शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पावणेसात लाख ठाणेकरांनी ना वाहतूक नियम पाळला, ना दंड भरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST

टेम्पलेट आहे जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असे वारंवार रस्ता सुरक्षा अभियानासारखी ...

टेम्पलेट आहे

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असे वारंवार रस्ता सुरक्षा अभियानासारखी मोहीम राबवून ठाणे शहर वाहतूक पोलीस आवाहन करीत आहेत. तरीही गेल्या वर्षभरात तब्बल सहा लाख ७१ हजार ८९१ बेफिकीर चालकांनी ना नियम पाळला, ना दंड भरला. गेल्या वर्षभरात २० कोटी ६७ लाख ४७ हजार ५०० इतकी दंडाची रक्कम चालकांनी थकविल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या महिनाभरात विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. नियम तोडून दंड न भरणाऱ्या वाहनचालकांविरुद्धही पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी डिसेंबर २०२० पासून विशेष मोहीम सुरू केली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात २६ कोटी ९८ लाख ८० हजार १५० इतका दंड चालकांनी थकविला होता. तो न भरल्यास वाहन जप्तीचाही इशारा ठाणे वाहतूक शाखेने दिल्यानंतर मात्र अगदी नामांकित सेलिब्रिटींसह काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही वाहतूक शाखेच्या कार्यालयांमध्ये जाऊन दंडाचा भरणा केला. आतापर्यंत सहा कोटींची थकबाकी वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारवाई - ६,७१,८९१

दंड - ६,२१,३२,६५०

अशी आहे आकडेवारी

कारवाई

नो पार्किंग - १,५६,०४८

धोकादायक वाहन - ९,७१५

ट्रिपल सीट - ७,७३१

विना परवाना - २,०५३

मोबाईलवर बोलणे - ९,७४३

अधिक वेग - २,८९१

.............................

कारवाई झालेले वाहनचालक -

वाहन चालकाकडील थकीत दंड -

कोट

फेब्रुवारी २०१९ पासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ई चलानद्वारे दंड वसुली सुरू केली. मात्र, यात दंड वसुलीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे वाहनधारकांवर कारवाईचा वचक राहत नव्हता. म्हणून डिसेंबर २०२० पासून आजतागायत प्रलंबित ई चलान दंड वसुली अभियान सुरू केले. आतापर्यंत तब्बल सहा कोटींपर्यंत दंड वसुली झाली. यात डिसेंबर या एकाच महिन्यात तीन कोटी २३ लाख इतकी विक्रमी दंड वसुली झाली. ही मोहीम तीव्रपणे राबविली जाणार आहे.

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

.................

...तर वाहन परवाना रद्द

दंड न भरल्यास एखाद्याचा वाहनपरवाना रद्द करण्याची तरतूद नाही. मात्र, वाहतूक नियम मोडणाऱ्या ६४७ वाहनचालकांचे परवाने गेल्या वर्षभरात निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठविला. यात अधिक वेगाचे १९, मोबाईलवर बोलणारे १०२, सिग्नल तोडणारे १११ आणि ४०९ मद्यपी वाहनचालकांचे परवाने निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.