शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘सातारा पॅटर्न’: शंभूराज देसाई; उपाययोजना करण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 08:38 IST

राज्यात महिला सुरक्षेसाठी ‘सातारा पॅटर्न’ राबविण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: ठाण्यात शुक्रवारी एका रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केला. अशा घटना घडू नयेत. महिला, तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना पोलिसांना दिल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी दिली. साताऱ्यात महिला सुरक्षा पथकाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि राज्यात महिला सुरक्षेसाठी ‘सातारा पॅटर्न’ राबविण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

देसाई यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात महिला सुरक्षेसंदर्भात शनिवारी बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त जयजित सिंह, सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) सुरेश जाधव, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

देसाई म्हणाले की, शुक्रवारी घडलेल्या घटनेची माहिती कळल्यानंतर तातडीने पोलीस आयुक्तांशी बोलून कारवाईच्या सूचना दिल्या. संबंधित तरुणींनी तक्रार दाखल केल्यानंतर दोन ते तीन पथके बनवून आरोपीचा शोध घेतला आणि रात्री त्याला अटक केली. असे प्रकार वरचेवर घडू नयेत यासाठी शनिवारी पोलीस दलाबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. अशा घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासच्या परिसरांत साध्या वेशातील महिलांची नेमणूक करणे; तसेच बिट मार्शलच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयातील युवतींसोबत अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, याकरिता महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढविण्यास सांगितले आहे. 

वाहनांसाठी प्रस्ताव…

साताऱ्यात महिला सुरक्षा पथकाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. पोलीस आयुक्तालयास दुचाकी व चारचाकी वाहने व इतर साधनांसाठी पोलीस आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले. 

उपाययोजना करण्याची सूचना

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील ११२ या क्रमांकावरील प्रतिसादाचा वेळ हा राज्यात सर्वात अधिक आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर पाच मिनिटांच्या आत पोलीस जागेवर पोहोचतात. मात्र, शनिवारसारखा दुर्दैवी प्रकार घडू नये, यासाठी व महिला, तरुणींना सुरक्षितता वाटण्यासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

समन्वयाने कारवाई

ठाण्यातील रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याच्या व जादा प्रवासी वाहतूक करीत असल्याच्या प्रश्नांवर पोलीस दल व परिवहन विभागाच्या समन्वयाने कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाई