शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आयुक्तांची कामे शिवसेना आपल्या नावावर खपवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:59 IST

आयुक्तांसोबतची मैत्री ही केवळ शिवसेनेचा एक स्वार्थ आहे. शिवसेनेकडून विकास कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून जी विकास कामे होत आहेत

ठाणे : आयुक्तांसोबतची मैत्री ही केवळ शिवसेनेचा एक स्वार्थ आहे. शिवसेनेकडून विकास कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून जी विकास कामे होत आहेत, त्यावर आपला हक्क सांगण्याचा शिवसेनेनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशा शब्दांत भाजपाचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला. उलटपक्षी शिवसेनेनी ज्या पद्धतीने प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवायला हवे होते, ते होतांना दिसत नाही. आम्ही त्याबाबत विचारणा केली तर त्यात गैर काय असा सवालही केळकर यांनी केला आहे.भाजपाचा नेहमीच विकास कामांना पाठिंबा असून यापुढेही तो राहील. परंतु एखाद्या कामात अनियमितता असेल तर त्याबाबत विचारणा केल्यास त्यात गैर असे काहीच नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.महापालिका प्रशासनाकडून काही अनियमितता असलेले ठराव केले जात असतील तर या बाबी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्याचे काम आमचेच असल्याचे मत केळकर यांनी व्यक्त केले. पण म्हणून आम्ही आयुक्तांच्या विरोधात भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचे काम करीत आहोत, असे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. चुकीचे ठराव असतील आणि त्याबाबत आक्षेप घेतले जात असतील तर ते आक्षेप चर्चेतून सोडविणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना चर्चेतूनच उत्तरे दिल्यास अशी वेळ येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.आयुक्तांनी केलेल्या चांगल्या कामांचे आम्ही नेहमीच कौतुक केले आहे. परंतु, त्यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले आहेत, ते दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी एकत्रित बसून यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, अशी भूमिका ही त्यांनी मांडली. पाटणकर यांच्यावर केलेली एमआरटीपीची कारवाई ही त्यांच्या एकट्यावरच केली आहे का? शेजारीशेजारी फ्लॅट एकत्र केले म्हणून अन्य किती जणांवर कारवाई केली हेही तपासावे लागणार आहे. परंतु, हे सर्व केवळ गैरसमजुतीनच होत असावे, असा सूर त्यांनी लावला.ुमंगळवारच्या महासभेत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भावनाविवश होऊन भाजपाच्या काही ठराविक पदाधिकाºयांच्या विरोधात अप्रत्यक्ष टीका करुन माझ्या विरोधात ठराव करा आणि मला परत शासनाकडे पाठवा, असे आवाहन केले. यामुळे कालपर्यंत भाजपाच्या जवळ समजले जाणारे आयुक्त आता एवढे का दुरावले अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात आमदार केळकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी वरील शब्दात आपली भूमिका मांडली.आयुक्तांचे काहीतरी गैरसमज झाले असावेत, ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्यात आणि भाजपाच्या स्थानिक मंडळींच्या विरोधात असलेले मतभेदही दूर करु, असा सूर केळकर यांनी आळवला.