शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:38 IST

पालघर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर रिक्तपदांमुळे अतिरिक्त ताण : दुर्गम भागातील गरीब उपेक्षित रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळणे दुरापास्त

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी २२ कोविड केअर सेंटर, ५ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि ४ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल अशा ३१ संस्थांची निर्मिती करून साथीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालया- अंतर्गत ३ उपजिल्हा रुग्णालये व ९ ग्रामीण रुग्णालयांतर्गत कामकाज चालविण्यासाठी उपलब्ध यंत्रणेवर रिक्त पदांमुळे मोठा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली जात नसल्याने आरोग्य सेवेवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या खाली ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३१२ उपकेंद्रे अशी भक्कम फळी उपलब्ध आहे. या केंद्रात महिन्याला सुमारे ४५ ते ५० हजार बाह्य रुग्ण सेवेसाठी येत असतात.जिल्हा निर्मितीला पाच वर्षे लोटली असून रिक्त पदांची पूर्तता करून घेण्यास कुठल्याही सरकारला शक्य झालेले नाही. जिल्हा शल्यचिकित्सक विभागांतर्गत एकूण ५०७ मंजूर पदांपैकी ३३८ पदे भरली गेली असून १६९ पदे रिक्त असल्याने उपलब्ध वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, परिचारिका आदींवर मोठा अतिरिक्त ताण पडत आहे. दुसरीकडे जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या अंतर्गत १ हजार ७१२ मंजूर पदांपैकी १ हजर २१५ पदे भरली असून ४९७ पदे रिक्त आहेत. रुग्णांना महत्त्वपूर्ण सेवा बजावणाºया वैद्यकीय अधिकारी श्रेणी अ व ब गटातील २९ पदे रिक्त असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब उपेक्षित रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. याचा मोठा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उभारलेल्या ३१ कोविड केंद्रातील उपचारासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी पुढे येत आहेत.तालुकानिहाय उपलब्ध रुग्णवाहिकापालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत.पालघर (५), वसई (१०), जव्हार (४), डहाणू (९),तलासरी (५), वाडा (८), विक्रमगड (३), मोखाडा (२)जिल्हा शल्य चिकित्सकपालघर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूची साथ निर्माण झाल्यानंतर बाधित रुग्णांवर उपचारासाठी २९ संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १२ उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांतील नॉन-कोविड रुग्णांच्या सेवेला कुठलाही धक्का न लावता अविरत सेवा पुरविली जात आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असून दर १५ दिवसांनी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.- डॉ. कांचन वानेरे,जिल्हा शल्यचिकित्सकआॅक्सिजन पुरवठाआॅक्सिजन पुरवठा व्यवस्थेतील गळतीच्या समस्या असून ४० व्हेंटिलेटरच्या पुरवठ्याबाबतही काहीशी अशीच समस्या असल्याच्या तक्रारी आहेत. निकृष्ट जेवण, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची व्यवस्था, बेड व्यवस्था आदीबाबत रुग्णांच्या कुरबुरी काही प्रमाणात सुरूच राहिल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येने पंधरा हजारांचा टप्पा पार केला असून त्यावर नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून रेमेडीसीवीर व वॅसिलोझुमिव्ह या प्रभावी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस