शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रवादीच्या ‘दुबार’ मतपेढीला शिवसेनेचा सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:26 IST

राष्ट्रवादीचा नवी मुंबईतील बालेकिल्ला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत उद्ध्वस्त करण्यासाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोर्चेबांधणी चालवली

- नारायण जाधव ठाणे : राष्ट्रवादीचा नवी मुंबईतील बालेकिल्ला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत उद्ध्वस्त करण्यासाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोर्चेबांधणी चालवली असून तळागाळातील पक्षाच्या बांधणीबरोबरच शहरातील राष्ट्रवादीचे बहुमत असलेल्या प्रभागांना दुबार मतदारांच्या नावाखाली लक्ष्य केले आहे. शहरातील ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघांतील तब्बल ७३ हजार १७० मतदारांची नावे वगळावीत, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीला घेरण्याकरिता जैन, मारवाडी, मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे ओढण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.मोदीलाटेतही स्वबळावर नवी मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याचा करिष्मा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी करून दाखवला होता. त्याला नाईक यांची सर्वधर्मीय आणि सर्वपंथीयांतील ऊठबस आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमा कारणीभूत ठरली होती. विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातील निसटत्या पराभवानंतरही खचून न जाता त्यांनी महापालिकेत काँगे्रसच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता राखली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जयंत पाटील यांना सांगलीत जे जमले नाही, ते नाईक यांनी नवी मुंबईत करून दाखवले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ते शांत असल्याचे पाहून माजी आयएएस अधिकारी तथा शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांनी पक्षाच्या उभारणीवर भर दिला आहे. पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना मुख्य प्रवाहापासून चारहात लांब ठेवून नव्या दमाचे कार्यकर्ते आणि जुन्या नेत्यांना मानसन्मान देऊन पक्षाची फेरबांधणी सुरू केली आहे. यात मराठी आणि हिंदू व्होटबँकेचे राजकारण करताना शहरातील जैन, मारवाडी, मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांना खासदार राजन विचारे यांची चांगली साथ मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीसमर्थक बिल्डर, व्यावसायिक, व्यापारी यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शिवसेनेकडे आणण्याचा प्रयत्न नाहटा आणि त्यांच्या शिलेदारांनी चालवला आहे. पक्षाचे नवी मुंबईतील प्रमुख विजय चौगुले हे शहरात निष्क्रिय असल्याचे नाहटा यांच्या पथ्यावर पडले असून विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, एम.के. मढवी, किशोर पाटकर यासारखे नवेजुने चेहरे सोबत घेऊन त्यांनी पक्षबांधणीवर भर दिला आहे.>कार्यकर्ते फोडण्यावर भरनवी मुंबईतील शहरी भागात मोदीलाटेमुळे भाजपा वाढल्याचा भास होत असला, तरी आमदार मंदा म्हात्रेवगळता पक्षाकडे जनाधार असलेला एकही नेता नाही. पक्षाचे शहराध्यक्ष रामचंद्र घरत यांचे आपल्या गावात फारसे वजन नाही. शहरी मतदारांना त्यांची ओळख नाही. कार्यकर्त्यांचा अभाव आहे. त्याउलट, शिवसेनेने गल्लीबोळात पदे वाटून त्यांच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचे, त्या माध्यमातून राष्ट्रवादी, काँगे्रस आणि भाजपा कार्यकर्त्यांना फोडण्याचे सत्र चालवले आहे. यासाठी त्यांना विविध पदांचे, कंत्राटांचे आमिष दाखवले जात आहे. झोपडपट्टी विभागात हे प्रमाण जास्त आहे. यासाठी मुस्लिम नेते आणि त्यांचे जवळचे बिल्डर रसद पुरवत आहेत. कारण, झोपडपट्टीतील मतदार राष्ट्रवादीचे पूर्वापार मतदार आहेत. त्यांना फोडण्याचा प्रयत्न पदे वाटलेल्या गल्लीबोळांतील शिवसैनिकांकडून चालवला आहे.>दुबार मतदारांच्या नावाखालीबालेकिल्ला छेदणारमतदारयाद्यांची कशी छाननी करतात, दुबार मतदारांना कसे शोधायचे, याचा मोठा अनुभव कोकण विभागाचे माजी आयुक्त असलेल्या विजय नाहटा यांना आहे. त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील एक लाख ५६ हजार ७७१ दुबार मतदार शोधले असले, तरी त्यात एकट्या नवी मुंबईतील ७३ हजार १७० मतदार आहेत. यात ऐरोलीतील ४१ हजार ७११ आणि बेलापूरमधील ३१ हजार ४५९ मतदारांचा समावेश आहे. यातील बहुतांश मतदार राष्ट्रवादी व भाजपा समर्थक असल्याचे सांगण्यात येत असून या एकाच दगडात नाहटा यांनी दोन पक्षी मारण्याचा डाव आखला आहे. मात्र, त्यांच्या आक्षेपाबाबत राष्ट्रवादी व भाजपाने मिठाची गुळणी घेतली आहे.