शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

बायोगॅस प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी, डोंबिवलीतील राजूनगरमधील रहिवासी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:10 IST

पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.

डोंबिवली  - पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. रविवारी परिसरातील महिला, पुरुष यांनी एकत्र येत प्रकल्पाच्या ठिकाणी त्याविरोधात घोषणाबाजी व निदर्शने केली. उद्यानासाठी भूखंड आरक्षित होता, मग ती जागा बायोगॅससाठी कशी दिली, असा सवाल करत तो अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी त्यांनी केली.गणेशनगरपुढील राजूनगर येथे बायोगॅस प्रकल्प उभारला जात आहे. त्यात कचऱ्यापासून बायोगॅस तयार केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील पांडुरंग टॉवर, राजवैभव कॉम्प्लेक्स, अमर आॅर्चिड, द्वारका सोसायटी, ओम गणपती सोसायटी, हापसीबाबा सोसायटी, आनंद प्रभा सोसायटी, साईपद्म सोसायटी, श्रीसाई दीप सोसायटी, राजवैभव एनएक्स आदी सोसायट्यांतील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.महापालिकेने रहिवाशांच्या विरोधाकडे गांभीर्याने बघावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी बायोगॅस प्रकल्पविरोधी कृती समितीचे सदस्य विनोद सोनावणे यांनी दिला. ते म्हणाले की, स्थानिक नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे या नागरिकांसोबत आहेत. त्या अनेक इमारतींच्या मधोमध हा प्रकल्प आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच कचऱ्याची दुर्गंधी पसरून डास, उंदीर, घुशी, झुरळ, मुंग्या यांचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळेही नागरिकांना विशेषत: लहान मुलांना याचा त्रास होऊ शकतो. याच ठिकाणाहून काही अंतरावर महापालिकेचे दोन जलकुंभ आहेत. त्यालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणीही रहिवाशांनी केली. बायोगॅसमुळे निर्माण होणाºया गॅसच्या साठ्याचा कधी स्फोट झाला, तर नागरिकांच्या जीवाचे काय? महापालिका या बाबी गांभीर्याने का घेत नाही, असा सवालही त्यांनी केला.दरम्यान, निदर्शनाच्या वेळी व्यंकटेश गायकवाड, जितू देशमुख, आत्माराम मोरे, सुहास देशमुख, भूषण पांडे, मनीष शिंदे, सचिन गायकवाड, प्रफुल्ल गिरी आदी उपस्थित होते.प्रकल्प खाडीकिनारी हलवणे योग्यमहापालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, हा प्रकल्प राजूनगरमध्ये होऊ नये. तेथे उद्यान व्हावे. बायोगॅसचा प्रकल्प खाडीकिनारी अन्यत्र स्थलांतरित करता येऊ शकतो.त्यामुळे त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा. आम्ही मात्र नागरिकांसमवेतच आहोत, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले.बायोगॅस प्रकल्पापासून नागरिकांना कोणताही अपाय नाही. बीएआरसीच्या निसर्ग रूमअंतर्गत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पश्चिमेत दररोज ८० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यापैकी या प्रकल्पात केवळ १० मेट्रिक टन कचºयापासून बायोगॅस बनवला जाणार आहे. आयरे गावातील प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तो नागरिकांनी आवर्जून बघावा.- घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता,घनकचरा निर्मूलन विभाग, केडीएमसी 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे