शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘ती’ बनवते आत्मनिर्भर आणि स्वावलंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 23:59 IST

शारीरिक व्यंग असलेल्या मुलांना शक्य तितके स्वत:चे काम स्वत: करायला लावून स्वावलंबी बनवतात.

स्नेहा पावसकर ठाणे : दिव्यांग मुलांनाही सर्वांसोबत शिकण्याच्या दृष्टीने अर्थात सर्वसमावेशित शिक्षण देण्याचा कायदा आहे. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वांमध्ये सामावून घेऊन शिक्षण देऊन आणि पुढील आयुष्यात त्यांचे अपंगत्व विसरून त्यांना स्वावलंबी आणि विशेषत: आत्मनिर्भर करण्यासाठी मदत करीत आहेत, त्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र.-१३0 च्या शिक्षिका आशा तेलंगे.

अपंगत्वावर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्ती कमी नाहीत, पण त्यासाठी गरज असते ती त्यांच्या कुटुंब, समाज आणि शाळा या घटकांनी त्यांना सर्वांगीणदृष्ट्या सक्षम करण्याची. आपल्या शाळेत प्रवेश घेतल्यावर अशाच दिव्यांग मुलांना समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आशा तेलंगे या कार्यरत आहेत. मुळात या मुलांना इतर मुलांना स्वीकारायला लावणे, त्यांच्याबद्दल मनातील किळस दूर करायला लावणे, त्या मुलांना चिडवायचे नाही, हसायचे नाही, ही भावना त्या तयार करतात.

शारीरिक व्यंग असलेल्या मुलांना शक्य तितके स्वत:चे काम स्वत: करायला लावून स्वावलंबी बनवतात. गेल्या वर्षी आशा यांच्या वर्गात पाच दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत होते. आतापर्यंत त्यांच्याकडून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहून उदरनिर्वाह करत आहेत. कोणी दोन्ही पायांनी अपंग असून मैत्रिणींना सोबत घेऊन बचत गट चालवते, कोणी घरच्या घरी इतर मुलांच्या शिकवण्या घेते, तर कोणी कर्णबधिर असूनही हातशिलाई करते. सध्याच्या काळात मास्क, पिशव्या शिवून संसार सांभाळते. अशा दिव्यांग पण स्वावलंबी असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास संपल्यावरही आशा मार्गदर्शन आणि सहकार्य करतात.

शिक्षकी पेशात आल्यापासून मला अशा मुलांसाठी काम करण्याची संधी प्राधान्याने मिळाली. आरपीडब्ल्यूडी अ‍ॅक्ट २0१६ नुसार या मुलांना सर्वसमावेशित शिक्षण देणे सक्तीचे आहे. मात्र, त्याआधीही माझ्या शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना मी शिकवायचे. या माझ्या कार्यात मला विद्यार्थ्यांचे पालक, सहकारी, मुख्याध्यापक, ठाणे मनपाचे सर्व अधिकारी यांचे सहकार्य मिळते. त्यामुळेच हे काम शक्य होते. - आशा तेलंगे, शिक्षिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे