शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 18:17 IST

 निरपेक्ष भावनेने मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार करणारे ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे गुरुवारी दुपारी अल्प आजाराने डोंबिवली येथे निधन झाले.

डोंबिवली -  निरपेक्ष भावनेने मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार करणारे ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे गुरुवारी दुपारी अल्प आजाराने डोंबिवली येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.  ग्रंथप्रसारक शरद जोशीसंगणक आणि खासगी उपग्रह वाहिन्यांच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृती धोक्यात आल्याची तसेच मराठी पुस्तकांची पहिलीच आवृत्ती संपायला अनेक वर्षे लागत असल्याची ओरड नेहमीच केली जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठी प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी वाचकांपर्यंत थेट पुस्तके पोहोचविण्यासाठी नवनवीन कल्पना आणि उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुस्तकांची चांगली विक्री होत असून त्यांच्या अनेक आवृत्याही निघत आहेत. वाचकांकडूनही या पुस्तकांना चांगली मागणी आहे. अक्षरधारा, साहित्ययात्रा आणि अन्य काही संस्था पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातूनही थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र स्वत ग्रंथविक्रेते किंवा प्रकाशक नसतानाही केवळ मराठी साहित्य आणि पुस्तकांच्या प्रेमापोटी उत्तमोत्तम आणि दर्जेदार मराठी पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने जोशी हे गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार संपूर्ण महाराष्टभर करत आहेत. आज वयाच्या ७३ व्या वर्षीही त्यांचे हे काम उत्साहाने सुरू  होते.ग्रंथप्रसारक शरद जोशी अशी त्यांची ओळख होती.पत्रव्यवहारातून ग्रंथप्रसार आणि प्रचार हे त्यांचे वैशिष्ट्य. आपल्या पदराला खार लावून आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांचे हे ग्रंथप्रचार आणि प्रसाराचे काम सुरू आहे. या निमित्ताने त्यांनी आजवर सुमारे पन्नास हजार पत्रे लिहिली आहेत. आपले मित्र, परिचित यांना किंवा कोणाला कुठला पुरस्कार मिळाला की त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवायचे आणि त्यात चांगल्या पुस्तकांची नावे, नुकतेच वाचलेले पुस्तक, त्याचे लेखक-प्रकाशक, पुस्तकाची थोडक्यात ओळख, वृत्तपत्रातून आलेली पुस्तकांची परीक्षणे आदी माहिती पत्रातून कळवायची. विविध साहित्यप्रेमी व्यक्ती, वाचक, पत्रकार, प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांनाही पत्र पाठवून हा ग्रंथप्रसार केला आहे.केवळ ठाणे, मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्टातील काही भागांसह कोलकाता, इंदूर, दिल्ली, अहमदाबाद येथे पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्रातून हा ग्रंथप्रसार सातत्याने सुरू असतो.पत्रलेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रातून मराठी साहित्य, लेखक, प्रकाशक तसेच एकूणच ग्रंथव्यवहाविषयी आलेले माहितीपूर्ण लेख, बातम्यांच्या झेरॉक्स कॉपी काढून त्याही मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींमध्ये वाटणे, चांगली पुस्तके लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रसंगी ओळखीच्या मंडळींकडे जाणे, त्यांना पुस्तकांविषयी माहिती देणे, ही पुस्तके त्यांनी विकत घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आदी कामेही एकीकडे सुरुच असतात. महाराष्टातून प्रसिद्ध होणारी लहान मासिके, साप्ताहिके यांना ते सातत्याने नवीन मराठी पुस्तके, मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाचे वृत्त, निवडक पुस्तकांची ओळख करून देणारे स्फूट लेखन पाठवत असतात. अनेकवेळा ग्रंथप्रसाराबाबत पत्रके प्रसिद्ध करून ती विविध संस्था, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांना पाठवतात तर मोठ्या समारंभातूनही ही पत्रके वाटतात. एक होता काव्हर्र, डॉ. आल्बर्ट श्वाईट्झर, शापित यक्ष, प्रकाशाची सावली आणि अन्य अनेक पुस्तकांचा त्यांनी धडाडीने प्रचार-प्रसार केला आहे. मराठी पुस्तकांच्या वाढत्या किंमती आणि त्यामुळे पुस्तके खरेदी केली जात नाहीत अशी लोकांकडून केली जाणारी तक्रार त्यांना मान्य नाही. सर्वच क्षेत्रात महागाई वाढली हे जर मान्य केले तर त्याचा परिणाम मराठी पुस्तकांच्या किंमतीवरही होणारच.बरे महागाई वाढली म्हणून नाटक, चित्रपट पाहणे, सहलीला जाणे, मॉलमध्ये खरेदी करणे किंवा कपडे, हॉटेलिंग तसेच अन्य गोष्टींवर केला जाणारा आणि वाढता खर्च आपण कमी केला आहे का, त्या बाबत आपण कधी तक्रार करतो का, या गोष्टींवर एकावेळी पाचशे ते हजारो रुपये खर्च होतातच ना, मग मराठी पुस्तकांच्या खरेदीसाठी थोडे पैसे खिशातून गेले तर काय फरक पडतो, असे ते समोरच्याला सांगतात. घरगुती कार्यक्रम, लग्न, मूंज, वाढदिवस आदी प्रसंगी उत्तम पुस्तके भेट द्यावीत, असा त्यांचा आग्रह असतो आणि हे केवळ नुसते सांगणे नसते तर ते स्वतही वेळोवेळी पुस्तके भेट देत असतात.आयडियल बुक डेपोतर्फे देण्यात येणारा वामन देशपांडे पुरस्कृत संत नामदेव पुरस्कार, सन्मित्रकार स. पां. जोशी स्मृती पुरस्कार, दोंडाईचा येथील साहित्य मंडळ, स्नेहवर्धन प्रकाशन, नवचैतन्य प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन, व्यास क्रिएशन्स आदी विविध संस्था व प्रकाशनांकडूनही त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ललित लेखक अशोक बेंडखळे यांच्या जगावेगळी माणसं तसेच पत्रकार व लेखक श्रीनिवास गडकरी यांच्या जगावेगळं काहीतरी या पुस्तकात ग्रंथप्रसाराविषयी लेख आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीnewsबातम्या