शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

करवाढीवरून जयस्वाल विरुद्ध शिंदे!

By admin | Updated: April 1, 2017 06:09 IST

करवाढीवरून जयस्वाल विरुद्ध शिंदे! मालमत्ताकरामध्ये १० टक्क्यांची वाढ सुचवणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाची महासभेपूर्वीच चिरफाड सुरू झाली आहे.

राजू ओढे / ठाणेमालमत्ताकरामध्ये १० टक्क्यांची वाढ सुचवणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाची महासभेपूर्वीच चिरफाड सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी करमाफ करण्याचे वचन देणारी सत्ताधारी शिवसेना करवाढीविरोधात, तर प्रशासन करवाढीच्या बाजूने असल्यामुळे नजीकच्या काळात अधिकारी विरुद्ध पदाधिकारी असा सामना या मुद्यावर रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.ठाणे पालिकेचा ३३९० कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी महासभेला सादर केला. ठाणेकरांसाठी नवनवीन प्रकल्प घेऊन आलेल्या अर्थसंकल्पात मालमत्ताकर १० टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. शासकीय करांसह मालमत्ताकराच्या वसुलीतून महापालिकेस २0१६-१७ मध्ये ३९० कोटींचे उत्पन्न मिळाले. मार्चअखेरच्या काही दिवसांमधील उत्पन्न यामध्ये जोडल्यास ही रक्कम अंदाजे ४०० कोटींच्या घरात जाईल. प्रस्तावित करवाढीनंतर या उत्पन्नात ८० कोटी रुपयांची भर पडेल, असा प्रशासनाला विश्वास आहे. महापालिकेच्या एकूण उत्पन्नामध्ये हा वाटा फारसा नसला तरी ठाणेकरांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी एकेक रुपया महत्त्वाचा असल्याची भूमिका आयुक्तांनी स्पष्ट केली आहे. दुसरीकडे महापालिकेतील सत्तारूढ पक्ष करवाढीच्या मुद्यावर कोणत्याही परिस्थितीत नमते घेण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. सेनेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी, तर अर्थसंकल्पाच्या एकूण मांडणीवरच आक्षेप घेतला आहे. पाच वर्षांचे विकासाचे नियोजन डोळ्यांसमोर ठेवणे वेगळे आणि ते प्रत्यक्षात उतरवणे वेगळे असते. विकासाचे नियोजन करण्यास हरकत नाही. मोठमोठे प्रकल्प उभारण्यासही हरकत नाही. परंतु अर्थसंकल्पाची मोठी तरतूद या मोठ्या प्रकल्पांवरच केली, तर सामान्य ठाणेकरांच्या लहानसहान समस्यांचे काय होईल, असा प्रश्न महापौरांनी ‘लोकमत’कडे केला. पादचारी पथापासून स्वच्छतागृहापर्यंतच्या अनेक समस्या इतरांना किरकोळ वाटत असल्या, तरी त्या सोडवणे नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. मूलभूत सुविधांचा विकास हा ठाणेकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असून महासभेमध्ये या मुद्यावर जोरकस चर्चा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम व्हाव्यातवेगवेगळ्या करांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालत असतो. त्यामुळे जकात किंवा स्थानिक संस्थाकर शासनाने रद्द करणे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राणवायूचा पुरवठाच बंद करण्यासारखे आहे. करवाढीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सक्षमतेकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आ. निरंजन डावखरे यांनी अधोरेखित केली.प्रशासनाची राजकीय खेळी५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना मालमत्ताकरातून सूट देण्याची घोषणा शिवसेनेने निवडणुकीपूर्वी केली होती. आता याच पक्षाची महापालिकेत सत्ता असताना प्रशासनाने करवाढ प्रस्तावित करून एकप्रकारे सत्तारूढ पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेली ही करवाढ म्हणजे एकप्रकारची राजकीय खेळी असल्याची कुजबूजही महापालिका वर्तुळात आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात महासभा होण्याची शक्यता आहे. ही महासभा प्रशासनाची खेळी कशाप्रकारे परतवून लावते, हे पाहण्यासारखे राहणार आहे.करवाढ रद्द करू : आयुक्तांनी प्रस्तावित केलेली मालमत्ताकरवाढ अंतिम नाही. महासभेमध्ये या विषयावर विस्तृत चर्चा केली जाईल. करमाफीचे वचन सेनेने निवडणुकीपूर्वी दिले होते. त्याची आम्हाला जाणीव आहे. करमाफी तडकाफडकी शक्य नसली तरी, टप्प्याटप्प्याने आम्ही ती नक्कीच करू. परंतु, मालमत्ताकरवाढ असो किंवा घनकचरा शुल्क असो, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त बोजा ठाणेकरांवर अजिबात लादला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली.करमाफी वाटते तेवढी सोपी नाही अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित केलेल्या करवाढीच्या माध्यमातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न वगळले, तरी त्यामुळे एकूणच नियोजन गडगडणार नाही. परंतु, विकासाच्या दृष्टीने एकेकरुपया निश्चितच महत्त्वाचा आहे. शिवाय, मालमत्ताकरमाफीचा विषय वाटतो, तेवढा सोपा नाही. एकट्या महापालिकेने ठरवले म्हणून लोकांना करमाफ करता येणार नाही. हा तांत्रिक मुद्दा आहे. अशाप्रकारची करमाफी करण्यापूर्वी राज्य शासनाची परवानगी अनिवार्य असते, असे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे....आता करून दाखवाच : महापालिका आयुक्तांनी उत्पन्नवाढीसाठी गेल्या २ वर्षांमध्ये भरीव कामगिरी केली. निवासी मालमत्तांना कोणत्याही प्रकारची करवाढ ठाणेकरांना झेपणारी नाही, हे खरे आहे. परंतु, निवडणुकीपूर्वीकरमाफीच्या आणि ‘करून दाखवले’च्या घोषणा करणाऱ्या सत्तारूढ पक्षाने ठाणेकरांचा विश्वासघात केला आहे. आता ही करवाढ सत्तारूढ पक्षाने रद्द करून दाखवावी, असे आव्हान आ. संजय केळकर यांनी दिले.