शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

अंबनाथच्या विश्वजीत मिडाेज परिसरात गटाराचे घाण सांडपाणी; नागरिकांमध्ये तीव्र संताप!

By सुरेश लोखंडे | Updated: July 9, 2024 15:49 IST

अंबरनाथ नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील पनवेलकर ट्वीन टाॅवर ते विश्वजीत मिडाेज या उच्चभ्र लाेकवस्तीच्या परिसरात गटारांमधील घाणीचे सांडणाी रस्त्यावर येऊन साथीच्या आजारांना निमंत्रण देत आहे

ठाणे : सध्या पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आराेग्यासह स्थानिक प्रशासन सक्रीय झाले आहे. पण अंबरनाथ नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील पनवेलकर ट्वीन टाॅवर ते विश्वजीत मिडाेज या उच्चभ्र लाेकवस्तीच्या परिसरात गटारांमधील घाणीचे सांडणाी रस्त्यावर येऊन साथीच्या आजारांना निमंत्रण देत आहे. आराेग्यास घातक असलेलया या समस्येकडे येथील रहिवाश्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र अजूनही त्याकडे प्रशासनाकडून गांभीयाने लक्ष दिले जात नसलयामुळे रहिवाश्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अंबरनाथ पूर्वच्या पनवेलकर ट्विन टॉवर ते विश्वजीत मिडोज, मोरीवली पाडा, येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी, सांडपाणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाहत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान या रस्त्याचे कॉक्रिटिकरण करण्यात आले तेव्हा केवळ एका बाजूने भूमिगत गटार करण्यात आले. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूमिगत गटार करण्याबाबत रहिवाशांनी विनंती केली असतानाही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता या उच्चभ्रू लाेकवस्तीच्या गृहसंकुलादरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी, सांडपाणी रस्त्यावर वाहत असून साचत आहे. पावसादरम्यान गुडघाभर पाण्यातून येजा करण्याचा प्रसंग या रहिवाश्यांकडून ऐकवला जात आहे.

निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी!

गटारीचे सतत वाहणाऱ्या घाण पाण्यामुळे रस्त्यावर शेवाळ झाले आहे. त्यावरून शाळेत जाणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर मात करण्यासाठी पनवेलकर ट्विन टॉवर ते विश्वजीत मिडोज, मोरीवली पाडा, अंबरनाथ पूर्व या रस्त्यावरील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची कारवाई तात्काळ करण्याची मागणी जाेर धरत आहे. सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्यास संभाव्या अपघात, जिवितहानीस अंबरनाथ नगरपरिषद जबाबदार राहील. या घाणीच्या सांडपाण्याच्या त्रासास कंटाळून आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या तयारी परिसरातील नागरीक करीत आहेत, असा इशाराही नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात करण्यात आलेला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ