शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

उल्हासनगरातील सेतू कार्यालय दीड वर्षांपासून बंद; नागरिकांमध्ये संताप !

By सुरेश लोखंडे | Updated: June 6, 2024 20:46 IST

प्रशासनाच्या बेफिकिरीबद्दल उल्हासनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त करून नागरिक आंदाेलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

ठाणे : उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाचे सेतू कार्यालय मागील दीड ते दाेन वर्षांपासून बंद आहे. ते सुरू करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून काेणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नाही. त्यामुळे विविध स्वरूपाच्या दाखल्यांसाठी खासगी सायबरकॅफे चालक गाेरगरीब गरजूंकडून ५०० रुपयांपर्यंतची रक्कम मनमानी पद्धतीने वसूल करीत आहेत. प्रशासनाच्या बेफिकिरीबद्दल उल्हासनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त करून नागरिक आंदाेलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

सध्या शालेय व महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. त्यांना शैक्षणिक कामासह विविध सरकारी कामांसाठी लागणारे दाखले, प्रमाणपत्र सेतू कार्यालयातून माफक शुल्कात मिळणे अपेक्षित आहे; पण सेतू कार्यालय दीड ते दाेन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे ३५ ते ७० रुपयांत मिळणारे दाखले खासगी सायबरकॅफेतून ५०० रुपये व त्यापेक्षाही अधिक शुल्क मनमानी पद्धतीने आकारून दाखले दिले जातात. आठ ते दहा दिवसांमध्ये दाखला मिळत नाही. या मनमानी व प्रशासनाच्या निष्काळजीपणा विराेधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संघटना तीव्र आंदाेलन छेडून तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत.

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाचा, जातीचा, नाॅनक्रिमिलिअर, डाेमीसाइल, रहिवासी असल्याचा आदी विविध दाखल्याची गरज आहे. याशिवाय गरीब, हाेतकरू सुशिक्षित बेराेजगारांना विविध याेजनांचा लाभ घेण्यासाठी दाखल्यांची गरज आहे. निराधार महिला, व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आदींना तहसीलदारांच्या स्वाक्षरीच्या दाखल्यांची गरज आहे.  

टॅग्स :thaneठाणे