शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बेरोजगार तरुणांनी थाटली दुकाने, रिक्षा, ट्रकचालकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 02:58 IST

लॉकडाऊनचा फटका : कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; रिक्षा, ट्रकचालकांची उपासमार

शशिकांत ठाकूर ।कासा : कोरोनाच्या काळात लोकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हॉटेल व्यवसाय, कपडा व्यवसाय, सलून दुकाने यांना फटका बसला आहे. रिक्षा, ट्रकचालक, प्रवासी वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंबाच्या पोटाची भूक भागवण्यासाठी अनेकांनी चारोटी नाक्याजवळ डहाणू-नाशिक मार्गावर घरगुती उपयोगाची प्लास्टीकच्या वस्तूंची दुकाने थाटली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानांत नागरिकही खरेदी करताना दिसत आहेत.

हॉटेलमधील वेटर व स्वयंपाकी, कपडा व्यावसायिकांकडे काम करणारे नोकर, सफाई कामगार, सुरक्षारक्षक यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. परराज्यातील अनेक कामगार गावी गेले आहेत; मात्र स्थानिक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे बिकट परिस्थिती झाली आहे. लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय-धंदे बंद झाल्यामुळे कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. शहरात सर्वच बंद असल्यामुळे दुकानाचे भाडे कसे भरायचे याचीही चिंता व्यवसाय करणाऱ्यांना भेडसावत होती. अखेर, यावर उपाय शोधताना रस्त्यावर प्लास्टीकच्या संसारउपयोगी वस्तू विकण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. त्यामुळे चारोटी नाक्याजवळ डहाणू-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजंूना दुकाने थाटून प्लास्टीकच्या वस्तूविक्रीचे व्यवसाय सुरू केले आहेत.एका प्लास्टीक विक्रेत्या दुकानदाराने सांगितले की, सर्व वस्तू आम्ही वापी, गुजरात येथील मोठ्या व्यापाºयांकडून आणतो. काही पैसे भरल्यावर उधार माल आणतो. विक्री झाल्यानंतर उर्वरित पैसे भरतो. पूर्वी आम्ही डोक्यावर, मोटारसायकल, रिक्षामधून खेडोपाडी स्वत: जाऊन विकायचो; पण कोरोनामुळे सगळीकडे गावबंदी आहे. त्यामुळे आमच्यासमोर जगायचे कसे, असा प्रश्न होता. त्यामुळे रस्त्याच्या बाजूस दुकान मांडून व्यवसाय करीत आहोत.आणखी काही दुकानदारांनी सांगितले की, या ठिकाणी मोठी रहदारी असते. दररोज जवळपास ५० ते ६० गावांतील नागरिक या रस्त्याने डहाणू, नाशिक, गुजरात, मुंबईकडे ये-जा करतात. त्यामुळे चांगला व्यवसाय होतो. येथे जवळपास आम्ही झोपडी उभारून राहत आहोत. येथे जागेचे भाडे, वीजबिल भरायचे नाही आणि हा प्लास्टीकचा माल नाशिवंतही नाही. यात मोठमोठ्या कोठ्या, बादली, टब, सूप, चटई, चिमटे, घरगुती वापरायच्या सर्व प्रकारच्या वस्तू विकत असतो.प्लास्टीकच्या नवनवीन विविध आकर्षक वस्तू असल्याने गिºहाईक विकत घेत आहेत. नाशिवंत माल नसल्याने नुकसान होत नाही. त्यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटतो.- रमेश गवळी,दुकानदारसध्या शहरात खरेदी करण्यासाठी जायची भीती वाटते. त्यात नेहमी घरगुती उपयोगी पडणाºया वस्तू असल्याने आम्ही खरेदी करीत आहोत.- सुनीता पाटील,ग्राहक 

टॅग्स :thaneठाणे