शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस

By अजित मांडके | Updated: May 5, 2023 17:49 IST

महापालिका आयुक्तांनी उचलले पाऊल, कळव्यातील अनाधिकृत बांधकाम प्रकरण

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत जयभरात मैदानाच्या शेजारी असलेली आठ मजली अनाधिकृत इमारत ही अवघ्या चार महिन्यात उभी राहिली असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतरही कळवा प्रभाग समितीकडून या इमारतीवर कारवाई न झाल्याने तसेच कळव्यात वाढत असलेल्या अनाधिकृत बांधकामांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणी त्यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये या बाबतचा खुलासा तीन दिवसात करण्यात यावा असेही त्यांनी यात नमुद केले आहे.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात आजही अनाधिकृत बांधकामांचे इमले उभारले जात असल्याचे दिसून आले आहे. अनाधिकृत बांधकामांच्या विरोधात वारंवार तक्रारी केल्यानंतरही केवळ धातुरमातुर कारवाई होत असल्याचेही दिसून आले आहे. जय भारत मैदानाशेजारी आठ मजली अनधिकृत इमारतींचे काम सुरु असून सात मजल्यांपर्यंत ही इमारत तयार देखील झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार महिन्यात ही अनधिकृत इमारत उभी करण्यात आली आहे. त्यातही या इमारतीवर पालिकेने यापूर्वी देखील कारवाईचा दिखावा केला होता. परंतु त्यानंतरही ही इमारत पुन्हा उभी राहिल्याचे दिसून आले आहे.  मात्र एकदा कारवाई होऊनही तसेच यासंदभार्तील वृत्त प्रसिद्ध होऊनही निर्ढावलेल्या स्थानिक विकासांकडून अनधिकृत इमले चढवणे सुरूच असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे केवळ थातुर मातुर कारवाई करण्यापेक्षा इमारत अनधिकृत आहे हे माहित असून प्रशासनाकडून इमारत जमीनदोस्त केली जात नसल्याने नेमके प्रशासन कोणाच्या दबावाखाली कारवाई करत नाही अशी साशंकता निर्माण झाली आहे.

दरम्यान या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या कळवा प्रभाग समितीत कांदळवन क्षेत्रात भराव टाकून अनाधिकृत बांधकाम केले जात असल्याच्या तक्रारी आल्याचेही या नोटीसीत आयुक्तांनी म्हंटले आहे. परंतु या बांधकामांवर वेळीच कारवाई न झाल्याने तथा दिखाऊ व जुजबी कारवाई होत असल्याने अप्रत्यक्षरित्या आपण अनाधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून आपणा विरोधात शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करु नये असा सवाल उपस्थित करीत तीन दिवसात याचा खुलासा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. खुलासा केला गेला नाही तर शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई केली जाईल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

अनाधिकृत बांधकामांना संरक्षण देणाºया सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, समीर जाधव आणि विद्यमान सुबोध ठाणेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने पुन्हा एकदा उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे संजय घाडीगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे