शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचे स्वच्छतेचे उपक्रम दिखाऊ, नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:40 IST

स्वच्छता अभियानाची नगरसेवकांनी महासभेत पोलखोल करून उपक्रम दिखाऊ असल्याचा आरोप केला. शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत असून केंद्राच्या स्वच्छता पथकाने कौतुक केल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

उल्हासनगर : स्वच्छता अभियानाची नगरसेवकांनी महासभेत पोलखोल करून उपक्रम दिखाऊ असल्याचा आरोप केला. शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत असून केंद्राच्या स्वच्छता पथकाने कौतुक केल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.उल्हासनगर महापालिकेने स्वच्छता मोहिमेंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. उपायुक्त संतोष देहरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी, स्वच्छता निरीक्षकासह मुकादम, कर्मचारी आदींनी स्वच्छता मोहिमेंतर्गत भाग घेतला.बुधवारी दुपारी विकास आराखड्याची महासभा संपल्यानंतर शहर स्वच्छ व सुंदर झाल्याची माहिती थेट प्रक्षेपणाद्वारे आयुक्तांनी महासभा सभागृहात नगरसेवकांना दिली. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी शहरातील प्रत्येक चौकात व विविध ठिकाणी कचºयाचे निळे व हिरवे डबे लोखंडी खांबाला लावले आहेत. तसेच वर्गीकरणाबाबत पालिकेने जनजागृती सुरू केली आहे.मागील आठवड्यात स्वच्छता अभियानातील महापालिकेची प्रगती व सर्वेक्षण करण्यासाठी केंद्राचे पथक आले होते. त्यांनी दोन दिवस शहराचे सर्वेक्षण केल्यावर पालिकेच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले, रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव, भारिपच्या गटनेत्या कविता बागुल आदींनी पालिकेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोलकेली.महापालिका मुख्यालयातील स्वच्छतागृहांना सेफ्टी टँक नसून सफाई कामगार हाताने मैला उचलतात. शहरातील इतर स्वच्छतागृहांची हीच परिस्थिती असल्याची टीका शिवसेनेच्या चौधरी यांनी केली. एकूणच पालिकेत सुरळीत व्यवहार होत नसल्याचेच दिसून येत आहे.नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढाशहराला पाणीपुरवठा करणाºया जलकुंभाला गळती लागली असून त्याच्या दुरुस्तीसाठी सहा महिन्यांपासून पाठपुरावा केला.मात्र, आजपर्यंत जलकुंभाची दुरुस्ती केली नसून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याची टीका नगरसेवक भगवान भालेराव यांनी केली.भाजपाच्या अर्चना करनकाळे, साई पक्षाच्या सविता तोरणे-रगडे यांच्यासह शिवसेना, भारिप, पीआरपी, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखवला.शहराची वाटचाल स्वच्छतेकडेमहापालिकेने स्वच्छता अभियानाखाली विविध उपक्रम शहरात राबवले असून ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण हाती घेतले आहे.तसेच अनेक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून तीन हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे नागरिकांना बांधून दिली.तसेच स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबवत आहे. कधी नव्हे शून्य कचरा संकल्पना खºया अर्थाने अस्तित्वात येत आहे.तसेच देशातील स्वच्छता अभियानात ५० शहरांमध्ये उल्हासनगरचा समावेश असेल, असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर