शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अंबरनाथच्या शिवमंदिराला धाेका; पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 10:21 IST

प्राचीन वारसा असलेल्या मंदिराचे अस्तित्व धोक्यात

अंबरनाथ : शहरातील प्राचीन शिवमंदिराची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. हे मंदिर तब्बल ९६२ वर्षे जुने असून, शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. हे शिवमंदिर स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना समजले जाते. १०६० मध्ये शिलाहार राजा मम्बवाणी यांनी या शिवमंदिराची निर्मिती केली होती. आता त्याची पडझड व्हायला सुरुवात झाली आहे. कारण ज्या पुरातत्व खात्याकडे या मंदिराची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून हा वारसा जतन करण्यासाठी काहीही उपायोजना केल्या जात नाहीत. प्राचीन मंदिराच्या आवारात १५ वर्षांपूर्वी दगडी फरशा बसवल्या होत्या. त्यावेळी मंदिराला काही ठिकाणी तडे आणि भेगा पडल्याचे निदर्शनास आल्याने पुरातत्व खात्याने तडे बुजविले होते. मात्र, त्यानंतर मंदिराच्या डागडुजीकडे पुरातत्व खात्याने लक्षच दिलेले नसल्याची मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांचा आरोप आहे. या मंदिराची डागडुजी आणि देखभाल दुरुस्ती आम्ही करायला तयार आहोत, मात्र पुरातत्व खात्याच्या जाचक अटींमुळे मंदिराला साधा हळदीचा टिक्काही लावता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. महाशिवरात्र तसेच अन्य दिवशीही भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. पुरातत्त्व विभागाचा नाकर्तेपणाभग्नावस्थेतील मूर्तीची दुरुस्तीची जबाबदारी ही केवळ पुरातत्त्व विभागाची आहे. मात्र, दुरुस्तीसाठी अद्याप कोणताही प्रयत्न केलेला नाही. नगरपालिकेने शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्या प्रकल्पात मंदिराच्या दुरुस्तीचा विषय येण्याची गरज आहे. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल दरवर्षी होतो. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या नाकर्तेपणामुळे कोणत्याही कामाची संधी आयोजकांना मिळत नाही.निधीची ओरड असल्याने त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, नेमके काम काय करावे, याबाबत पुरातत्व विभाग योग्य माहिती देत नाही.  मंदिराच्या शेजारून सांडपाणी वाहत असल्याने ते वाहून नेण्यासाठी भुयारी मार्गाची गरज आहे. मात्र, परवानगीअभावी परिसराचा विकास रखडला आहे.दुर्मीळ मूर्तींचा समावेशअंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराला तीन दरवाजे असून, मंदिराच्या बाहेरच्या भागावर सर्व बाजूंनी देवदेवतांच्या सुबक मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. यामध्ये अनेक दुर्मीळ मूर्तींचाही समावेश आहे. मात्र, या सगळ्या मूर्तींची झीज होत चालली असून, काही मूर्ती भग्नावस्थेत आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे पुढच्या पिढीसाठी जतन करण्याची आवश्यकता आहे. मात्र संबंधित विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.