शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा हंडा मोर्चा

By सदानंद नाईक | Updated: February 2, 2024 19:37 IST

महापालिका विरोधात घोषणाबाजी करून नियमित पाणी देण्याची मागणी केली आहे. 

सदानंद नाईक/ उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील शांतीनगर, कैलास कॉलनी, आंबेडकरनगर, करोतीयानगर आदी परिसरातील शेकडी नागरिकांनी शिवसेना शिंदे गट नेत्यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढला. यावेळी संतप्त महिलांनी पाण्यासाठी महापालिका विरोधात घोषणाबाजी करून नियमित पाणी देण्याची मागणी केली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील शांतीनगर, कैलास कॉलनी, डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर, करोतियानगर आदी परिसरात गेल्या १५ दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली. पाणी टंचाईबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाला सांगूनही पाणी पुरवठा नियमित झाला नाही. एका पाण्याच्या हंड्यासाठी महिलांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. अखेर शुक्रवारी दुपारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक नाना बागुल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर शेकडो महिलांचा हंडा मोर्चा काढला. शहरातील एमआयडीसी दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होत असून लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठा पुरेशा आहे. असे असतानाही शहरातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाली. महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परमेश्वर बुडगे यांच्याकडे लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष करीत असल्याचे नाना बागुल यांचे म्हणणे आहे. 

अखेर स्थानिक नागरिकांनी शिवसेना शुंडे गटाचे जिल्हा समन्वयक नाना बागुल, माजी नगरसेवक अंकुश म्हस्के, स्वप्नील बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. महापालिका आयुक्त अजीज शेख यांना बागुल यांनी निवेदन दिले असून पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली. परिसरात अवैधरित्या ६ इंचाची नळजोडणी दिल्यामुळे परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती बागुल यांनी दिली. त्यामुळे अवैध नळजोडणी काढावी, वॉलमन नियमित ठेवणे आदी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका