शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘सातारा पॅटर्न’: शंभूराज देसाई; उपाययोजना करण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 08:38 IST

राज्यात महिला सुरक्षेसाठी ‘सातारा पॅटर्न’ राबविण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: ठाण्यात शुक्रवारी एका रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केला. अशा घटना घडू नयेत. महिला, तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना पोलिसांना दिल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी दिली. साताऱ्यात महिला सुरक्षा पथकाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि राज्यात महिला सुरक्षेसाठी ‘सातारा पॅटर्न’ राबविण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

देसाई यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात महिला सुरक्षेसंदर्भात शनिवारी बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त जयजित सिंह, सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) सुरेश जाधव, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

देसाई म्हणाले की, शुक्रवारी घडलेल्या घटनेची माहिती कळल्यानंतर तातडीने पोलीस आयुक्तांशी बोलून कारवाईच्या सूचना दिल्या. संबंधित तरुणींनी तक्रार दाखल केल्यानंतर दोन ते तीन पथके बनवून आरोपीचा शोध घेतला आणि रात्री त्याला अटक केली. असे प्रकार वरचेवर घडू नयेत यासाठी शनिवारी पोलीस दलाबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. अशा घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासच्या परिसरांत साध्या वेशातील महिलांची नेमणूक करणे; तसेच बिट मार्शलच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयातील युवतींसोबत अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, याकरिता महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढविण्यास सांगितले आहे. 

वाहनांसाठी प्रस्ताव…

साताऱ्यात महिला सुरक्षा पथकाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. पोलीस आयुक्तालयास दुचाकी व चारचाकी वाहने व इतर साधनांसाठी पोलीस आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले. 

उपाययोजना करण्याची सूचना

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील ११२ या क्रमांकावरील प्रतिसादाचा वेळ हा राज्यात सर्वात अधिक आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर पाच मिनिटांच्या आत पोलीस जागेवर पोहोचतात. मात्र, शनिवारसारखा दुर्दैवी प्रकार घडू नये, यासाठी व महिला, तरुणींना सुरक्षितता वाटण्यासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

समन्वयाने कारवाई

ठाण्यातील रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याच्या व जादा प्रवासी वाहतूक करीत असल्याच्या प्रश्नांवर पोलीस दल व परिवहन विभागाच्या समन्वयाने कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाई