शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

अंबरनाथच्या शिवमंदिराला धाेका; पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 10:21 IST

प्राचीन वारसा असलेल्या मंदिराचे अस्तित्व धोक्यात

अंबरनाथ : शहरातील प्राचीन शिवमंदिराची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. हे मंदिर तब्बल ९६२ वर्षे जुने असून, शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. हे शिवमंदिर स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना समजले जाते. १०६० मध्ये शिलाहार राजा मम्बवाणी यांनी या शिवमंदिराची निर्मिती केली होती. आता त्याची पडझड व्हायला सुरुवात झाली आहे. कारण ज्या पुरातत्व खात्याकडे या मंदिराची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून हा वारसा जतन करण्यासाठी काहीही उपायोजना केल्या जात नाहीत. प्राचीन मंदिराच्या आवारात १५ वर्षांपूर्वी दगडी फरशा बसवल्या होत्या. त्यावेळी मंदिराला काही ठिकाणी तडे आणि भेगा पडल्याचे निदर्शनास आल्याने पुरातत्व खात्याने तडे बुजविले होते. मात्र, त्यानंतर मंदिराच्या डागडुजीकडे पुरातत्व खात्याने लक्षच दिलेले नसल्याची मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांचा आरोप आहे. या मंदिराची डागडुजी आणि देखभाल दुरुस्ती आम्ही करायला तयार आहोत, मात्र पुरातत्व खात्याच्या जाचक अटींमुळे मंदिराला साधा हळदीचा टिक्काही लावता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. महाशिवरात्र तसेच अन्य दिवशीही भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. पुरातत्त्व विभागाचा नाकर्तेपणाभग्नावस्थेतील मूर्तीची दुरुस्तीची जबाबदारी ही केवळ पुरातत्त्व विभागाची आहे. मात्र, दुरुस्तीसाठी अद्याप कोणताही प्रयत्न केलेला नाही. नगरपालिकेने शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्या प्रकल्पात मंदिराच्या दुरुस्तीचा विषय येण्याची गरज आहे. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल दरवर्षी होतो. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या नाकर्तेपणामुळे कोणत्याही कामाची संधी आयोजकांना मिळत नाही.निधीची ओरड असल्याने त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, नेमके काम काय करावे, याबाबत पुरातत्व विभाग योग्य माहिती देत नाही.  मंदिराच्या शेजारून सांडपाणी वाहत असल्याने ते वाहून नेण्यासाठी भुयारी मार्गाची गरज आहे. मात्र, परवानगीअभावी परिसराचा विकास रखडला आहे.दुर्मीळ मूर्तींचा समावेशअंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराला तीन दरवाजे असून, मंदिराच्या बाहेरच्या भागावर सर्व बाजूंनी देवदेवतांच्या सुबक मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. यामध्ये अनेक दुर्मीळ मूर्तींचाही समावेश आहे. मात्र, या सगळ्या मूर्तींची झीज होत चालली असून, काही मूर्ती भग्नावस्थेत आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे पुढच्या पिढीसाठी जतन करण्याची आवश्यकता आहे. मात्र संबंधित विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.