शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शीळफाटा-भिवंडी महामार्गाची रखडपट्टी सुरूच; ३९० कोटींचा प्रकल्प चार ते पाच महिने पडणार लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:59 IST

रस्ते विकास महामंडळाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कल्याण-भिवंडी या दोन शहरांच्या विकासात मैलाचा दगड समजल्या जाणाºया शीळफाटा ते भिवंडी या महामार्गाचे रुंदीकरण आणखी चार ते पाच महिने लांबणीवर पडणार आहे.

- नारायण जाधवठाणे : रस्ते विकास महामंडळाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कल्याण-भिवंडी या दोन शहरांच्या विकासात मैलाचा दगड समजल्या जाणाºया शीळफाटा ते भिवंडी या महामार्गाचे रुंदीकरण आणखी चार ते पाच महिने लांबणीवर पडणार आहे.३९० कोटी खर्चाच्या या एकूण प्रकल्पापैकी चारवरून तो सहापदरी करण्याच्या कामाचे १९५ कोटी २० लाख रुपयांच्या कंत्राटाचे कार्यादेश जानेवारी महिन्यात दिल्यानंतर फेबु्रवारीमध्ये कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता जून महिना उजाडला, तरी त्यास मुहूर्त सापडलेला नाही. आता त्यास पावसाळ्यानंतर सुरुवात होणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शंकर धोटे यांनी लोकमतला सांगितले.या ३९० कोटींपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाटा १५० कोटी, तर रस्ते विकास महामंडळाचा हिस्सा २४० कोटींचा राहणार आहे. हा निधी एमएसआरडीसी खासगी संस्थाकडून कर्ज घेऊन उभारणार आहे.दररोज ६० हजार वाहनांची येजाशीळफाटा ते भिवंडी हा २१.६ किमीचा मार्ग सध्या चौपदरी असून तो सहापदरी करण्यात येणार आहे. यामुळे केवळ कल्याण-भिवंडी ही दोन शहरेच नव्हे तर मुंबई, ठाणे शहरांसह नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरातून बाहेर पडणारी ६० हजारांवर वाहने या मार्गावरून दररोज येजा करतात. भिवंडी हे गोदामांचे माहेरघर असल्याने बीपीटी, जेएनपीटीसह ठाणे-बेलापूर, डोंबिवली आणि अंबरनाथसह तळोजा-रसायनी एमआयडीसीतून बाहेर पडणाºया वाहनांचा यात समावेश आहे. यात ३० टक्के कंटेनर एकट्या जेएनपीटीतून येजा करतात.दोन हेक्टर जमिनीचे संपादन बाकीया मार्गाच्या रुंदीकरणात २५ व्यापारी आस्थापना बाधित होणार आहेत. शिवाय, काही ठिकाणी दोन कल्व्हर्टच्या कामांसह इतर कामांचा समावेश आहे. त्यासाठी दोन हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.जोडरस्त्याच्या कामासाठी जमिनीच्या भूसंपादनाची अडचणमहाराष्ट्र शासनाच्या २५ मे २०१८ च्या नव्या आदेशानुसार यापुढे पुलांचे बांधकाम जोडरस्त्यांना लागणाºया जमिनीचे संपादन झाल्याशिवाय करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. जोडरस्त्यांना लागणाºया जमिनीचे भूसंपादन झाले नसल्याने प्रकल्पाची किंमत वाढून त्याचा पूर्णत्वाचा कालावधी रेंगाळत असल्याने कॅगसह लोकलेखा समितीने सार्वजनिक बांधकाम विभागावर ताशेरे ओढले आहेत.यामुळे २५ मे २०१८ रोजी नव्याने हे आदेश काढले आहेत. शीळफाटा-भिवंडी मार्गाच्या रुंदीकरणासाठीही दोन हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ती अद्याप ताब्यात आली नसल्याने २५ मे च्या आदेशानुसार कार्यवाही केल्यास या मार्गाचे आणखी लांबणीवर पडण्याची भीती आहे.यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहनचालक वाहतूककोंडीतून सुटका कधी होईल, या प्रतीक्षेत आहेत. कारण आधी हा मार्ग उन्नत करण्याच्या मागणीवरून रखडला होता. मात्र, उन्नतची हौस मागे सोडल्यानंतर आता कार्यादेश देऊनही तो रखडला आहे.

टॅग्स :thaneठाणे