शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘सातारा पॅटर्न’: शंभूराज देसाई; उपाययोजना करण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 08:38 IST

राज्यात महिला सुरक्षेसाठी ‘सातारा पॅटर्न’ राबविण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: ठाण्यात शुक्रवारी एका रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केला. अशा घटना घडू नयेत. महिला, तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना पोलिसांना दिल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी दिली. साताऱ्यात महिला सुरक्षा पथकाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि राज्यात महिला सुरक्षेसाठी ‘सातारा पॅटर्न’ राबविण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

देसाई यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात महिला सुरक्षेसंदर्भात शनिवारी बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त जयजित सिंह, सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) सुरेश जाधव, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

देसाई म्हणाले की, शुक्रवारी घडलेल्या घटनेची माहिती कळल्यानंतर तातडीने पोलीस आयुक्तांशी बोलून कारवाईच्या सूचना दिल्या. संबंधित तरुणींनी तक्रार दाखल केल्यानंतर दोन ते तीन पथके बनवून आरोपीचा शोध घेतला आणि रात्री त्याला अटक केली. असे प्रकार वरचेवर घडू नयेत यासाठी शनिवारी पोलीस दलाबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. अशा घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासच्या परिसरांत साध्या वेशातील महिलांची नेमणूक करणे; तसेच बिट मार्शलच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयातील युवतींसोबत अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, याकरिता महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढविण्यास सांगितले आहे. 

वाहनांसाठी प्रस्ताव…

साताऱ्यात महिला सुरक्षा पथकाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. पोलीस आयुक्तालयास दुचाकी व चारचाकी वाहने व इतर साधनांसाठी पोलीस आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले. 

उपाययोजना करण्याची सूचना

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील ११२ या क्रमांकावरील प्रतिसादाचा वेळ हा राज्यात सर्वात अधिक आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर पाच मिनिटांच्या आत पोलीस जागेवर पोहोचतात. मात्र, शनिवारसारखा दुर्दैवी प्रकार घडू नये, यासाठी व महिला, तरुणींना सुरक्षितता वाटण्यासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

समन्वयाने कारवाई

ठाण्यातील रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याच्या व जादा प्रवासी वाहतूक करीत असल्याच्या प्रश्नांवर पोलीस दल व परिवहन विभागाच्या समन्वयाने कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाई