शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

करवाढीवरून जयस्वाल विरुद्ध शिंदे!

By admin | Updated: April 1, 2017 06:09 IST

करवाढीवरून जयस्वाल विरुद्ध शिंदे! मालमत्ताकरामध्ये १० टक्क्यांची वाढ सुचवणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाची महासभेपूर्वीच चिरफाड सुरू झाली आहे.

राजू ओढे / ठाणेमालमत्ताकरामध्ये १० टक्क्यांची वाढ सुचवणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाची महासभेपूर्वीच चिरफाड सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी करमाफ करण्याचे वचन देणारी सत्ताधारी शिवसेना करवाढीविरोधात, तर प्रशासन करवाढीच्या बाजूने असल्यामुळे नजीकच्या काळात अधिकारी विरुद्ध पदाधिकारी असा सामना या मुद्यावर रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.ठाणे पालिकेचा ३३९० कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी महासभेला सादर केला. ठाणेकरांसाठी नवनवीन प्रकल्प घेऊन आलेल्या अर्थसंकल्पात मालमत्ताकर १० टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. शासकीय करांसह मालमत्ताकराच्या वसुलीतून महापालिकेस २0१६-१७ मध्ये ३९० कोटींचे उत्पन्न मिळाले. मार्चअखेरच्या काही दिवसांमधील उत्पन्न यामध्ये जोडल्यास ही रक्कम अंदाजे ४०० कोटींच्या घरात जाईल. प्रस्तावित करवाढीनंतर या उत्पन्नात ८० कोटी रुपयांची भर पडेल, असा प्रशासनाला विश्वास आहे. महापालिकेच्या एकूण उत्पन्नामध्ये हा वाटा फारसा नसला तरी ठाणेकरांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी एकेक रुपया महत्त्वाचा असल्याची भूमिका आयुक्तांनी स्पष्ट केली आहे. दुसरीकडे महापालिकेतील सत्तारूढ पक्ष करवाढीच्या मुद्यावर कोणत्याही परिस्थितीत नमते घेण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. सेनेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी, तर अर्थसंकल्पाच्या एकूण मांडणीवरच आक्षेप घेतला आहे. पाच वर्षांचे विकासाचे नियोजन डोळ्यांसमोर ठेवणे वेगळे आणि ते प्रत्यक्षात उतरवणे वेगळे असते. विकासाचे नियोजन करण्यास हरकत नाही. मोठमोठे प्रकल्प उभारण्यासही हरकत नाही. परंतु अर्थसंकल्पाची मोठी तरतूद या मोठ्या प्रकल्पांवरच केली, तर सामान्य ठाणेकरांच्या लहानसहान समस्यांचे काय होईल, असा प्रश्न महापौरांनी ‘लोकमत’कडे केला. पादचारी पथापासून स्वच्छतागृहापर्यंतच्या अनेक समस्या इतरांना किरकोळ वाटत असल्या, तरी त्या सोडवणे नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. मूलभूत सुविधांचा विकास हा ठाणेकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असून महासभेमध्ये या मुद्यावर जोरकस चर्चा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम व्हाव्यातवेगवेगळ्या करांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालत असतो. त्यामुळे जकात किंवा स्थानिक संस्थाकर शासनाने रद्द करणे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राणवायूचा पुरवठाच बंद करण्यासारखे आहे. करवाढीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सक्षमतेकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आ. निरंजन डावखरे यांनी अधोरेखित केली.प्रशासनाची राजकीय खेळी५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना मालमत्ताकरातून सूट देण्याची घोषणा शिवसेनेने निवडणुकीपूर्वी केली होती. आता याच पक्षाची महापालिकेत सत्ता असताना प्रशासनाने करवाढ प्रस्तावित करून एकप्रकारे सत्तारूढ पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेली ही करवाढ म्हणजे एकप्रकारची राजकीय खेळी असल्याची कुजबूजही महापालिका वर्तुळात आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात महासभा होण्याची शक्यता आहे. ही महासभा प्रशासनाची खेळी कशाप्रकारे परतवून लावते, हे पाहण्यासारखे राहणार आहे.करवाढ रद्द करू : आयुक्तांनी प्रस्तावित केलेली मालमत्ताकरवाढ अंतिम नाही. महासभेमध्ये या विषयावर विस्तृत चर्चा केली जाईल. करमाफीचे वचन सेनेने निवडणुकीपूर्वी दिले होते. त्याची आम्हाला जाणीव आहे. करमाफी तडकाफडकी शक्य नसली तरी, टप्प्याटप्प्याने आम्ही ती नक्कीच करू. परंतु, मालमत्ताकरवाढ असो किंवा घनकचरा शुल्क असो, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त बोजा ठाणेकरांवर अजिबात लादला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली.करमाफी वाटते तेवढी सोपी नाही अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित केलेल्या करवाढीच्या माध्यमातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न वगळले, तरी त्यामुळे एकूणच नियोजन गडगडणार नाही. परंतु, विकासाच्या दृष्टीने एकेकरुपया निश्चितच महत्त्वाचा आहे. शिवाय, मालमत्ताकरमाफीचा विषय वाटतो, तेवढा सोपा नाही. एकट्या महापालिकेने ठरवले म्हणून लोकांना करमाफ करता येणार नाही. हा तांत्रिक मुद्दा आहे. अशाप्रकारची करमाफी करण्यापूर्वी राज्य शासनाची परवानगी अनिवार्य असते, असे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे....आता करून दाखवाच : महापालिका आयुक्तांनी उत्पन्नवाढीसाठी गेल्या २ वर्षांमध्ये भरीव कामगिरी केली. निवासी मालमत्तांना कोणत्याही प्रकारची करवाढ ठाणेकरांना झेपणारी नाही, हे खरे आहे. परंतु, निवडणुकीपूर्वीकरमाफीच्या आणि ‘करून दाखवले’च्या घोषणा करणाऱ्या सत्तारूढ पक्षाने ठाणेकरांचा विश्वासघात केला आहे. आता ही करवाढ सत्तारूढ पक्षाने रद्द करून दाखवावी, असे आव्हान आ. संजय केळकर यांनी दिले.