शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

२५ वर्षांत सेनेने केला २० हजार कोटींचा चुराडा

By admin | Updated: February 20, 2017 05:57 IST

ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजार कोटींचा चुराडा होऊनही ठाणेकरांना

ठाणे : ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजार कोटींचा चुराडा होऊनही ठाणेकरांना सुविधा मिळाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.या वेळी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध न करता, २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काय केले, याचा ऊहापोह करणारा ‘पंचनामा’ जनतेसमोर सादर केला. या वेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. आव्हाड पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीच्या राज्यात ठाण्याला राज्य सरकार आणि केंद्राचा कोट्यवधींचा निधी मिळाला. मग, शिवसेनेने ठाण्याला काय दिले, काय केले अन् काय आणले, हा आमचा शिवसेनेला सवाल आहे. केेंद्र आणि राज्याकडून आलेल्या २० हजार कोटींच्या निधीत शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून आता ठाणेकर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीलाच ठाण्याची सत्ता देतील आणि ठाण्यात आघाडीचा महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर आनंद परांजपे यांनी एवढ्या निधीचा खर्च कोठे केला, याचा हिशेब जनतेला देणे गरजेचे असल्याचे सांगितले.शिवसेनेनी ठाण्याची कचराकुंडी केली. कळवा येथील मेडिकल कॉलेजचा बट्ट्याबोळ केला. या पांढऱ्या हत्तीला पोसून येथे शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला. ठाणे महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले. साधा कोपरीचा पूल यांना बांधता येईना आणि रिंगरूटची भाषा बोलून दाखवतात, असे आव्हाड म्हणाले. एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना ठाण्याचे पालकत्व स्वीकारून १००० दिवस झाले, मात्र त्यातील १५ मिनिटेही ठाणेकरांसाठी देता येत नसतील, तरया पालकमंत्र्यांचे करायचे काय? ठाण्याचे डम्पिंग होत असताना हे पालकमंत्री काहीच करू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. रिपाइं नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते जर मतदानानंतर शिवसेना आणि भाजपाला पुन्हा एकत्र आणणार असतील, तर ते आता आधुनिक चाणक्य झाले, असेच म्हणावे लागेल, असे आव्हाड म्हणाले. (प्रतिनिधी) खर्च कोणासाठी केला याची उत्तरे द्याठाणे महानगरपालिकेचा २०१६-१७ वर्षाचा २५४९.८२ कोटी एवढा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये पाण्यासाठी २५०.९८ कोटी, घनकचऱ्यासाठी २१८.३३ कोटी, मलनि:सारणासाठी ५९.७५ कोटी, परिवहनसाठी ४५.३६ कोटी आणि परिवहनच्या वित्तीय तुटीसाठी २४ कोटी, आरोग्यासाठी केवळ कळवा हॉस्पिटलसाठी १७.८७ कोटी व आरोग्य केंद्रांसाठी ५९.१९ कोटी, रस्तेबांधणी दुरु स्ती आदी कामांसाठी ८४२.१६ कोटी ठाणेकरांच्या एवढ्या निधीचा चुराडा एक वर्षात केला आहे. जर एवढा निधी खर्च झाला असेल, तर तो कोणत्या कामांमधून दिसतो आहे. कोणासाठी खर्च केला गेला, याची उत्तरे शिवसेनेने देणे गरजेचे असल्याचे मत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.