शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात सरपंचपदातही शिवसेना-भाजपात चुरस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:28 IST

थेट सरपंच निवडून देणा-या पहिल्याच निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपामध्येच सर्वाधिक चुरस दिसून आली.

ठाणे : थेट सरपंच निवडून देणा-या पहिल्याच निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपामध्येच सर्वाधिक चुरस दिसून आली. पुढील महिन्यात होणा-या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी या निवडणुकीतील कल महत्त्वाचा मानला जात होता. पण तो कोणत्याही एकाच पक्षाच्या बाजूने नाही.या निकालांनुसार भिवंडी तालुक्यात अपेक्षेप्रमाणे भाजपाने, तर कल्याणमध्ये शिवसनेने बाजी मारली. मुरबाडमध्ये परिसरानुसार भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात सरपंचपदे विखुरली गेली. शहापूरमध्ये शिवसेनेने एक पद जिंकले, तर दुसºयावर शिवसेना-भाजपा दोघांनीही दावा सांगितला आहे.भिवंडीतील १४ सरपंचपदांपैकी आठ भाजपाने ताब्यात राखली. राज्यात कोठेही भाजपाशी युती करणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका असली, तरी या तालुक्यातील एक जागा युतीने लढवून जिंकण्यात आली; तर शिवसेना चार पदांवर विजयी झाली. शहापूर तालुक्यात पाचपैकी तीन पदांसाठी निवडणूक झाली. पण त्यातील बाभळे या ठिकाणी कोणाचाच अर्ज न आल्याने ते रिक्त राहिले. कानवे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा सरपंच निवडून आला, तर चिखलगावात बिनविरोध निवडून आलेल्या पिंकी पवार या आमच्याच पक्षाच्या असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केला आहे. मुरबाड तालुक्यातील १३ पैकी चार सरपरंचपदे भाजपाच्या पदरात पडली आहेत, तर शिवसेना-राष्ट्रवादीने उरलेल्या नऊ पदांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या तालुक्यात मतदारांचा संमिश्र कौल दिसून आला.कल्याण तालुक्यातही नऊपैकी एक पद अर्ज न आल्याने रिक्त राहिले. उरलेल्यांपैकी पाच पदांवर शिवसेनेने विजय मिळवला. दोन जागा भाजपाने, तर एक अपक्षाने जिंकली. या चारही तालुक्यांत काँग्रेसला एकही पद न मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.नवी समीकरणांची जुळणी : दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे मानले जाते. त्यासाठी भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यावर सर्वांचे लक्ष आहे. त्यातील भिवंडीत भाजपाने बाजी मारली, तर शिवसेना दुसºया स्थानावर आहे.ंमुरबाडमध्ये भाजपाची स्थिती चांगली असल्याचे दिसून आले. पण तशीच स्थिती शिवसेना, राष्ट्रवादीचीही आहे. शहापूरमध्ये तुरळक सरपंचपंदे असल्याने त्या तालुक्याचा कल स्पष्ट होऊ शकलेला नाही.ंकल्याण तालुक्याने मात्र शिवसेनेला कौल दिल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निकालानंतर जिल्हा परिषदेसाठी नव्या समीकरणांची जुळणी सुरू होईल, असे चित्र आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा