शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेच्या मतपेटीवर डल्ला, भाजपाची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:39 IST

हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेची मतपेटी उघडून ठाणे शहर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या ताकदीचा लाभ घेण्याकरिताच भाजपाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांत युतीची गरज भासू लागली आहे.

ठाणे : हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेची मतपेटी उघडून ठाणे शहर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या ताकदीचा लाभ घेण्याकरिताच भाजपाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांत युतीची गरज भासू लागली आहे. मागील निवडणुकीत मुस्लिम, दलितांची मते भाजपाला मिळाली. मात्र, देशभरात या दोन्ही समाजांवर संघ परिवारातील कार्यकर्त्यांनी हल्ले केल्याने ही मते गमवावी लागली, तर समविचारी पक्षाची मते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काबीज करून घसरता आलेख सावरणे, हा भाजपाचा हेतू आहे. त्याकरिता, ठाण्यात भाजपाला शिवसेनेची नितांत गरज आहे.मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपाला अभूतपूर्व यश लाभले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती असल्याने त्या पक्षालाही उत्तम यश लाभले. भाजपाच्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे व विकासाचे आश्वासन भावल्याने मुस्लिम, दलितांनी मते दिली होती. मात्र, आता तेच यश पुन्हा पदरात पडण्याची सुतराम शक्यता नाही. देशभर गोमांसावरून संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांवर हल्ले केले. दलित तरुणांच्या हत्या, मारहाण अशा घटना घडल्या. ख्रिश्चनांना लक्ष्य केले गेले. त्यामुळे मागील वेळी मिळालेली मते यावेळी भाजपा गमावणार आहे. मतांची ही घट भरून काढण्याकरिता भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा २०१९ च्या निवडणुकीत केंद्रस्थानी आणण्याचे निश्चित केले आहे. बुलेट ट्रेनपासून समृद्धी महामार्गापर्यंत भाजपा सरकारच्या अनेक विकास प्रकल्पांना शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची युती अशक्य आहे. साहजिकच, हिंदुत्वाचा मुद्दा, घसरती लोकप्रियता टिकवण्याकरिता आणि शिवसेनेसारख्या मित्रपक्षाला चुचकारण्याकरिता लाभदायक ठरणार आहे.मुंबई हा शिवसेनेचा गड राहिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बृहन्मुंबईत भाजपाचे १५, तर शिवसेनेचे १४ आमदार विजयी झाले. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी झाले. भाजपा व शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांतील अंतर हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढे होते. दोन्ही पक्षांची युती झाली, तर दोन्ही पक्षांना आपल्या जागा राखणे शक्य होईल. लोकसभा निवडणुकीत १८ जागांवर विजय मिळवणाऱ्या शिवसेनेला यावेळी युती झाली, तरच यातील बहुतांश जागा टिकवता येतील, असे दोन्ही पक्षांतील नेत्यांना वाटते. पालघर पोटनिवडणुकीत परस्परांविरुद्ध उमेदवार देण्यामागे हेच विस्तारवादाचे राजकारण होते.गिळणार नाही तर फोडणार या कात्रीत पक्षपंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेबद्दल काडीचेही प्रेम नाही. मात्र, गरजेपोटी शहा बुधवारी मातोश्रीची पायरी चढले. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या काळात युतीमध्ये असलेले भावनिक नाते संपुष्टात आले आहे.आता केवळ व्यावहारिक संबंध उरले आहेत. शिवसेनेच्या बलस्थानांचा लाभ घेऊन सत्ता हस्तगत करायची व हळूहळू शिवसेनेचे महत्त्व कमी करण्याकरिता खच्चीकरण करायचे, हीच भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाची कार्यपद्धती आहे, हे शिवसेनेलाही मान्य आहे.मात्र, भाजपासोबत गेले तर ते शिवसेनेला गिळण्याचा प्रयत्न करणार व गेले नाही तर शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणार, अशा कात्रीत सध्या शिवसेनेचे नेतृत्व सापडले आहे.

टॅग्स :thaneठाणे