शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

"कोरोना लसीकरण मोहिमेत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 12:20 IST

Shrikant Eknath Shinde : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील वर्ष २०२१-२२ साठीच्या अनुदान मागणीकरिता आयोजित चर्चेमध्ये सहभाग घेत विविध मुद्द्यांवर श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले.

ठळक मुद्देकेंद्रातील सरकार महाराष्ट्र राज्य सरकारशी दुजाभाव करत असल्याचे मत सभागृहात मांडले.

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने कोरोना विरोधी लढ्यात केलेल्या कडक उपाय योजना आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध केलेल्या जम्बो आरोग्य सुविधांबद्दल जागतिक आरोग्य यंत्रणा तसेच वॉशिंगटन पोस्टने राज्य सरकारचे कौतुक केले, परंतु केंद्र सरकारकडून मात्र दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. (Shiv Sena MP Dr Shrikant Eknath Shinde allegation on Central government for Corona vaccination campaign)

बुधवारी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील वर्ष २०२१-२२ साठीच्या अनुदान मागणीकरिता आयोजित चर्चेमध्ये सहभाग घेत विविध मुद्द्यांवर श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले. यावेळी केंद्रातील सरकार महाराष्ट्र राज्य सरकारशी दुजाभाव करत असल्याचे मत सभागृहात मांडले.

श्रीकांत शिंदेंनी सभागृहात मांडलेले मुद्दे...

१) केंद्रीय आरोग्य बजेटमध्ये १३७ टक्के वाढ न करता याउलट रु. ६००० ने कमी करत ७१,००० कोटी केले.

२) महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना या वैश्विक महामारीशी लढताना टेस्टिंगवर भर देत जास्तीत जास्त टेस्टिंग केले, कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढवणे, कमीत कमी वेळेत जम्बो आरोग्य सुविधा उपलब्ध केल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांवर उपचार करता आले, याची जागतिक आरोग्य यंत्रणा तसेच वॉशिंगटन पोस्ट ने दखल घेत राज्य सरकारची कौतुकाने पाठ थोपटली.

३) महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९१ टक्के पेक्षा जास्त असून आतापर्यंत १ करोड टेस्ट केल्या आहेत. लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्यात ३३ टक्क्यांहून अधिक नागरिकांना लसीचे डोस मिळाले आहे जे उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांपेक्षा ही खुपच अधिक आहेत.

४) चर्चेदरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारने लसीकरणासंबंधीत केंद्राकडे केलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकार कडे २.२० करोड लशींच्या डोसची मागणी केली आहे, ज्यामुळे दरदिवशी सुमारे ५ लाख राज्यातील नागरिकांचे लसीकरण केले जाऊ शकते जेणेकरुन राज्यातील कोरोनाचे वाढते संक्रमणावर आळा बसेल. परंतु केंद्र सरकार कडून महाराष्ट्र सरकारला आतापर्यंत ६९ लाख डोस दिले असून अजून राज्यात २.८४ करोड डोसची गरज असून ती लवकरात लवकर पूर्ण करावी, ही मागणी करत सभागृहाचे लक्ष वेधले.

५) तसेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यात ३७६ कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली असताना २०९ लसीकरण केंद्रांना केंद्र सरकारने मंजुरी दिली असून उर्वरित १५८ लसीकरण केंद्रांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजूरी द्यावी, जेणेकरुन सद्यस्थितीत कोरोनाचे वाढत असलेले संक्रमण रोखण्याकरिता राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवत मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवता येईल, अशी मागणी देखील यावेळी केली.

६) १ लाख २०हजार कोटी बजेटची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलली असताना त्यापेक्षा खुप कमी रु.५०,००० कोटी इतका निधी मंजूर केला गेला आहे की जे  देशाच्या जीडीपीच्या फक्त १.८ टक्के आहे की जे आपल्या शेजारील श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान सारख्या छोट्या देशांच्या तुलनेने हे प्रमाण खुपच कमी आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी देशाच्या आरोग्य सक्षमीकरणाला अधिक प्राधान्य देणे अतिशय गरजेचे असल्याचे मत यावेळी मांडले. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेCorona vaccineकोरोनाची लस