शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शिवसेनेकडून दिव्यांगांची उपेक्षा, अन्यथा 21 व्या दिवशी मातोश्रीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 04:41 IST

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेल्या निधीचा विनीयोग योग्य प्रकारे होत नसल्याचे संबंधित महापालिकांमधून दिसून आले आहे.

कल्याण : शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिका आणि नगरपालिकांमध्ये दिव्यांग व्यक्तींची पुरती उपेक्षा झाली असून योजनांसाठी राखीव ठेवलेल्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दिव्यांग सेना या संघटनेच्यावतीने रविवारी करण्यात आला. दिव्यांगांच्या मागण्यांची पूर्तता २० दिवसांमध्ये करण्यात यावी अन्यथा २१ आॅक्टोबरला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दिव्यांगांचा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी दिली. कल्याणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेल्या निधीचा विनीयोग योग्य प्रकारे होत नसल्याचे संबंधित महापालिकांमधून दिसून आले आहे. मुंबई महापालिकेत तीन कोटीचा निधी वापरलाच गेलेला नाही तर उर्वरित महापालिका आणि नगरपालिकांमध्ये हा निधी चुकीच्या पध्दतीने वापरला जात आहे. पायवाटा आणि गटार बांधणीसाठी नगरसेवक, आमदार तसेच खासदार निधी वापरणे शक्य असताना त्यासाठी दिव्यांग निधीचा वापर करण्यात आल्याचे माहीती अधिकारात कल्याण डोंबिवली महापालिकेकडून मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे.दिव्यांगांचे नेमके किती प्रकार आहेत याची माहितीही अधिकाऱ्यांना नसल्याचा आरोप साळवी यांनी केला. कर्णबधिर आणि अंधांची यात पुर्णपणे दिशाभूल केली जात असून जे बचतगट स्थापन केले गेले आहेत त्यात केवळ कल्याणच्या संस्थांचाच समावेश आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. दिव्यांग योजनेचा लाभ हा केवळ दिव्यांग बेरोजगारांना मिळणे बंधनकारक असताना प्रशासनातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाºयांना साहित्यांचे वाटप करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याचे साळवी यांनी सांगितले.दिव्यांगांसाठी दिव्यांग कक्षही उघडण्यात आलेला नाही. हीच परिस्थिती अन्य महापालिका आणि नगरपालिकांमध्येही असून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. वारंवार पत्रव्यवहार आणि निदर्शनास आणूनही फरक पडत नसल्याने आता मागण्यांच्या पूर्ततेसाठी २० दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. न्याय मिळाला नाहीतर २१ आॅक्टोबरला मातोश्रीवर मोर्चा काढणार असल्याची माहिती साळवी यांनी दिली.साहित्य वाटले, पण रोजगाराचे काय?खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिव्यांगांना साहित्य वाटले हे निश्चितच चांगले आहे पण नुसते साहित्य वाटू नका ते नगरसेवकही वाटतात. दिव्यांगांना रोजगार मिळण्यासाठी शिंदे यांनी किती प्रयत्न केले? असा सवाल साळवी यांनी केला आहे. डॉ. प्रकाश आमटे यांनी दिव्यांगांना रोजगार मिळून देण्यासाठी विशेष काम केले आहे. त्यांच्याकडून खासदारांनी सल्ला घ्यावा, महापालिकांमध्ये सत्ता असताना दिव्यांगांसाठीच्या राखीव निधीचा वापर होत नाही हे खासदारांना बोलावे लागते ही त्यांच्यासाठी शरमेची बाब असल्याचे साळवी म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका