शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

बायोगॅस प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी, डोंबिवलीतील राजूनगरमधील रहिवासी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:10 IST

पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.

डोंबिवली  - पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. रविवारी परिसरातील महिला, पुरुष यांनी एकत्र येत प्रकल्पाच्या ठिकाणी त्याविरोधात घोषणाबाजी व निदर्शने केली. उद्यानासाठी भूखंड आरक्षित होता, मग ती जागा बायोगॅससाठी कशी दिली, असा सवाल करत तो अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी त्यांनी केली.गणेशनगरपुढील राजूनगर येथे बायोगॅस प्रकल्प उभारला जात आहे. त्यात कचऱ्यापासून बायोगॅस तयार केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील पांडुरंग टॉवर, राजवैभव कॉम्प्लेक्स, अमर आॅर्चिड, द्वारका सोसायटी, ओम गणपती सोसायटी, हापसीबाबा सोसायटी, आनंद प्रभा सोसायटी, साईपद्म सोसायटी, श्रीसाई दीप सोसायटी, राजवैभव एनएक्स आदी सोसायट्यांतील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.महापालिकेने रहिवाशांच्या विरोधाकडे गांभीर्याने बघावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी बायोगॅस प्रकल्पविरोधी कृती समितीचे सदस्य विनोद सोनावणे यांनी दिला. ते म्हणाले की, स्थानिक नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे या नागरिकांसोबत आहेत. त्या अनेक इमारतींच्या मधोमध हा प्रकल्प आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच कचऱ्याची दुर्गंधी पसरून डास, उंदीर, घुशी, झुरळ, मुंग्या यांचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळेही नागरिकांना विशेषत: लहान मुलांना याचा त्रास होऊ शकतो. याच ठिकाणाहून काही अंतरावर महापालिकेचे दोन जलकुंभ आहेत. त्यालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणीही रहिवाशांनी केली. बायोगॅसमुळे निर्माण होणाºया गॅसच्या साठ्याचा कधी स्फोट झाला, तर नागरिकांच्या जीवाचे काय? महापालिका या बाबी गांभीर्याने का घेत नाही, असा सवालही त्यांनी केला.दरम्यान, निदर्शनाच्या वेळी व्यंकटेश गायकवाड, जितू देशमुख, आत्माराम मोरे, सुहास देशमुख, भूषण पांडे, मनीष शिंदे, सचिन गायकवाड, प्रफुल्ल गिरी आदी उपस्थित होते.प्रकल्प खाडीकिनारी हलवणे योग्यमहापालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, हा प्रकल्प राजूनगरमध्ये होऊ नये. तेथे उद्यान व्हावे. बायोगॅसचा प्रकल्प खाडीकिनारी अन्यत्र स्थलांतरित करता येऊ शकतो.त्यामुळे त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा. आम्ही मात्र नागरिकांसमवेतच आहोत, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले.बायोगॅस प्रकल्पापासून नागरिकांना कोणताही अपाय नाही. बीएआरसीच्या निसर्ग रूमअंतर्गत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पश्चिमेत दररोज ८० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यापैकी या प्रकल्पात केवळ १० मेट्रिक टन कचºयापासून बायोगॅस बनवला जाणार आहे. आयरे गावातील प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तो नागरिकांनी आवर्जून बघावा.- घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता,घनकचरा निर्मूलन विभाग, केडीएमसी 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे