शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

ठेकेदाराकडून शिवसेनेला पाकीट

By admin | Updated: February 16, 2017 01:50 IST

नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे ठाणे परिवहन सेवेला ८१७ कोटींचा तोटा झाला आहे. अनेक गाड्या तर भंगारातही गेल्या.

ठाणे : नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे ठाणे परिवहन सेवेला ८१७ कोटींचा तोटा झाला आहे. अनेक गाड्या तर भंगारातही गेल्या. गोल्डी या ठेकेदारामुळे तर शिवसेनेला लाखो रुपयांचे पाकीट मिळते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. एकीकडे, भाजपा राष्ट्रवादीच्या बाटलीने दूध पित असल्याचा आरोप शिवसेनेने केला असतानाच ‘समृद्धी’ महामार्गाच्या कामाचे ‘निप्पल’ मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या तोंडात दिले आहे, याचाही शोध घ्यावा, असा पलटवारही त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवण्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपा अपयशी ठरले आहे. सार्वजनिक परिवहन हा शहरातील प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय असतानाही सत्ताधाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच ठाणेकरांना एखाद्या जनावराप्रमाणे टीएमटीतून प्रवास करावा लागतो, असा आरोप त्यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. एक लाखाच्या लोकसंख्येला ३० बसची गरज लक्षात घेता, ठाणे शहरातील ३० लाखांच्या लोकसंख्येला ६६० बस हव्यात. परंतु, टीएमटीच्या ताफ्यात अवघ्या ४०० बस आहेत. त्यापैकी २०९ भंगारात, तर ७४ बसची विक्री झाली. त्यामुळे केवळ १८० बस या रस्त्यावर आहेत. त्यामुळे टीएमटीच्या प्रवाशांची संख्या वाढण्याऐवजी घटलेली आहे. अनेक बसेस या नादुरुस्त असल्याने परिवहनला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेमधून परिवहनच्या ताफ्यात ६३ साध्या तर, ३० नवीन वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. जुन्या आणि नव्या अशा २०० बस रस्त्यावर असून त्या खासगी ठेकेदाराला चालवायला दिल्या आहेत. त्यासाठी खासगी ठेकेदार किलोमीटरमागे ५३ रुपये दर आकारत आहे. नवी मुंबईत हाच दर ३५ रुपये आहे. हा ठेकेदार १८ रुपये अधिक आकारत असून त्यातील १० रुपये हे शिवसेनेचा पॉकेटमनी असल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)