शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सात हजार प्रवाशांची सुरक्षा एका पोलिसावर; ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कळंबोलीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:15 IST

आठ तास ड्युटीमुळे तीन शिफ्ट झाल्याने सध्या एका शिफ्टसाठी एका स्थानकावर दोन पोलीस दिले जात आहेत.

पंकज रोडेकरठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाणे रेल्वेस्थानक असो, या कळवा, मुंब्रा किंवा दिवा, या रेल्वेस्थानकांत प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच या पोलीस ठाण्याची हद्द ही थेट क ळंबोलीपर्यंत पसरलेली आहे. उपरोक्त या चार स्थानकांतून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही ११ लाखांच्या पुढे गेली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या मंजूर संख्येपेक्षा प्रवासी संख्या प्रचंड आहे. यामुळे एका पोलिसांच्या खांद्यावर सुमारे सात हजार प्रवाशांच्या सुरक्षेचा भार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द ही कोपरी ते दिवा आणि दिवा ते पुढे थेट कळंबोली अशी पसरलेली आहे. ठाणे ते दिवा या चार रेल्वेस्थानकात दिवसेंदिवस गर्दी वाढत असून, ठाणे आणि दिवा ही गर्दीची रेल्वेस्थानके म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. ठाण्यातून सुमारे सात ते आठ लाख प्रवासी दररोज ये-जा करतात. तर इतर तीन रेल्वे स्थानकांतील प्रवाशांची संख्या लक्षात घेतल्यास ती मिळून ११ लाखांच्या पुढे जात आहे. त्यातच जीआरपी पोलिसांच्या हद्दीत गतवर्षात घडणाºया चोरीच्या घटनांची संख्याही जवळपास चार हजारांच्या घरात गेली आहे. मात्र, जीआरपीच्या एकूण २०२ मंजूर पदांपैकी १९० इतकेच पोलीस अधिकारी-कर्मचारी सध्या कार्यरत असून त्यातील ४०-४५ जणांपैकी काही जण प्रतिनियुक्तीवर, आजारपणाच्या सुट्टीवर, गैरहजर, काही महिला पोलीस ह्या प्रसूती रजेवर गेल्याने अवघ्या १५० इतक्या पोलिसांवर पोलीस ठाण्यातील कामकाजासह प्रवासी सुरक्षेची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सरकारने तातडीने पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणी येथील प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.होमगार्ड कमी केल्याने वाढला कामाचा ताणमध्यंतरी जीआरपीच्या मदतीला ६० होमगार्ड आणि २२ महाराष्टÑ सुरक्षाबलाचे जवान तैनात होते. त्यातील ६० होमगार्डची फौज गेल्या काही दिवसांपूर्वी कमी केली गेली आहे. हे होमगार्ड जीआरपीसह रेल्वे फलाट, लोकलच्या महिला डब्यात आदी ठिकाणी पाहण्यास मिळत होते.

आठ तास ड्युटीमुळे तीन शिफ्ट झाल्याने सध्या एका शिफ्टसाठी एका स्थानकावर दोन पोलीस दिले जात आहेत. तर १२ तासांच्या शिफ्टसाठी चार पोलीस एका स्थानकाला दिले जात होते. ठाण्यासह कल्याण या रेल्वेस्थानकांच्या हद्द कमी करून तेथे दोन नवीन स्थानक तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

होमगार्ड कमी झाल्याने आलेल्या ताणासह मोठ्या हद्दीबरोबर चार प्रमुख स्थानकांवरील वाढत्या प्रवासी संख्येमुळे लोहमार्ग पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच प्रवासी संख्याही वाढत असली तरी पोलिसांची संख्या कधी वाढणार, असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस