शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

लॉकडाऊन रद्द न झाल्यास शिवसेना उतरणार रस्त्यावर, वामन म्हात्रे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:11 IST

शनिवारी माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ८ मे पासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करण्याबाबतचे निवेदन उपमुख्याधिकारी सुभाष नागप यांना दिले.

बदलापूर : बदलापुरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मात्र त्यानंतरही शहरात लॉकडाऊनचा गोंधळ सुरूच आहे. गरज नसताना कुणाच्या तरी दबावाखाली घाईघाईने नागरिकांवर हा लॉकडाऊन लादण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केला आहे. हा लॉकडाऊन रद्द करण्याबाबत उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.शनिवारी माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ८ मे पासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करण्याबाबतचे निवेदन उपमुख्याधिकारी सुभाष नागप यांना दिले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान म्हात्रे यांनी कडक लॉकडाऊनच्या आदेशातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले. सध्या शहरात राज्य सरकारने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. या काळात शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर मुंबई महानगर क्षेत्रातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीमुळे हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार मेडिकल, दवाखाने, बँक वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.दूध, भाजीपाला, किराणा आणि इतर गोष्टी घरपोच देण्याची परवानगी आहे. मात्र शहरात अशी सुविधा देणारे किती विक्रेते आहेत त्यांची यादी, मोबाइल नंबर वा वेबसाइटची माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवेतील हजारो नागरिक दररोज मुंबई वा अन्य शहरात नोकरीसाठी जात असतात. त्यांना ये-जा करण्यासाठी रिक्षांची गरज असते. परंतु रिक्षा सेवा सुरू राहणार की नाही? याबाबत आदेशात काहीही नमूद करण्यात आलेले नाही. लॉकडाऊनमध्ये गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी या कडक लॉकडाऊन काळात धान्य कसे मिळवावे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ग्रामीण नागरिकांना शहराचे दरवाजे बंदबदलापूर शहरात जवळच्या ग्रामीण भागातील आदिवासी, शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बदलापुरात येत असतात. मात्र कडक लॉकडाऊनमुळे या लोकांना शहराचे दरवाजे बंद झाले आहेत? असे अनेक प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केले आहेत. कुणाच्या तरी दबावाखाली कडक लॉकडाऊनचे आदेश काढले असून, त्याला शिवसेना शहरप्रमुख म्हणून माझी हरकत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस