शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

शिवसेना नेत्यांचा आपापल्या हंड्यांचा टेंभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:23 IST

शहरातील टेंभीनाका येथील दहीहंडीचे महत्त्व वाढवण्याकरिता एकच हंडी बांधा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली सूचना उच्च न्यायालयाच्या निर्बंध शिथिल करण्याच्या

ठाणे : शहरातील टेंभीनाका येथील दहीहंडीचे महत्त्व वाढवण्याकरिता एकच हंडी बांधा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली सूचना उच्च न्यायालयाच्या निर्बंध शिथिल करण्याच्या आदेशानंतर चक्क दुर्लक्षित करून चार नेत्यांच्या चार दहीहंड्या उभारण्याचा निर्णय झाला आहे.न्यायालयाच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून ठाण्यातील दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले होते. त्यामुळे ठाण्यात एकच मानाची हंडी उभारण्याची सूचना ठाकरे यांनी केली. फिफा अंडर सेव्हन्टीन वर्ल्ड कपचा माहोल याच एका दहीहंडीच्या ठिकाणी तयार करावा, असे ठाकरे यांचे मत होते. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहीहंडी स्व. आनंद दिघे यांनी सुुरू केली होती. तीच एकमेव मानाची दहीहंडी असावी, असे ठाकरे यांचे म्हणणे होते.ठाण्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि उत्सवाची एक परंपरा आहे. ठाण्यातील गणेशोत्सव म्हटले की, काही मोजक्याच गणेश मंडळांची नावे समोर येतात. नवरात्र आणि दहीहंडी उत्सव म्हटले की, टेंभीनाक्याचेच नाव कुणाच्याही डोळ्यांसमोर येते. टेंभीनाक्यावरील दिघे यांची हंडी मानाची म्हणून ओळखली जाते. दिघे होते, तोपर्यंत ठाण्यात एकच मानाची हंडी उभारली जात होती. त्या ठिकाणी समस्त शिवसैनिकांची गर्दी होत होती. परंतु, त्यांच्या निधनानंतर टेंभीनाक्याच्या एका हंडीच्या चार हंड्या झाल्या. टेंभीनाक्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरील जांभळीनाक्यावर खासदार राजन विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने दहीहंडी उत्सव सुरू केला. आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांनी दहीहंडी उत्सवाला एक वेगळा लौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांत हंड्या उभारून मतांची बेगमी करण्याचा मार्ग प्रशस्त केला. हळूहळू सेलिबे्रटींचा वावर, मीडिया हाइप करून व उंची-बक्षिसांची स्पर्धा यामुळे या उत्सवाला कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त करून देण्यातही त्यांचा वाटा आहे.दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडीच्या उंचीवर न्यायालयाने मर्यादा घातल्यानंतर दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले. गोविंदा पथकांची संख्यादेखील कमी झाली. न्यायालयाचा निकाल प्रलंबित असल्याने अनेक गोविंदा मंडळांनी थरांचा सराव सुरू केला नव्हता. ठाण्यातील शिवसेनेचेही न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. ठाण्यात चार दहीहंड्यांऐवजी टेंभीनाक्यावर एकच हंडी उभारावी, असा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तीन आमदार आणि एक खासदार यांची बैठक होऊन एकमताने घेण्यात आला, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.हंड्यांची संख्या वाढावी, हीच दिघेंची इच्छान्यायालयाचा निर्णय आला आणि निर्बंध शिथील झाल्याने एका दहीहंडीच्या निर्णयाला बाजूला सारून पुन्हा चार दहीहंड्या लावण्याचे ठरले. यासंदर्भात ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांना विचारले असता, असा कोणताच निर्णय झाला नव्हता. उलटपक्षी स्व. आनंद दिघे यांची शहरातील दहीहंड्यांची संख्या वाढावी, अशी भूमिका होती, असे शिंदे म्हणाले.