शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘शबरी’ योजना रखडलेलीच

By admin | Updated: April 25, 2017 00:04 IST

शबरी घरकुल योजनेतील शहापूर येथील ३१५ पैकी १२१ घरांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता देऊनही काम सुरू झाले नसल्याची

ठाणे : शबरी घरकुल योजनेतील शहापूर येथील ३१५ पैकी १२१ घरांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता देऊनही काम सुरू झाले नसल्याची बाब ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी घेतलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या कामांच्या आढावा बैठकीत समोर आली. त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरताना दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या घरकुल योजनेच्या येत्या आठ दिवसांत स्वतंत्र बैठका घेऊन आढावा घेण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), चौदाव्या वित्त आयोगानुसार प्राप्त निधी इत्यादी योजनांचा आढावा भुसे यांनी क्रमवार घेतला. शबरी घरकुल योजनेतील शहापूर येथील ३१५ पैकी १२१ घरांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता देऊनही काम सुरू झाले नसल्याची बाब यावेळी समोर आली. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरताना त्यांनी प्रत्येकाला घर मिळावे, असे शासनाचे धोरण असताना मंजूर झालेल्या घरांचे काम सुरू होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाणे जिल्हा परिषदेच्या घरकुल योजनांचा येत्या आठ दिवसांत स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्याचे आदेश ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल झाल्याबद्दल तसेच जलयुक्तमध्ये चांगले काम झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केले. जनसुविधा योजनांचा तालुकानिहाय आढावा घ्यावा, असेही त्यांनी सुचवले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सादरीकरण केले.राज्यमंत्र्यांनी चौदाव्या वित्त आयोगातील प्राप्त निधीचा विनियोग, आमचे गाव, आमचा विकास कार्यक्र म, पेसा ग्रामपंचायती, तीर्थक्षेत्र विकास, सर्वशिक्षा अभियान, अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्त्यांचा विकास, अपंग कल्याण योजना, महिला बालकल्याण योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जिल्हा परिषद सेसमधून केली जाणारी कामे, बांधकाम विभाग आदींचा विस्तृत आढावा घेतला.खासदार कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीदेखील महत्त्वाच्या सूचना केल्या.सांसद आदर्श ग्राम योजनेची प्रगती अधिक वेगाने व्हावी, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भीमनवार यांनी कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मध्यम कुपोषित बालकांच्या घरी १५ दिवसांतून एकदा, तर तीव्र कुपोषित बालकांच्या घरी ८ दिवसांतून एकदा डॉक्टरांनी भेट देऊन तपासणी करावी, असे निर्देश दिल्याची माहिती दिली.उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनादेखील राज्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरवण्यात आले. या बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसान कथोरे, सुभाष भोईर, पांडुरंग बरोरा, शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, प्रकल्प अधिकारी रघुनाथ बामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, प्रवीण भावसार, जिल्हा कृषी अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, शिक्षणाधिकारी मीना यादव, समाजकल्याण अधिकारी पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)