शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आयुक्तांची कामे शिवसेना आपल्या नावावर खपवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:59 IST

आयुक्तांसोबतची मैत्री ही केवळ शिवसेनेचा एक स्वार्थ आहे. शिवसेनेकडून विकास कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून जी विकास कामे होत आहेत

ठाणे : आयुक्तांसोबतची मैत्री ही केवळ शिवसेनेचा एक स्वार्थ आहे. शिवसेनेकडून विकास कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून जी विकास कामे होत आहेत, त्यावर आपला हक्क सांगण्याचा शिवसेनेनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशा शब्दांत भाजपाचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला. उलटपक्षी शिवसेनेनी ज्या पद्धतीने प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवायला हवे होते, ते होतांना दिसत नाही. आम्ही त्याबाबत विचारणा केली तर त्यात गैर काय असा सवालही केळकर यांनी केला आहे.भाजपाचा नेहमीच विकास कामांना पाठिंबा असून यापुढेही तो राहील. परंतु एखाद्या कामात अनियमितता असेल तर त्याबाबत विचारणा केल्यास त्यात गैर असे काहीच नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.महापालिका प्रशासनाकडून काही अनियमितता असलेले ठराव केले जात असतील तर या बाबी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्याचे काम आमचेच असल्याचे मत केळकर यांनी व्यक्त केले. पण म्हणून आम्ही आयुक्तांच्या विरोधात भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचे काम करीत आहोत, असे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. चुकीचे ठराव असतील आणि त्याबाबत आक्षेप घेतले जात असतील तर ते आक्षेप चर्चेतून सोडविणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना चर्चेतूनच उत्तरे दिल्यास अशी वेळ येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.आयुक्तांनी केलेल्या चांगल्या कामांचे आम्ही नेहमीच कौतुक केले आहे. परंतु, त्यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले आहेत, ते दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी एकत्रित बसून यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, अशी भूमिका ही त्यांनी मांडली. पाटणकर यांच्यावर केलेली एमआरटीपीची कारवाई ही त्यांच्या एकट्यावरच केली आहे का? शेजारीशेजारी फ्लॅट एकत्र केले म्हणून अन्य किती जणांवर कारवाई केली हेही तपासावे लागणार आहे. परंतु, हे सर्व केवळ गैरसमजुतीनच होत असावे, असा सूर त्यांनी लावला.ुमंगळवारच्या महासभेत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भावनाविवश होऊन भाजपाच्या काही ठराविक पदाधिकाºयांच्या विरोधात अप्रत्यक्ष टीका करुन माझ्या विरोधात ठराव करा आणि मला परत शासनाकडे पाठवा, असे आवाहन केले. यामुळे कालपर्यंत भाजपाच्या जवळ समजले जाणारे आयुक्त आता एवढे का दुरावले अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात आमदार केळकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी वरील शब्दात आपली भूमिका मांडली.आयुक्तांचे काहीतरी गैरसमज झाले असावेत, ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्यात आणि भाजपाच्या स्थानिक मंडळींच्या विरोधात असलेले मतभेदही दूर करु, असा सूर केळकर यांनी आळवला.