शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

विजयाच्या जल्लोषात शिवसेना-भाजपा वरचढ

By admin | Published: February 24, 2017 7:28 AM

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला.

पंकज पाटील /उल्हासनगरउल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. तर, शिवसेनेनेदेखील गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकून आपले वर्चस्व निर्माण केले. निवडणुकीचा पहिला कल हा पॅनल क्रमांक १७ मधून आला. या पॅनलमध्ये सर्व चारही जागा राष्ट्रवादीने जिंकल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र, जसजसे निकाल बाहेर पडू लागले, तसे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मर्यादित राहिले आणि मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांचीच गर्दी एकवटण्यास सुरुवात झाली. शिवसेनेसोबत भाजपाच्या विजयाचे निकाल लागत असल्याने दोन्ही पक्षांच्याच कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी दिसत होती. विजयी उमेदवारांच्या नावांचा जयघोष सर्वत्र घुमत होता. मतमोजणी कें द्राच्या बाहेर दोन्ही बाजूंना कार्यकर्त्यांची गर्दी झालेली होती. वाढती गर्दी पाहून पोलीसदेखील ती आवरण्याचा प्रयत्न करत होते. मतदान केंद्राप्रमाणेच शहरात पक्ष कार्यालयातदेखील कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. उमेदवारांचे कार्यालयही कार्यकर्त्यांनी भरलेले होते. भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कार्यालयात बसून निवडणुकीच्या निकालावर लक्ष ठेवण्यात येत होते. जसजसे निकाल पुढे येत होते, त्याप्रमाणे भाजपा कार्यालयात जल्लोष सुरू होता. मात्र, शिवसेनेच्या बाबतीत शहरातील शाखांमध्येच कार्यकर्ते बसून निकालाचा कल जाणून घेत होते. उल्हासनगरच्या निकालाची प्र्रतीक्षा सर्वांनाच असली, तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे खरे लक्ष उल्हासनगरपेक्षा मुंबई-ठाण्यावर जास्त होते. ज्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात होता, ते उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह मतमोजणीच्या ठिकाणी गेले होते. शिवसेना आणि भाजपाच्या पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी होती तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या कार्यालयांबाहेर शुकशुकाट पसरलेला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्या खाजगी कार्यालयात बसून इतर निकालांचा वेध घेण्याचे काम करीत होते. साई पक्षाच्या कार्यालयात सुरुवातीला नाराजीचे वातावरण होते. दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांच्या बाजूने एकही निकाल न आल्याने साई पक्ष मागे पडला की काय, अशी भीती होती. मात्र, निकालाच्या शेवटच्या सत्रात साई पक्षाच्या बाजूने चांगला निकाल लागल्याने साई पक्षाचा शेवट गोड झाला. अपेक्षित यश आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहील, एवढा आकडा गाठल्याने साई पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष भगवान भालेराव यांना ओमी कलानी यांनी पाडण्याचा प्रयत्न केला, तरीही ते निवडून आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रिपाइंच्या बाबतीत कहीं खुशी कहीं कम, अशी स्थिती निर्माण झाली होती. कुठे आसू तर कुठे हासूसत्तेची गणिते काहीही असली तरी विजयी उमेदवारांनी आनंद अत्यंत जल्लोषात साजरा केला. उमेदवार जरी मतमोजणी केंद्रात असले तरी बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. या जल्लोषात शिवसेना आणि भाजपा या दोन्हीच पक्षांचे झेंडे दिसत होते. तर, इतर पक्षांचे झेंडे मतमोजणी केंद्रापासून दूर राहिले. मतदान केंद्राप्रमाणेच शहरात पक्ष कार्यालयातदेखील कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. उमेदवारांचे कार्यालयही कार्यकर्त्यांनी भरलेले होते. शिवसेना आणि भाजपाच्या पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी होती तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या कार्यालयांबाहेर शुकशुकाट पसरलेला होता.