शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नोकरदार करताहेत खाडीतून जीवघेणा प्रवास; वाहतूककोंडीला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:12 IST

माणकोलीमार्गे ठाणे, मागील वर्षी एका व्यावसायिकाने या खाडीतून मनोरंजनासाठी फेरीबोट सुरू केली होती. मात्र, प्रतिसादाअभावी ती बंद पडली. त्या बोटीत प्रवाशांसाठी लाइफजॅकेट होते

डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावरील वाहतूककोंडीला कंटाळलेल्या शहरातील नोकरदारांनी पश्चिमेतील रेतीबंदर येथून खाडीतून बोटीने प्रवास करून माणकोलीमार्गे ठाणे गाठण्याचा शॉर्टकट शोधला आहे. मात्र, अपुरी सुरक्षेची साधने व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीतून जात असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरण्याची भीती आहे.

मोठागाव रेतीबंदर येथून खाडीतून पलीकडील वेहेळे गावाच्या तीरावर जाऊन माणकोली व पुढे ठाण्याला जाता येते. या खाडीतून वर्षानुवर्षे छोटी फेरीबोट चालते. त्यातून पलीकडील ग्रामस्थ, भाजीपाला, मच्छीविक्रेते डोंबिवलीत येजा करतात. पण, सध्या वेळ वाचवण्यासाठी नोकरदार या मार्गाने प्रवास करत आहेत. फेरीबोटीतून एका वेळी पाचसहा प्रवासी व नावाडी जाणे अपेक्षित असताना त्याहून अधिक जण प्रवास करत आहेत. प्रवाशांसाठी लाइफ जॅकेट व सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

मागील वर्षी एका व्यावसायिकाने या खाडीतून मनोरंजनासाठी फेरीबोट सुरू केली होती. मात्र, प्रतिसादाअभावी ती बंद पडली. त्या बोटीत प्रवाशांसाठी लाइफजॅकेट होते. बोटही आकाराने मोठी होती. संरक्षक कठडे होते. परंतु, सध्या नोकरदार येजा करत असलेल्या बोटींमध्ये अशा सुविधा नाहीत. दररोज वाहतूककोंडीत अडकण्यापेक्षा तसेच नोकरीवर गदा येऊ नये, म्हणून हा धोक्याचा मार्ग काहींनी पत्करला आहे. मेरीटाइम बोर्डाने अधिकृतपणे हा जलमार्ग सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, केंद्राच्या जलवाहतुकीच्या योजनेतून नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी हीच सुवर्णसंधी मानून येथे तातडीने चांगल्या दर्जाच्या आणि सुरक्षित बोटी द्याव्यात. तसेच मुख्यमंत्र्यांनीही मेरीटाइम बोर्डाकडून परवानगी देऊन येथील नोकरदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे.क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्यास संबंधितांना समज दिली जाईल. नागरिकांच्या जीवाला प्राधान्य देत ही कार्यवाही तातडीने केली जाईल. - राजेंद्र मुणगेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णूनगर पोलीस ठाणे

टॅग्स :MNSमनसे