शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बायोगॅस प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी, डोंबिवलीतील राजूनगरमधील रहिवासी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:10 IST

पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.

डोंबिवली  - पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. रविवारी परिसरातील महिला, पुरुष यांनी एकत्र येत प्रकल्पाच्या ठिकाणी त्याविरोधात घोषणाबाजी व निदर्शने केली. उद्यानासाठी भूखंड आरक्षित होता, मग ती जागा बायोगॅससाठी कशी दिली, असा सवाल करत तो अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी त्यांनी केली.गणेशनगरपुढील राजूनगर येथे बायोगॅस प्रकल्प उभारला जात आहे. त्यात कचऱ्यापासून बायोगॅस तयार केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील पांडुरंग टॉवर, राजवैभव कॉम्प्लेक्स, अमर आॅर्चिड, द्वारका सोसायटी, ओम गणपती सोसायटी, हापसीबाबा सोसायटी, आनंद प्रभा सोसायटी, साईपद्म सोसायटी, श्रीसाई दीप सोसायटी, राजवैभव एनएक्स आदी सोसायट्यांतील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.महापालिकेने रहिवाशांच्या विरोधाकडे गांभीर्याने बघावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी बायोगॅस प्रकल्पविरोधी कृती समितीचे सदस्य विनोद सोनावणे यांनी दिला. ते म्हणाले की, स्थानिक नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे या नागरिकांसोबत आहेत. त्या अनेक इमारतींच्या मधोमध हा प्रकल्प आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच कचऱ्याची दुर्गंधी पसरून डास, उंदीर, घुशी, झुरळ, मुंग्या यांचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळेही नागरिकांना विशेषत: लहान मुलांना याचा त्रास होऊ शकतो. याच ठिकाणाहून काही अंतरावर महापालिकेचे दोन जलकुंभ आहेत. त्यालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणीही रहिवाशांनी केली. बायोगॅसमुळे निर्माण होणाºया गॅसच्या साठ्याचा कधी स्फोट झाला, तर नागरिकांच्या जीवाचे काय? महापालिका या बाबी गांभीर्याने का घेत नाही, असा सवालही त्यांनी केला.दरम्यान, निदर्शनाच्या वेळी व्यंकटेश गायकवाड, जितू देशमुख, आत्माराम मोरे, सुहास देशमुख, भूषण पांडे, मनीष शिंदे, सचिन गायकवाड, प्रफुल्ल गिरी आदी उपस्थित होते.प्रकल्प खाडीकिनारी हलवणे योग्यमहापालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, हा प्रकल्प राजूनगरमध्ये होऊ नये. तेथे उद्यान व्हावे. बायोगॅसचा प्रकल्प खाडीकिनारी अन्यत्र स्थलांतरित करता येऊ शकतो.त्यामुळे त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा. आम्ही मात्र नागरिकांसमवेतच आहोत, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले.बायोगॅस प्रकल्पापासून नागरिकांना कोणताही अपाय नाही. बीएआरसीच्या निसर्ग रूमअंतर्गत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पश्चिमेत दररोज ८० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यापैकी या प्रकल्पात केवळ १० मेट्रिक टन कचºयापासून बायोगॅस बनवला जाणार आहे. आयरे गावातील प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तो नागरिकांनी आवर्जून बघावा.- घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता,घनकचरा निर्मूलन विभाग, केडीएमसी 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे