शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

शिवसेना-भाजपा पुन्हा श्रेयावरून आमनेसामने, विकासकामात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:54 IST

पालिका निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच चार नगरसेवकांच्या प्रभागात कामाच्या श्रेयावरुन राजकारण तापू लागले आहे.

मीरा रोड : पालिका निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच चार नगरसेवकांच्या प्रभागात कामाच्या श्रेयावरुन राजकारण तापू लागले आहे. मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये नवी जलवाहिनी टाकण्याचे काम प्रभागातील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी बंद पाडल्याने शिवसेनेच्या नगरसेविकांनी धरणे धरले आहे. श्रेय लाटण्यावरुन शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांत जुंपली असून यामुळे भाजपा व शिवसेनेत तणातणी वाढण्याची शक्यता आहे.शांतीनगरमधील सेक्टर दोनमध्ये बांधकाम सुरु असलेल्या जलकुंभातून सेक्टर १, २, शांती विहार व पूनम सागर कॉम्प्लेक्स भागातील नागरिकांची पाण्याची चणचण दूर करण्यासाठी ४०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर झाले आहे. त्याचे कंत्राटही देण्यात आले आहे.वास्तविक हे काम मागील पालिका कार्यकाळातील आहे. त्याला गेल्या आठवड्यात सुरवात झाली असून खोदकाम करुन मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी मी सातत्याने पत्रव्यव्हार केला होता आणि काम मंजूर होऊन त्याची सुरवात झाली, असा दावा सेनेच्या नगरसेविका दिप्ती भट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला.प्रभाग २० मध्ये भट या एकमेव शिवसेनेच्या, तर भाजपाचे अश्विन कासोदरिया, दिनेश जैन व हेतल परमार असे तीन नगरसेवक आहेत. पालिकेने सोमवारी स्वच्छता अभियान आयोजित केले होते. त्या दरम्यान ही जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असल्याचे भाजपा नगरसेवकांच्या लक्षात आले. आम्हीही या प्रभागातील नगरसेवक असल्याने प्रशासनाने कामाबद्दल तसेच ते सुरु करण्याबाबत माहिती द्यायला हवी होती. महापौर डिम्पल मेहता यांच्या हस्ते त्याचे भूमीपुजन करुन कामाची सुरवात करायला हवी होती, अशी भूमिका भाजपाच्या कासोदरीया, जैन व परमार या स्थानिक नगरसेवकांनी घेतली.या वादात काम बंद पडले. ठेकेदाराने काम बंद केल्याने शिवसेना नगरसेविका दिप्ती भट यांनी भाजपाच्या या तिन्ही नगरसेवकांविरोधात थेट आयुक्तांसह सेना आ. प्रताप सरनाईक आदींकडे तक्रार केली आहे. भाजपा नगरसेवकांनी जलवाहिनीचे काम बंद पाडून नागरिकांना पुरेसे पाणी मिळू नये म्हणून विकासकामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला.भाजपा नगरसेवकांच्या श्रेयवादाच्या राजकारणामुळे जनहिताची कामे बंद पाडणे ही मनमानी असून पालिका प्रशासन अशा चुकीच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन देते, हे निषेधार्ह आहे. जोपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु होणार नाही तोपर्यंत धरणे सुरुच ठेवणार असल्याचे भट म्हणाल्या.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना