शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:38 IST

पालघर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर रिक्तपदांमुळे अतिरिक्त ताण : दुर्गम भागातील गरीब उपेक्षित रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळणे दुरापास्त

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी २२ कोविड केअर सेंटर, ५ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि ४ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल अशा ३१ संस्थांची निर्मिती करून साथीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालया- अंतर्गत ३ उपजिल्हा रुग्णालये व ९ ग्रामीण रुग्णालयांतर्गत कामकाज चालविण्यासाठी उपलब्ध यंत्रणेवर रिक्त पदांमुळे मोठा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली जात नसल्याने आरोग्य सेवेवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या खाली ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३१२ उपकेंद्रे अशी भक्कम फळी उपलब्ध आहे. या केंद्रात महिन्याला सुमारे ४५ ते ५० हजार बाह्य रुग्ण सेवेसाठी येत असतात.जिल्हा निर्मितीला पाच वर्षे लोटली असून रिक्त पदांची पूर्तता करून घेण्यास कुठल्याही सरकारला शक्य झालेले नाही. जिल्हा शल्यचिकित्सक विभागांतर्गत एकूण ५०७ मंजूर पदांपैकी ३३८ पदे भरली गेली असून १६९ पदे रिक्त असल्याने उपलब्ध वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, परिचारिका आदींवर मोठा अतिरिक्त ताण पडत आहे. दुसरीकडे जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या अंतर्गत १ हजार ७१२ मंजूर पदांपैकी १ हजर २१५ पदे भरली असून ४९७ पदे रिक्त आहेत. रुग्णांना महत्त्वपूर्ण सेवा बजावणाºया वैद्यकीय अधिकारी श्रेणी अ व ब गटातील २९ पदे रिक्त असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब उपेक्षित रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. याचा मोठा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उभारलेल्या ३१ कोविड केंद्रातील उपचारासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी पुढे येत आहेत.तालुकानिहाय उपलब्ध रुग्णवाहिकापालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत.पालघर (५), वसई (१०), जव्हार (४), डहाणू (९),तलासरी (५), वाडा (८), विक्रमगड (३), मोखाडा (२)जिल्हा शल्य चिकित्सकपालघर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूची साथ निर्माण झाल्यानंतर बाधित रुग्णांवर उपचारासाठी २९ संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १२ उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांतील नॉन-कोविड रुग्णांच्या सेवेला कुठलाही धक्का न लावता अविरत सेवा पुरविली जात आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असून दर १५ दिवसांनी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.- डॉ. कांचन वानेरे,जिल्हा शल्यचिकित्सकआॅक्सिजन पुरवठाआॅक्सिजन पुरवठा व्यवस्थेतील गळतीच्या समस्या असून ४० व्हेंटिलेटरच्या पुरवठ्याबाबतही काहीशी अशीच समस्या असल्याच्या तक्रारी आहेत. निकृष्ट जेवण, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची व्यवस्था, बेड व्यवस्था आदीबाबत रुग्णांच्या कुरबुरी काही प्रमाणात सुरूच राहिल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येने पंधरा हजारांचा टप्पा पार केला असून त्यावर नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून रेमेडीसीवीर व वॅसिलोझुमिव्ह या प्रभावी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस