शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

काव्यनिर्मिती होण्यासाठी अनुभवांची शिदोरी महत्वाची -  कवी अशोक बागवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 15:33 IST

शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी प्रसाद कुळकर्णी ( साद ) यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन मराठी ग्रंथ संग्रहालय , सरस्वती सभागृह,येथे कवी अशोक बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. महेश पाटील, आशा दोंदे , स्वरूपाराणी उबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ठळक मुद्देकाव्यनिर्मिती होण्यासाठी अनुभवांची शिदोरी महत्वाची -  कवी अशोक बागवेकवी प्रसाद कुळकर्णी ( साद ) यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशनशिदोरी काव्यसंग्रहातील कवितांचे केले काव्यगायन

ठाणे : " काळावर ठसा उमटविणारी कविता निर्माण होण्यासाठी  अनुभवांची ' शिदोरी ' महत्वाची आहे.' असे मत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशन आणि संवाद - सृजन प्रतिष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या कवी प्रसाद कुळकर्णी यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत  होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. महेश पाटील, आशा दोन्दे, स्वरूपाराणी उबाळे ,कवी प्रसाद कुळकर्णी, प्रकाशक संतोष राणे ई. मान्यवर उपस्थित होते.

          अशोक बागवे पुढे म्हणाले " , शोकाचे रूपांतर श्लोकात करण्याची प्रतिभा कविंमधे असते. दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जो अनुभव आपण घेतो तो योग्य अभिव्यक्तिद्वारे मांडणे म्हणजे कविता होय. कविने अनुभवांच्या वेणेतून गेल्याशिवाय  उत्कृष्ट काव्यनिर्मिती होणार नाही. केवळ नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी कवितेतून लागणारे फलक आणि ते लावणारे नंतर गायब होतात . कारण त्यात सिद्धिपेक्षा प्रसिद्धि महत्वाची असते. खरा कवी प्रसिद्धिच्या मागे लागत नाही . त्याची कविताच त्याला प्रसिद्ध करते." कवी प्रसाद कुळकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले ", शिदोरी काव्यसंग्रहातील विविध कविता मुंबईच्या ट्रैफिक मधे सुचल्या आहेत. ट्रैफिक मुळे तासनतास गाडीत अडकल्यानंतर चिड़चिड़ कण्यापेक्षा ' मना शांत हो'  असे शब्द उमटू लागले. त्यामधूनच कवितेच्या निर्मितीचे सूत्र गवसले. ट्रैफिकमुळे चिडूंन न जाता मनातल्या मनात स्फुरलेल्या ओळी पाठ करून घरी आल्यावर लिहून काढू लागलो . त्यामुळेच शिदोरी काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. यावेळी डॉ. महेश पाटील, आशा दोन्दे , स्वरूपाराणी उबाळे , प्रकाशक संतोष राणे यांचीही भाषणे झाली . सचिन पेंडसे, बलका मुखर्जी , प्राजक्ता देशमुख , योगेश कुळकर्णी , प्रसाद कुळकर्णी यांनी शिदोरी काव्यसंग्रहातील कवितांचे काव्यगायन केले .

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई