शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शांतीनगर अखेर फेरीवालामुक्त!

By admin | Updated: May 9, 2016 01:58 IST

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा आंदोलनाचा इशारा आणि काँग्रेसने छेडलेले उपोषण, यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने मीरा रोडच्या शांतीनगरमधील बेकायदा

मीरा रोड/भार्इंदर : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा आंदोलनाचा इशारा आणि काँग्रेसने छेडलेले उपोषण, यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने मीरा रोडच्या शांतीनगरमधील बेकायदा फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे परिसरातील रहिवासी, व्यापारी व वाहनचालाकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या कारवाईत सातत्य राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शांतीनगरमधील सेक्टर-१, २ तसेच परिसरातील रस्ते अरु ंद आहेत. तेथे ना-फेरीवाला क्षेत्र असतानाही फेरीवाल्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली होती. नागरिकांना तेथे चालणे अवघड झाले होते. फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी दुकानदार व रहिवाशांनी केली होती. त्यानुसार, काँग्रेसचे सभापती प्रमोद सामंत, जुबेर इनामदार यांनी २७ दिवस पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. परंतु, त्याचा राजकीय फायदा काँग्रेसला मिळेल, अशी भीती सत्ताधारी भाजपाला वाटू लागल्याने त्यांनी प्रशासनावर दबाव आणून कारवाई बंद पाडली.दुसरीकडे भाजपा आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, स्थानिक शिवसेना नगरसेवक प्रशांत दळवी, भाजपा नगरसेवक डॉ. नयना वसाणी, दीप्ती भट, सीमा शाह, दिनेश जैन, अश्विन कासोदारिया यांनी तर धरणे आंदोलन करत फेरीवाले हटवण्याची मागणी केली. परंतु, भाजपा सत्तेत असूनही फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाही. दळवी यांनी तर नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा दिलेला इशारा फुसका ठरला. पण, आयुक्तांनी मोठ्या फौजफाट्यासह येथील दुकानदारांनी केलेली वाढीव बांधकामे जेसीबी लावून जमीनदोस्त करत दळवींना चांगलाच धक्का दिला. दुकानांवर कारवाई झाली, पण फेरीवाले मात्र खुलेआम रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने अनेकांनी दळवी, महापौर जैन, आमदार मेहता यांच्याबद्दल नाराजीचा सूर लावला. दरम्यान, काँग्रेसने फेरीवाले हटवण्यासाठी बेमदुत उपोषण सुरू केले. आमदार मुझफ्फर हुसेन, सभापती प्रमोद सामंत यांनी आक्र मक भूमिका घेतली. त्याचबरोबर आमदार सरनाईक यांनीही फेरीवाले न हटवल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा लेखी इशाराच पालिकेला दिला. भाजपाच्या स्थानिक नगरसेवक दीप्ती भट, अश्विन कसोदारिया, दिनेश जैन यांनीही सरनाईक यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होण्याबाबतचे पत्र पालिकेला दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)