शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

शिवसेना-भाजपा पुन्हा श्रेयावरून आमनेसामने, विकासकामात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:54 IST

पालिका निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच चार नगरसेवकांच्या प्रभागात कामाच्या श्रेयावरुन राजकारण तापू लागले आहे.

मीरा रोड : पालिका निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच चार नगरसेवकांच्या प्रभागात कामाच्या श्रेयावरुन राजकारण तापू लागले आहे. मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये नवी जलवाहिनी टाकण्याचे काम प्रभागातील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी बंद पाडल्याने शिवसेनेच्या नगरसेविकांनी धरणे धरले आहे. श्रेय लाटण्यावरुन शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांत जुंपली असून यामुळे भाजपा व शिवसेनेत तणातणी वाढण्याची शक्यता आहे.शांतीनगरमधील सेक्टर दोनमध्ये बांधकाम सुरु असलेल्या जलकुंभातून सेक्टर १, २, शांती विहार व पूनम सागर कॉम्प्लेक्स भागातील नागरिकांची पाण्याची चणचण दूर करण्यासाठी ४०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर झाले आहे. त्याचे कंत्राटही देण्यात आले आहे.वास्तविक हे काम मागील पालिका कार्यकाळातील आहे. त्याला गेल्या आठवड्यात सुरवात झाली असून खोदकाम करुन मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी मी सातत्याने पत्रव्यव्हार केला होता आणि काम मंजूर होऊन त्याची सुरवात झाली, असा दावा सेनेच्या नगरसेविका दिप्ती भट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला.प्रभाग २० मध्ये भट या एकमेव शिवसेनेच्या, तर भाजपाचे अश्विन कासोदरिया, दिनेश जैन व हेतल परमार असे तीन नगरसेवक आहेत. पालिकेने सोमवारी स्वच्छता अभियान आयोजित केले होते. त्या दरम्यान ही जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असल्याचे भाजपा नगरसेवकांच्या लक्षात आले. आम्हीही या प्रभागातील नगरसेवक असल्याने प्रशासनाने कामाबद्दल तसेच ते सुरु करण्याबाबत माहिती द्यायला हवी होती. महापौर डिम्पल मेहता यांच्या हस्ते त्याचे भूमीपुजन करुन कामाची सुरवात करायला हवी होती, अशी भूमिका भाजपाच्या कासोदरीया, जैन व परमार या स्थानिक नगरसेवकांनी घेतली.या वादात काम बंद पडले. ठेकेदाराने काम बंद केल्याने शिवसेना नगरसेविका दिप्ती भट यांनी भाजपाच्या या तिन्ही नगरसेवकांविरोधात थेट आयुक्तांसह सेना आ. प्रताप सरनाईक आदींकडे तक्रार केली आहे. भाजपा नगरसेवकांनी जलवाहिनीचे काम बंद पाडून नागरिकांना पुरेसे पाणी मिळू नये म्हणून विकासकामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला.भाजपा नगरसेवकांच्या श्रेयवादाच्या राजकारणामुळे जनहिताची कामे बंद पाडणे ही मनमानी असून पालिका प्रशासन अशा चुकीच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन देते, हे निषेधार्ह आहे. जोपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु होणार नाही तोपर्यंत धरणे सुरुच ठेवणार असल्याचे भट म्हणाल्या.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना