिन पंडीत

भिवंडी - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी व बेजबाबदार कामामुळे भिवंडी वाडा मनोर महामार्ग खड्ड्यात गेला आहे. या विरोधात मंगळवारी श्रमजीवी संघटनेने दणका दिला. अंबाडी नाक्यासह पूर्ण महामार्गावर १३ ठिकाणी श्रमजीवी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करीत तब्बल ३ तास रस्ता रोखून धरला होता. दोन वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटनेचे युवा नेते प्रमोद पवार यांनी डॉ.नेहा शेख यांच्या अपघाती मृत्यूनंतर टोल नाका तातडीने बंद पाडला होता. त्यानंतर या रस्त्याची पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. मात्र नेहमीच ठेकेदार पोसणाऱ्या या विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून फक्त अपहार केला असल्याने या रस्त्याची पुरता दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांसह वाहन चालकांना जीव मुठीत धरून या महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

 मंगळवारी श्रमजीवी संघटनेने दिलेक्या दणक्याने पूर्ण जिल्हा हादरून गेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत. .भिवंडी तालुक्यातील कवाड,अनगाव, पालखणे,वारेट, दुगाड,अंबाडी, दिघाशी फाटा यांसह वाडा तालुक्यातील प्रमुख ठिकाणी असे तब्बल तेरा ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.

अंबाडी नाक्यावर प्रमोद पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी भर पावसात भिजून ३ तास महामार्ग रोखला होता.  श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा,कार्याध्यक्ष स्नेहा दुबे, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड,अशोक सापटे,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार आदी श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी भेटी देत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बळ वाढविले.

टॅग्स :bhiwandiभिवंडीhighwayमहामार्ग