शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

मासिक पाळीच्या रक्तस्त्रावावरुन संशय; सख्ख्या भावाने चार दिवस मारले, १२ वर्षीय बहिणीचा मृत्यू

By सदानंद नाईक | Updated: May 9, 2023 10:58 IST

कॅम्प नं-३ मध्ये राहणाऱ्या १२ वर्षाच्या बहिणीला संशयातून सतत चार दिवस भावाने लोखंडी सळईने सर्वांगावर मारहाण केल्याने बहिणीचा मृत्यू झाला.

उल्हासनगर: कॅम्प नं-३ मध्ये राहणाऱ्या १२ वर्षाच्या बहिणीला संशयातून सतत चार दिवस भावाने लोखंडी सळईने सर्वांगावर मारहाण केल्याने बहिणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी भावाला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, १२ मे पर्यंत भावाला पोलीस कस्टडी देण्यात आली. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात भाऊ व वहिनी सोबत राहणाऱ्या १२ वर्षीय बहिणीच्या गुप्तांगातून रक्त जाते. यासंशयावरून सतत चार दिवसांपासून लोखंडी सळई, लाथा बुक्क्या, लोखंडी काठीने मारहाण केली. सततची मारहाण व उपाशी असल्याने, रविवारी ती बेशुद्ध झाली. बहीण बेशुद्ध झाल्याने, घाबरलेल्या भावाने बहिणीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले. मृत मुलीच्या अंगभर मारहाणीचे वळ असल्याची माहिती डॉक्टरांनी मध्यवर्ती पोलिसांना दिल्यावर, पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलीच्या मृत्यू बाबत भावाला विचारपूस केली असता, मारहाण केल्याची कबुली दिली. 

अल्पवयीन १२ वर्षाच्या बहिणीच्या गुप्तांगातून रक्त येत असल्याची माहिती भावाला मिळाल्यावर, त्याने याबाबत बहिणीकडे विचारपूस केली. मात्र तीला याबाबत निश्चित सांगता न आल्याने, भावाने तिला संशयातून सतत चार दिवस मारहाण केली. पाणी अन्न विना असलेली बहीण मारहाणीत बेशुद्ध झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला असावा. असे मत मध्यवर्ती रुग्णालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले. प्रत्यक्षात मुलीला मासिक पाळी आल्याने, गुप्तांगातून रक्त येत होते. मात्र तिला भावाला निश्चित सांगता न आल्याने, तसेच भावाने कोणताच विचार न करता संशय घेऊन सतत मारहाण केल्याने, तिचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेश येथे राहणाऱ्या मृत मुलीच्या आई-वडिलांना याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी निघाल्याचे पोलीस अधिकारी कड यांनी सांगितले. भावाच्या संशयखोर वृत्तीमुळेच बहिणीचा मृत्यू झाला असून मध्यवर्ती पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला. तसेच न्यायालयाने त्याला १२ मे पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. 

 मासिक पाळी न समजल्याने गेला जीव १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळी आल्याचे, सांगता न आल्याने, संशयातून मुलीला भावाने मारहाण केली. मात्र या अघोरी मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याने, सर्वस्तरांतून निषेध होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी