शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा, विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 17:28 IST

अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रश्मी जोशी व परिवार आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

ठळक मुद्देअरविंद जोशी यांना आदरांजलीव्यास क्रिएशन्सतर्फे शोकसभा आयोजितअरविंद जोशी यांनी लिहीलेले ० ते + ६ आणि ० ते - ६ या पुस्तकाचे प्रकाशन

ठाणे: आधाररेखा संस्थेचे संस्थापक आणि ठाण्यातील विविध संस्थांचे सक्रीय कार्यकर्ते अरविंद जोशी हे आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ठाणेकरांच्या आठवणीत सदैव राहतील. ज्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला, त्यांचे कार्य धडाडीने पुढे नेणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल अशा शब्दांत अरविंद जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली. व्यास क्रिएशन्सतर्फे हि शोकसभा आयोजित केली होती         कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे प्रणेते, आधाररेखा संस्थेचे संस्थापक आणि लेखक अरविंद जोशी यांचा रविवारी उमा निळकंठ हॉल येथे स्मृती वंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अरविंद जोशी यांचा मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता. यावेळी व्यास क्रिएशन्सच्यावतीने अरविंद जोशी यांनी लिहीलेले ० ते + ६ आणि ० ते - ६ या पुस्तकाचे प्रकाशन रश्मी जोशी, कुलभूषण जोशी आणि व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांच्या हस्ते झाले. जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे यांनी त्यांच्या आठवणी सांगून सभेला सुरूवात केली. गायकवाड यांच्यासह आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळातर्फे संपदा वागळे, गीता जोशी, विनायक जोशी, वाचक मंडळातर्फे सुरेश जांभेकर, वनवासी कल्याण आश्रमातर्फे जयश्री आंबेकर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सुषमा हिप्पळगावकर, गुणेंद्र फणसळकर, मंगल घाणेकर, मायबोली साहित्य मंडळातर्फे स्वाती चव्हाण, आधाररेखा योग विभागातर्फे जयश्री शुक्ल, सीकॉमचे सोहोनी, अरविंद जोशी यांचे कॉलेज मित्र सी.ए. चंद्रशेखर वझे आदींनी त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्या मनोगतातून मांडले. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष ह. शा. भानुशाली यांनीही त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, अरविंद जोशी केलेले कॅन्सर रुग्णांसाठी केलेले कार्य आणि प्रचार यावर विशेष पैलु टाकला. तसेच, जोशी परिवारातर्फे प्रा. दिलीप फडके यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. त्यांचे सर्व कार्यातील व्यवस्थापन, सर्व कामात रस घेऊन सर्व उपक्रमात रस घेणे हा त्यांचा स्वभावविशेष होता. सर्व संस्था आपापल्या नेतृत्वावर उभे राहण्यासाठी त्यांनी पुर्वीच नियोजन केले होते. त्यांची दुरदृष्टी नेहमीच निदर्शनास येत असे. त्यांचे कार्य निरंतर चालू ठेवण्याची ग्वाही यावेळी सर्व संस्थांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई