शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

ठाणे जिल्ह्यात सरपंचपदातही शिवसेना-भाजपात चुरस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:28 IST

थेट सरपंच निवडून देणा-या पहिल्याच निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपामध्येच सर्वाधिक चुरस दिसून आली.

ठाणे : थेट सरपंच निवडून देणा-या पहिल्याच निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपामध्येच सर्वाधिक चुरस दिसून आली. पुढील महिन्यात होणा-या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी या निवडणुकीतील कल महत्त्वाचा मानला जात होता. पण तो कोणत्याही एकाच पक्षाच्या बाजूने नाही.या निकालांनुसार भिवंडी तालुक्यात अपेक्षेप्रमाणे भाजपाने, तर कल्याणमध्ये शिवसनेने बाजी मारली. मुरबाडमध्ये परिसरानुसार भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात सरपंचपदे विखुरली गेली. शहापूरमध्ये शिवसेनेने एक पद जिंकले, तर दुसºयावर शिवसेना-भाजपा दोघांनीही दावा सांगितला आहे.भिवंडीतील १४ सरपंचपदांपैकी आठ भाजपाने ताब्यात राखली. राज्यात कोठेही भाजपाशी युती करणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका असली, तरी या तालुक्यातील एक जागा युतीने लढवून जिंकण्यात आली; तर शिवसेना चार पदांवर विजयी झाली. शहापूर तालुक्यात पाचपैकी तीन पदांसाठी निवडणूक झाली. पण त्यातील बाभळे या ठिकाणी कोणाचाच अर्ज न आल्याने ते रिक्त राहिले. कानवे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा सरपंच निवडून आला, तर चिखलगावात बिनविरोध निवडून आलेल्या पिंकी पवार या आमच्याच पक्षाच्या असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केला आहे. मुरबाड तालुक्यातील १३ पैकी चार सरपरंचपदे भाजपाच्या पदरात पडली आहेत, तर शिवसेना-राष्ट्रवादीने उरलेल्या नऊ पदांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या तालुक्यात मतदारांचा संमिश्र कौल दिसून आला.कल्याण तालुक्यातही नऊपैकी एक पद अर्ज न आल्याने रिक्त राहिले. उरलेल्यांपैकी पाच पदांवर शिवसेनेने विजय मिळवला. दोन जागा भाजपाने, तर एक अपक्षाने जिंकली. या चारही तालुक्यांत काँग्रेसला एकही पद न मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.नवी समीकरणांची जुळणी : दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे मानले जाते. त्यासाठी भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यावर सर्वांचे लक्ष आहे. त्यातील भिवंडीत भाजपाने बाजी मारली, तर शिवसेना दुसºया स्थानावर आहे.ंमुरबाडमध्ये भाजपाची स्थिती चांगली असल्याचे दिसून आले. पण तशीच स्थिती शिवसेना, राष्ट्रवादीचीही आहे. शहापूरमध्ये तुरळक सरपंचपंदे असल्याने त्या तालुक्याचा कल स्पष्ट होऊ शकलेला नाही.ंकल्याण तालुक्याने मात्र शिवसेनेला कौल दिल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निकालानंतर जिल्हा परिषदेसाठी नव्या समीकरणांची जुळणी सुरू होईल, असे चित्र आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा