शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

सरकारच्या निषेधार्थ शिवसेनेची बॅनरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:06 IST

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावलेली झाडे समाजकंटकांनी जाळली.

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावलेली झाडे समाजकंटकांनी जाळली. या प्रकरणातील संशयितांविरोधात कारवाई केली जात नसल्याने शिवसेनेतर्फे ठाण्यामध्ये कोपरी येथील वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन करून अधिकाºयावर राख फेकण्यात आली. यानंतर शिवसैनिकांसह खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक करण्यात आली होती. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने सरकारविरोधात बॅनरबाजी केली आहे. संपूर्ण कल्याण-डोंबिवली शहरांत हे बॅनर झळकले आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेनाही सहभागी असल्यामुळे सरकार नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी हे बॅनर लावले आहेत. याविषयी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र संघटक अरविंद मोरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारकडून अन्याय होत असल्यास अन्यायकारक गोष्टींवर बोट ठेवा. जाब विचारा, असे सांगितले आहे.खासदार शिंदे यांनी मांगरूळच्या डोंगरावर लोकसहभागातून लाखो झाडे लावली होती. यापूर्वीही या ठिकाणी आगी लावण्यात आल्या होत्या. पुन्हा या ठिकाणी समाजकंटकांनी एक लाख झाडे जाळली. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आंदोलन करून अधिकाºयांना जाब विचारला. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई करून शिवसैनिकांसह खासदारांना अटक केली. त्याचा निषेध आम्ही केला आहे. त्यात गैर काहीच नव्हते. विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका शिवसेनेलाच पार पाडावी लागत आहे.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम म्हणले की, झाडे जाळली ही बाब चुकीची आहे. झाडे जाळणाºयांविरोधात कारवाई केली पाहिजे या मागणीला आमचे समर्थन आहे. खासदारांनी जसे कार्यालयात जाऊन आंदोलन केले तसे मनसेने केले असते तर पोलिसांनी आमच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असता. मग खासदारांना तोच न्याय का लावला नाही. शिवसेनेने सरकारचा केलेला निषेधही बेगडी आहे.शिवसैनिकांना गुन्ह्यातून का वगळले, वन कर्मचाºयांचा सवालआंदोलनाच्यावेळी शिवसैनिकांनी मुग्य वनअधिकारी राजेंंद्र कदम यांच्या कार्यालयात जाऊन राख फेकली होती. कदम यांच्या अंगावर शाईदेखील फेकली होती.सरकारी कामात अडथळा आणल्यास भादंविचे कलम ३५३ नुसार कारवाई केली जाते. मग शिवसैनिकांना यातून का वगळले, असा प्रश्न वन कर्मचाºयांनी केला.

टॅग्स :thaneठाणे