शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
3
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
4
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
5
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
6
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
7
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
8
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
9
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
10
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
11
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
12
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
13
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
14
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
15
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
16
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
17
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
18
Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
19
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
20
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!

नोकरदार करताहेत खाडीतून जीवघेणा प्रवास; वाहतूककोंडीला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:12 IST

माणकोलीमार्गे ठाणे, मागील वर्षी एका व्यावसायिकाने या खाडीतून मनोरंजनासाठी फेरीबोट सुरू केली होती. मात्र, प्रतिसादाअभावी ती बंद पडली. त्या बोटीत प्रवाशांसाठी लाइफजॅकेट होते

डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावरील वाहतूककोंडीला कंटाळलेल्या शहरातील नोकरदारांनी पश्चिमेतील रेतीबंदर येथून खाडीतून बोटीने प्रवास करून माणकोलीमार्गे ठाणे गाठण्याचा शॉर्टकट शोधला आहे. मात्र, अपुरी सुरक्षेची साधने व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीतून जात असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरण्याची भीती आहे.

मोठागाव रेतीबंदर येथून खाडीतून पलीकडील वेहेळे गावाच्या तीरावर जाऊन माणकोली व पुढे ठाण्याला जाता येते. या खाडीतून वर्षानुवर्षे छोटी फेरीबोट चालते. त्यातून पलीकडील ग्रामस्थ, भाजीपाला, मच्छीविक्रेते डोंबिवलीत येजा करतात. पण, सध्या वेळ वाचवण्यासाठी नोकरदार या मार्गाने प्रवास करत आहेत. फेरीबोटीतून एका वेळी पाचसहा प्रवासी व नावाडी जाणे अपेक्षित असताना त्याहून अधिक जण प्रवास करत आहेत. प्रवाशांसाठी लाइफ जॅकेट व सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

मागील वर्षी एका व्यावसायिकाने या खाडीतून मनोरंजनासाठी फेरीबोट सुरू केली होती. मात्र, प्रतिसादाअभावी ती बंद पडली. त्या बोटीत प्रवाशांसाठी लाइफजॅकेट होते. बोटही आकाराने मोठी होती. संरक्षक कठडे होते. परंतु, सध्या नोकरदार येजा करत असलेल्या बोटींमध्ये अशा सुविधा नाहीत. दररोज वाहतूककोंडीत अडकण्यापेक्षा तसेच नोकरीवर गदा येऊ नये, म्हणून हा धोक्याचा मार्ग काहींनी पत्करला आहे. मेरीटाइम बोर्डाने अधिकृतपणे हा जलमार्ग सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, केंद्राच्या जलवाहतुकीच्या योजनेतून नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी हीच सुवर्णसंधी मानून येथे तातडीने चांगल्या दर्जाच्या आणि सुरक्षित बोटी द्याव्यात. तसेच मुख्यमंत्र्यांनीही मेरीटाइम बोर्डाकडून परवानगी देऊन येथील नोकरदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे.क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्यास संबंधितांना समज दिली जाईल. नागरिकांच्या जीवाला प्राधान्य देत ही कार्यवाही तातडीने केली जाईल. - राजेंद्र मुणगेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णूनगर पोलीस ठाणे

टॅग्स :MNSमनसे