शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठेकेदाराकडून शिवसेनेला पाकीट

By admin | Updated: February 16, 2017 01:50 IST

नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे ठाणे परिवहन सेवेला ८१७ कोटींचा तोटा झाला आहे. अनेक गाड्या तर भंगारातही गेल्या.

ठाणे : नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे ठाणे परिवहन सेवेला ८१७ कोटींचा तोटा झाला आहे. अनेक गाड्या तर भंगारातही गेल्या. गोल्डी या ठेकेदारामुळे तर शिवसेनेला लाखो रुपयांचे पाकीट मिळते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. एकीकडे, भाजपा राष्ट्रवादीच्या बाटलीने दूध पित असल्याचा आरोप शिवसेनेने केला असतानाच ‘समृद्धी’ महामार्गाच्या कामाचे ‘निप्पल’ मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या तोंडात दिले आहे, याचाही शोध घ्यावा, असा पलटवारही त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवण्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपा अपयशी ठरले आहे. सार्वजनिक परिवहन हा शहरातील प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय असतानाही सत्ताधाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच ठाणेकरांना एखाद्या जनावराप्रमाणे टीएमटीतून प्रवास करावा लागतो, असा आरोप त्यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. एक लाखाच्या लोकसंख्येला ३० बसची गरज लक्षात घेता, ठाणे शहरातील ३० लाखांच्या लोकसंख्येला ६६० बस हव्यात. परंतु, टीएमटीच्या ताफ्यात अवघ्या ४०० बस आहेत. त्यापैकी २०९ भंगारात, तर ७४ बसची विक्री झाली. त्यामुळे केवळ १८० बस या रस्त्यावर आहेत. त्यामुळे टीएमटीच्या प्रवाशांची संख्या वाढण्याऐवजी घटलेली आहे. अनेक बसेस या नादुरुस्त असल्याने परिवहनला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेमधून परिवहनच्या ताफ्यात ६३ साध्या तर, ३० नवीन वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. जुन्या आणि नव्या अशा २०० बस रस्त्यावर असून त्या खासगी ठेकेदाराला चालवायला दिल्या आहेत. त्यासाठी खासगी ठेकेदार किलोमीटरमागे ५३ रुपये दर आकारत आहे. नवी मुंबईत हाच दर ३५ रुपये आहे. हा ठेकेदार १८ रुपये अधिक आकारत असून त्यातील १० रुपये हे शिवसेनेचा पॉकेटमनी असल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)