शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पावणेसात लाख ठाणेकरांनी ना वाहतूक नियम पाळला, ना दंड भरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST

टेम्पलेट आहे जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असे वारंवार रस्ता सुरक्षा अभियानासारखी ...

टेम्पलेट आहे

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असे वारंवार रस्ता सुरक्षा अभियानासारखी मोहीम राबवून ठाणे शहर वाहतूक पोलीस आवाहन करीत आहेत. तरीही गेल्या वर्षभरात तब्बल सहा लाख ७१ हजार ८९१ बेफिकीर चालकांनी ना नियम पाळला, ना दंड भरला. गेल्या वर्षभरात २० कोटी ६७ लाख ४७ हजार ५०० इतकी दंडाची रक्कम चालकांनी थकविल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या महिनाभरात विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. नियम तोडून दंड न भरणाऱ्या वाहनचालकांविरुद्धही पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी डिसेंबर २०२० पासून विशेष मोहीम सुरू केली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात २६ कोटी ९८ लाख ८० हजार १५० इतका दंड चालकांनी थकविला होता. तो न भरल्यास वाहन जप्तीचाही इशारा ठाणे वाहतूक शाखेने दिल्यानंतर मात्र अगदी नामांकित सेलिब्रिटींसह काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही वाहतूक शाखेच्या कार्यालयांमध्ये जाऊन दंडाचा भरणा केला. आतापर्यंत सहा कोटींची थकबाकी वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारवाई - ६,७१,८९१

दंड - ६,२१,३२,६५०

अशी आहे आकडेवारी

कारवाई

नो पार्किंग - १,५६,०४८

धोकादायक वाहन - ९,७१५

ट्रिपल सीट - ७,७३१

विना परवाना - २,०५३

मोबाईलवर बोलणे - ९,७४३

अधिक वेग - २,८९१

.............................

कारवाई झालेले वाहनचालक -

वाहन चालकाकडील थकीत दंड -

कोट

फेब्रुवारी २०१९ पासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ई चलानद्वारे दंड वसुली सुरू केली. मात्र, यात दंड वसुलीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे वाहनधारकांवर कारवाईचा वचक राहत नव्हता. म्हणून डिसेंबर २०२० पासून आजतागायत प्रलंबित ई चलान दंड वसुली अभियान सुरू केले. आतापर्यंत तब्बल सहा कोटींपर्यंत दंड वसुली झाली. यात डिसेंबर या एकाच महिन्यात तीन कोटी २३ लाख इतकी विक्रमी दंड वसुली झाली. ही मोहीम तीव्रपणे राबविली जाणार आहे.

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

.................

...तर वाहन परवाना रद्द

दंड न भरल्यास एखाद्याचा वाहनपरवाना रद्द करण्याची तरतूद नाही. मात्र, वाहतूक नियम मोडणाऱ्या ६४७ वाहनचालकांचे परवाने गेल्या वर्षभरात निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठविला. यात अधिक वेगाचे १९, मोबाईलवर बोलणारे १०२, सिग्नल तोडणारे १११ आणि ४०९ मद्यपी वाहनचालकांचे परवाने निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.