शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शीळफाटा-भिवंडी महामार्गाची रखडपट्टी सुरूच; ३९० कोटींचा प्रकल्प चार ते पाच महिने पडणार लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:59 IST

रस्ते विकास महामंडळाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कल्याण-भिवंडी या दोन शहरांच्या विकासात मैलाचा दगड समजल्या जाणाºया शीळफाटा ते भिवंडी या महामार्गाचे रुंदीकरण आणखी चार ते पाच महिने लांबणीवर पडणार आहे.

- नारायण जाधवठाणे : रस्ते विकास महामंडळाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कल्याण-भिवंडी या दोन शहरांच्या विकासात मैलाचा दगड समजल्या जाणाºया शीळफाटा ते भिवंडी या महामार्गाचे रुंदीकरण आणखी चार ते पाच महिने लांबणीवर पडणार आहे.३९० कोटी खर्चाच्या या एकूण प्रकल्पापैकी चारवरून तो सहापदरी करण्याच्या कामाचे १९५ कोटी २० लाख रुपयांच्या कंत्राटाचे कार्यादेश जानेवारी महिन्यात दिल्यानंतर फेबु्रवारीमध्ये कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता जून महिना उजाडला, तरी त्यास मुहूर्त सापडलेला नाही. आता त्यास पावसाळ्यानंतर सुरुवात होणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शंकर धोटे यांनी लोकमतला सांगितले.या ३९० कोटींपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाटा १५० कोटी, तर रस्ते विकास महामंडळाचा हिस्सा २४० कोटींचा राहणार आहे. हा निधी एमएसआरडीसी खासगी संस्थाकडून कर्ज घेऊन उभारणार आहे.दररोज ६० हजार वाहनांची येजाशीळफाटा ते भिवंडी हा २१.६ किमीचा मार्ग सध्या चौपदरी असून तो सहापदरी करण्यात येणार आहे. यामुळे केवळ कल्याण-भिवंडी ही दोन शहरेच नव्हे तर मुंबई, ठाणे शहरांसह नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरातून बाहेर पडणारी ६० हजारांवर वाहने या मार्गावरून दररोज येजा करतात. भिवंडी हे गोदामांचे माहेरघर असल्याने बीपीटी, जेएनपीटीसह ठाणे-बेलापूर, डोंबिवली आणि अंबरनाथसह तळोजा-रसायनी एमआयडीसीतून बाहेर पडणाºया वाहनांचा यात समावेश आहे. यात ३० टक्के कंटेनर एकट्या जेएनपीटीतून येजा करतात.दोन हेक्टर जमिनीचे संपादन बाकीया मार्गाच्या रुंदीकरणात २५ व्यापारी आस्थापना बाधित होणार आहेत. शिवाय, काही ठिकाणी दोन कल्व्हर्टच्या कामांसह इतर कामांचा समावेश आहे. त्यासाठी दोन हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.जोडरस्त्याच्या कामासाठी जमिनीच्या भूसंपादनाची अडचणमहाराष्ट्र शासनाच्या २५ मे २०१८ च्या नव्या आदेशानुसार यापुढे पुलांचे बांधकाम जोडरस्त्यांना लागणाºया जमिनीचे संपादन झाल्याशिवाय करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. जोडरस्त्यांना लागणाºया जमिनीचे भूसंपादन झाले नसल्याने प्रकल्पाची किंमत वाढून त्याचा पूर्णत्वाचा कालावधी रेंगाळत असल्याने कॅगसह लोकलेखा समितीने सार्वजनिक बांधकाम विभागावर ताशेरे ओढले आहेत.यामुळे २५ मे २०१८ रोजी नव्याने हे आदेश काढले आहेत. शीळफाटा-भिवंडी मार्गाच्या रुंदीकरणासाठीही दोन हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ती अद्याप ताब्यात आली नसल्याने २५ मे च्या आदेशानुसार कार्यवाही केल्यास या मार्गाचे आणखी लांबणीवर पडण्याची भीती आहे.यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहनचालक वाहतूककोंडीतून सुटका कधी होईल, या प्रतीक्षेत आहेत. कारण आधी हा मार्ग उन्नत करण्याच्या मागणीवरून रखडला होता. मात्र, उन्नतची हौस मागे सोडल्यानंतर आता कार्यादेश देऊनही तो रखडला आहे.

टॅग्स :thaneठाणे