शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

“भीती दाखवून खिसे कापा व राज्य करा असले राजकारण देशात सुरु”: सुषमा अंधारे 

By धीरज परब | Updated: October 15, 2022 19:22 IST

सिंधुदुर्ग-रत्नागिरी गोव्याला आणि मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाजपाने राज्य करण्यासाठी लोकांची सहनशक्ती वाढवली व त्यांना संमोहित केले . त्यांनी एवढी महागाई वाढवली , जनतेचा खिसा कापला तरी लोकांनी बोलायचे नाही, केवळ नमो नमो म्हणायचे. लोक बोलले तर त्यांना देशभक्त नाहीत का ? हिंदू नाही का ? असे म्हणत देशद्रोही ठरवण्याची भीती दाखवून जनतेचे तोंड दाबून ठेवल्याची टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मीरारोड येथील महाप्रबोधन यात्रे वेळी केली . हिंदू म्हणायचे म्हणजे जनतेच्या बऱ्याच प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी हे मोकळे असा आरोप भाजपा, शिंदे गट आदींवर केला . 

मीरारोडच्या शिवार उद्यान येथे शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा झाली . यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते . शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व खासदार राजन विचारे , संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर , ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे सह सेनेचे पदाधिकारी , माजी नगरसेवक आदी उपस्थित होते . 

अंधारे म्हणाल्या की , हिंदूंचे आदर्श प्रभू श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण यांनी वहिनी साठी जीवाची बाजी लावली .  मात्र शिवसैनिक भाऊ दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीच्या मार्गात अडथळे आणणारे हे बेगडी हिंदुत्ववादी आहेत . त्यांना सत्ता दिसल्याने फडणवीस यांच्या सोबत हम दिल दे चुके सनम आणि सत्ता जायला लागली म्हणून शिवसैनिकांसोबत हम आपके है कोन असे चालवले आहे . फडणवीस स्क्रिप्ट लिहून देणारे लेखक व शिंदे वाचक असल्याची टीका त्यांनी केली . 

हे लोक महिलांचा आदर सन्मान करा म्हणतात पण राज्याला महिला बालकल्याण मंत्री नाही , एकही महिला मंत्रिमंडळात नाही . उद्या सिंधुदुर्ग - रत्नागिरी गोव्याला जोडली आणि मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे . स्वतःच्या स्वार्था साठी त्यांनी शिवसेनेला मतदान करणाऱ्या जनतेचा विश्वासघात केला अश्या गद्दारांना गाडून शिवसेना पुन्हा उभी राहील असे अंधारे म्हणाल्या . 

शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले की , ज्या मोदींना बाळासाहेबांनी व शिवसेनेने वाचवले त्याच मोदी - शहा यांनी शिवसेना संपण्यासाठी २०१४ सालंच्या निवडणुकीत २७ सभा घेतल्या . उद्धव ठाकरे एकटेव शिवसैनिक होते तेव्हा ठाण्यातले दाढीवले कुठे होते ? ठाण्याच्या बाहेर पडले तरी का ?. २०१९ सालच्या निवडणुकीत युती केली पण सेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपाने माणसे उभी केली . रमेश लटकेंना पाडण्यासाठी त्यावेळी उभ्या केलेल्या मुरजी पटेल यांना अंधेरी पोटनिवडणुकीत यावेळी भाजपाने उमेदवारी दिली आहे .  दिवंगत शिवसैनिक लटकेंच्या पत्नी यांना खोटे बनाव करून छळले जात आहे . प्रशासन गुलामा सारखे राबवले जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला . 

भाषणात अंधारे , सावंत , विचारे आदींनी भाजपा सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटातील काही आमदारांवर टीकेची झोड तसेच खोचक टोले लगावले . स्थानिक पोलिसां कडून सभेतील नेत्यांच्या भाषणावर बारीक लक्ष ठेवले जात होते . छायाचित्रण सह भाषणातील वक्तव्ये याची नोंद केली जात होती . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाMira Bhayanderमीरा-भाईंदर