शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सरकारच्या निषेधार्थ शिवसेनेची बॅनरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:06 IST

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावलेली झाडे समाजकंटकांनी जाळली.

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावलेली झाडे समाजकंटकांनी जाळली. या प्रकरणातील संशयितांविरोधात कारवाई केली जात नसल्याने शिवसेनेतर्फे ठाण्यामध्ये कोपरी येथील वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन करून अधिकाºयावर राख फेकण्यात आली. यानंतर शिवसैनिकांसह खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक करण्यात आली होती. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने सरकारविरोधात बॅनरबाजी केली आहे. संपूर्ण कल्याण-डोंबिवली शहरांत हे बॅनर झळकले आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेनाही सहभागी असल्यामुळे सरकार नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी हे बॅनर लावले आहेत. याविषयी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र संघटक अरविंद मोरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारकडून अन्याय होत असल्यास अन्यायकारक गोष्टींवर बोट ठेवा. जाब विचारा, असे सांगितले आहे.खासदार शिंदे यांनी मांगरूळच्या डोंगरावर लोकसहभागातून लाखो झाडे लावली होती. यापूर्वीही या ठिकाणी आगी लावण्यात आल्या होत्या. पुन्हा या ठिकाणी समाजकंटकांनी एक लाख झाडे जाळली. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आंदोलन करून अधिकाºयांना जाब विचारला. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई करून शिवसैनिकांसह खासदारांना अटक केली. त्याचा निषेध आम्ही केला आहे. त्यात गैर काहीच नव्हते. विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका शिवसेनेलाच पार पाडावी लागत आहे.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम म्हणले की, झाडे जाळली ही बाब चुकीची आहे. झाडे जाळणाºयांविरोधात कारवाई केली पाहिजे या मागणीला आमचे समर्थन आहे. खासदारांनी जसे कार्यालयात जाऊन आंदोलन केले तसे मनसेने केले असते तर पोलिसांनी आमच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असता. मग खासदारांना तोच न्याय का लावला नाही. शिवसेनेने सरकारचा केलेला निषेधही बेगडी आहे.शिवसैनिकांना गुन्ह्यातून का वगळले, वन कर्मचाºयांचा सवालआंदोलनाच्यावेळी शिवसैनिकांनी मुग्य वनअधिकारी राजेंंद्र कदम यांच्या कार्यालयात जाऊन राख फेकली होती. कदम यांच्या अंगावर शाईदेखील फेकली होती.सरकारी कामात अडथळा आणल्यास भादंविचे कलम ३५३ नुसार कारवाई केली जाते. मग शिवसैनिकांना यातून का वगळले, असा प्रश्न वन कर्मचाºयांनी केला.

टॅग्स :thaneठाणे