शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

ठाण्यात दुकाने, पेट्रोलपंप, मॉल यांनी पाळला उत्स्फूर्तपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 02:37 IST

महागाईच्या विरोधात सोमवारी काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ठाणे : महागाईच्या विरोधात सोमवारी काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुकाने, पेट्रोलपंप, मॉल बंद होते. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक एक तास रोखून धरली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी व मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभर सुरळीत सुरू होती. काँग्रेस आणि मनसे नेते व कार्यकर्त्यांनी पायी चालून भाजपाचा निषेध केला, तर राष्टÑवादीने बैलगाडी, हातगाडी घेऊन पूर्व द्रुतगती मार्गावर उतरून आंदोलन केले.काँग्रेस, मनसे आणि राष्टÑवादीने एकत्र येऊन रॅली काढली. काँग्रेस आणि मनसेचे पदाधिकारी पायी, तर आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आदींसह पदाधिकारी बैलगाडी आणि घोडागाडी घेऊन आंदोलनात सहभागी झाले. पाचपाखाडी ते तीनहातनाक्यापर्यंतच्या या रॅलीमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक मंदावली होती. नितीन कंपनी व तीनहातनाका येथे या आंदोलकांनी ठिय्या मारून आंदोलन केले.>४५४ जणांवर कारवाईशहरातून बेकायदेशीरपणे रॅली काढल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, मनोज शिंदे आणि अविनाश जाधव यांच्यासह ५३ जणांना नौपाडा पोलिसांनी अटक करून जामिनावर सुटका केली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात बंदपूर्वी आणि त्या काळात ४५४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.वाढत्या महागाईविरोधात हे आंदोलन होते. पेट्रोल डिझेल, गॅसचे दर वाढले असून त्याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे. त्याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी या बंदमध्ये आम्ही सहभागी झालो.- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्टÑवादी

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदthaneठाणे