शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पावणेसात लाख ठाणेकरांनी ना वाहतूक नियम पाळला, ना दंड भरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST

टेम्पलेट आहे जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असे वारंवार रस्ता सुरक्षा अभियानासारखी ...

टेम्पलेट आहे

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असे वारंवार रस्ता सुरक्षा अभियानासारखी मोहीम राबवून ठाणे शहर वाहतूक पोलीस आवाहन करीत आहेत. तरीही गेल्या वर्षभरात तब्बल सहा लाख ७१ हजार ८९१ बेफिकीर चालकांनी ना नियम पाळला, ना दंड भरला. गेल्या वर्षभरात २० कोटी ६७ लाख ४७ हजार ५०० इतकी दंडाची रक्कम चालकांनी थकविल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या महिनाभरात विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. नियम तोडून दंड न भरणाऱ्या वाहनचालकांविरुद्धही पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी डिसेंबर २०२० पासून विशेष मोहीम सुरू केली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात २६ कोटी ९८ लाख ८० हजार १५० इतका दंड चालकांनी थकविला होता. तो न भरल्यास वाहन जप्तीचाही इशारा ठाणे वाहतूक शाखेने दिल्यानंतर मात्र अगदी नामांकित सेलिब्रिटींसह काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही वाहतूक शाखेच्या कार्यालयांमध्ये जाऊन दंडाचा भरणा केला. आतापर्यंत सहा कोटींची थकबाकी वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारवाई - ६,७१,८९१

दंड - ६,२१,३२,६५०

अशी आहे आकडेवारी

कारवाई

नो पार्किंग - १,५६,०४८

धोकादायक वाहन - ९,७१५

ट्रिपल सीट - ७,७३१

विना परवाना - २,०५३

मोबाईलवर बोलणे - ९,७४३

अधिक वेग - २,८९१

.............................

कारवाई झालेले वाहनचालक -

वाहन चालकाकडील थकीत दंड -

कोट

फेब्रुवारी २०१९ पासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ई चलानद्वारे दंड वसुली सुरू केली. मात्र, यात दंड वसुलीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे वाहनधारकांवर कारवाईचा वचक राहत नव्हता. म्हणून डिसेंबर २०२० पासून आजतागायत प्रलंबित ई चलान दंड वसुली अभियान सुरू केले. आतापर्यंत तब्बल सहा कोटींपर्यंत दंड वसुली झाली. यात डिसेंबर या एकाच महिन्यात तीन कोटी २३ लाख इतकी विक्रमी दंड वसुली झाली. ही मोहीम तीव्रपणे राबविली जाणार आहे.

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

.................

...तर वाहन परवाना रद्द

दंड न भरल्यास एखाद्याचा वाहनपरवाना रद्द करण्याची तरतूद नाही. मात्र, वाहतूक नियम मोडणाऱ्या ६४७ वाहनचालकांचे परवाने गेल्या वर्षभरात निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठविला. यात अधिक वेगाचे १९, मोबाईलवर बोलणारे १०२, सिग्नल तोडणारे १११ आणि ४०९ मद्यपी वाहनचालकांचे परवाने निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.