शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

विधानसभा निवडणुकीच्या निधीसाठी शिवसेनेने केला आरोग्य घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 17:59 IST

शहराच्या विविध भागात एकूण 50 आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे.

ठाणे : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाणे पालिका ‘आपला दवाखाना’ नावाची संकल्पना सुरु करीत आहे. किसननगर आणि कळवा येथे सुरु केलेली ही संकल्पना पुर्णत: फोल ठरली आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ठाण्यात 26 आरोग्य केंद्रांची गरज आहे. तरीही, अतिरिक्त 50 केंद्र सुरु करुन सुमारे 160 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचे कारण काय? असा सवाल करुन, मेडीकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडला हा ठेका देऊन त्याद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा आरोप ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या दवाखान्याच्या निविदा प्रक्रिेयेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव 19 तारखेच्या महासभेत पटलावर ठेवण्यात आला आहे. मात्र, ही मंजुरी मिळण्याआधीच दि. 14 जून रोजी वृत्तपत्रांमधून निविदा नोटीस जारी करण्यात आली आहे.  

शहराच्या विविध भागात एकूण 50 आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. या संकल्पनेस राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मिलींद पाटील यांनी हा आरोप केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई, नगरसेवक मुकूंद केणी, शानू पठाण उपस्थित होते.  

ठाणे महानगर पालिकेने  मेडीकल ऑन गो प्रायव्हेट लिमीटेडच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये ‘आपला दवाखाना ( ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. आरोग्य केंद्र सुरु करताना दर 50 हजार नागरिकांमागे एक आरोग्य केंद्र असावे, असा नियम आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या 26 लाखांच्या घरात आहे. त्यापैकी 50 टक्के लोक हे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. एकंदर पाहिल्यास हे आरोग्य केंद्राचा वापर करणार्‍यांची लोकसंख्या पाहता ठाणे शहरात 26 आरोग्य केंद्रांची गरज आहे. आजमितीला ठाण्यात 28 आरोग्य केंद्र आहेत. त्यामुळे अतिरिक्त 50 केंद्र सुरु करुन ठाणेकरांच्या 160 कोटी रुपयांची उधळपट्टीच केली जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत. त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये 10 रुपये दर आकारला जाणार आहे. शिवाय, ही संकल्पना सर्वात आधी किसन नगर आणि कळवा येथे राबविण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरलेली आहे. या केंद्रांवर एकही माणूस फिरकत नाही.  तरीही, आणखी पन्नास ठिकाणी ही योजना राबवून त्या माध्यमातून टक्केवारी घेण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे. ‘आपला दवाखाना’ मुळे ठाणे महानगर पालिकेला पाच वर्षांसाठी 144 कोटी आणि भांडवली खर्चापोटी 15.60 कोटी असे सुमारे 159.60 कोटी मेडीकल ऑन गो प्रायव्हेट लिमीटेड या एजन्सीला द्यावे लागणार आहेत. हा सर्व ठाणेकरांच्या पैशांचा अपव्ययच आहे. 

आजघडीला ठाणे महापालिकेच्या 28 आरोग्य केंद्रांची वाताहत झालेली आहे. सकाळी 9 वाजता उघडण्यात येणारी ही उपकेंद्रे अवघ्या दोनच तासात म्हणजे अकरा वाजता बंद करण्यात येत आहेत. अनेक आरोग्य केंद्रांवर छत नाही तर, अनेक ठिकाणी नर्स, डॉक्टर उपलब्ध नाहीत; त्यांची अवस्था सुधारण्याची गरज असताना हे ‘आपला दवाखाना’ आणून ठाणेकरांच्या करातून मिळणार्‍या पैशाचा अपव्ययच केला जाणार आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत  आहेत. या निवडणुकांसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठीच ही संकल्पना राबविण्यात येत आहे. साधारणपणे 10 टक्के रक्कम जरी शिवसेनेला मिळाली तरी त्यातून बराच निधी निवडणुकीसाठी जमा करता येणार असल्याने हा घाट घालण्यात आला आहे, असा आरोपही मिलींद पाटील यांनी यावेळी केला. 

विशेष म्हणजे, 19 जून रोजी होत असलेल्या महासभेमध्ये इच्छुक निविदाकारांकडून निविदा मागवण्यासाठीच्या प्रक्रियेचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्याच्या आधीच संबधीत अधिकार्‍यांनी 14 जून रोजीच निविदा नोटीस वृत्तपत्रांच्या माध्यमातून जारी केली आहे. म्हणजेच, हा प्रस्ताव मंजूर होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यामुळे महासभेच्या मंजुरीआधीच निविदा काढणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना