शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नवलेखकांनी लिखाणाचा गांभीर्याने विचार करावा - सुनील कर्णिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:23 IST

नवीन लेखकांना आपणच ग्रेटच लिहितो असे वाटत असते. त्यांनी आपल्या लेखनाकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे.

ठाणे : नवीन लेखकांना आपणच ग्रेटच लिहितो असे वाटत असते. त्यांनी आपल्या लेखनाकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. संशोधन करण्यासाठी लागणारी चिकाटी, जिद्द ही पूर्वीच्या अभ्यासकांपेक्षा आजच्या काळातील अभ्यासकांकडे कमी पडत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक सुनील कर्णिक यांनी व्यक्त केले.कोमसाप, ठाणे शहर शाखा व जवाहर वाचनालय कळवा याच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पाचवा वाचकमंच जवाहर वाचनालय कळवा कै. शिवराम पाटील सभागृहात झाला. प्रा. दीपा ठाणेकर यांनी कर्णिक यांची मुलाखत घेतली. यावेळी कर्णिक म्हणाले की, महाराष्ट्राबाहेरही मराठी साहित्य विषयक घडामोडी चालू असतात, त्यात मराठी मधील किती साहित्य अनुवादित झाले हे पाहणे फार गरजेचे आहे. तशा प्रकारचे काम मला करायला मिळत आहे त्याचा आनंदच आहे. लेखकांनी कोणत्या काळात काय लिहावे हे आपण ठरवू शकत नाही, त्यांना जे आणि जसे व्यक्त व्हायचे तसे ते होतात. मात्र, वाचन कला, काव्य, साहित्य यांचा मिलाफ असलेला हा वाचकमंच अभिरु चि संपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतो, असे त्यांनी सांगितले. कोमसापच्या अध्यक्षा मेघना साने यांनी प्रास्ताविक केले.यामिनी पानगावकर यांनी ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीतील गूढाचा वेध आणि भेद किती परिणामकारकपणे करतेय, हे कुतूहल रसिकांच्या मनात उत्पन्न केले. मीना बर्दापूरकर यांनी गिरीश कुबेर यांच्या ‘एका तेलिया’ने कथेची दमदार सुरु वात केली. आरती कुलकर्णी यांनी भारती मेहता लिखित ‘मन पाखरू’चे अत्यंत मनस्वी विश्लेषण केले आणि कादंबरीतील संस्कारक्षम जग भावले. मयुरी कदम यांनी सुभाष भेंडे लिखित ‘अंधारवाटा’ कादंबरीतील कथेत पात्रांच्या जीवनात होणारी मुल्यांची घसरण व त्यामुळे पुढे येणारा अंधार याचे चित्र रंगविले.वैशाली राजे या शिक्षिकेने सुमती क्षेत्रमाडे लिखित ‘महाश्वेता’ या कादंबरीचे महत्त्व सांगून कोड असलेल्या व्यक्तींना रोगी न समजण्याचा कादंबरीतील संदेश समजावून सांगितला.

टॅग्स :thaneठाणे