शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील सेतू कार्यालय दीड वर्षांपासून बंद; नागरिकांमध्ये संताप !

By सुरेश लोखंडे | Updated: June 6, 2024 20:46 IST

प्रशासनाच्या बेफिकिरीबद्दल उल्हासनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त करून नागरिक आंदाेलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

ठाणे : उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाचे सेतू कार्यालय मागील दीड ते दाेन वर्षांपासून बंद आहे. ते सुरू करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून काेणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नाही. त्यामुळे विविध स्वरूपाच्या दाखल्यांसाठी खासगी सायबरकॅफे चालक गाेरगरीब गरजूंकडून ५०० रुपयांपर्यंतची रक्कम मनमानी पद्धतीने वसूल करीत आहेत. प्रशासनाच्या बेफिकिरीबद्दल उल्हासनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त करून नागरिक आंदाेलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

सध्या शालेय व महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. त्यांना शैक्षणिक कामासह विविध सरकारी कामांसाठी लागणारे दाखले, प्रमाणपत्र सेतू कार्यालयातून माफक शुल्कात मिळणे अपेक्षित आहे; पण सेतू कार्यालय दीड ते दाेन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे ३५ ते ७० रुपयांत मिळणारे दाखले खासगी सायबरकॅफेतून ५०० रुपये व त्यापेक्षाही अधिक शुल्क मनमानी पद्धतीने आकारून दाखले दिले जातात. आठ ते दहा दिवसांमध्ये दाखला मिळत नाही. या मनमानी व प्रशासनाच्या निष्काळजीपणा विराेधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संघटना तीव्र आंदाेलन छेडून तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत.

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाचा, जातीचा, नाॅनक्रिमिलिअर, डाेमीसाइल, रहिवासी असल्याचा आदी विविध दाखल्याची गरज आहे. याशिवाय गरीब, हाेतकरू सुशिक्षित बेराेजगारांना विविध याेजनांचा लाभ घेण्यासाठी दाखल्यांची गरज आहे. निराधार महिला, व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आदींना तहसीलदारांच्या स्वाक्षरीच्या दाखल्यांची गरज आहे.  

टॅग्स :thaneठाणे