शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

२५ वर्षांत सेनेने केला २० हजार कोटींचा चुराडा

By admin | Updated: February 20, 2017 05:57 IST

ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजार कोटींचा चुराडा होऊनही ठाणेकरांना

ठाणे : ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजार कोटींचा चुराडा होऊनही ठाणेकरांना सुविधा मिळाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.या वेळी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध न करता, २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काय केले, याचा ऊहापोह करणारा ‘पंचनामा’ जनतेसमोर सादर केला. या वेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. आव्हाड पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीच्या राज्यात ठाण्याला राज्य सरकार आणि केंद्राचा कोट्यवधींचा निधी मिळाला. मग, शिवसेनेने ठाण्याला काय दिले, काय केले अन् काय आणले, हा आमचा शिवसेनेला सवाल आहे. केेंद्र आणि राज्याकडून आलेल्या २० हजार कोटींच्या निधीत शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून आता ठाणेकर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीलाच ठाण्याची सत्ता देतील आणि ठाण्यात आघाडीचा महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर आनंद परांजपे यांनी एवढ्या निधीचा खर्च कोठे केला, याचा हिशेब जनतेला देणे गरजेचे असल्याचे सांगितले.शिवसेनेनी ठाण्याची कचराकुंडी केली. कळवा येथील मेडिकल कॉलेजचा बट्ट्याबोळ केला. या पांढऱ्या हत्तीला पोसून येथे शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला. ठाणे महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले. साधा कोपरीचा पूल यांना बांधता येईना आणि रिंगरूटची भाषा बोलून दाखवतात, असे आव्हाड म्हणाले. एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना ठाण्याचे पालकत्व स्वीकारून १००० दिवस झाले, मात्र त्यातील १५ मिनिटेही ठाणेकरांसाठी देता येत नसतील, तरया पालकमंत्र्यांचे करायचे काय? ठाण्याचे डम्पिंग होत असताना हे पालकमंत्री काहीच करू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. रिपाइं नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते जर मतदानानंतर शिवसेना आणि भाजपाला पुन्हा एकत्र आणणार असतील, तर ते आता आधुनिक चाणक्य झाले, असेच म्हणावे लागेल, असे आव्हाड म्हणाले. (प्रतिनिधी) खर्च कोणासाठी केला याची उत्तरे द्याठाणे महानगरपालिकेचा २०१६-१७ वर्षाचा २५४९.८२ कोटी एवढा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये पाण्यासाठी २५०.९८ कोटी, घनकचऱ्यासाठी २१८.३३ कोटी, मलनि:सारणासाठी ५९.७५ कोटी, परिवहनसाठी ४५.३६ कोटी आणि परिवहनच्या वित्तीय तुटीसाठी २४ कोटी, आरोग्यासाठी केवळ कळवा हॉस्पिटलसाठी १७.८७ कोटी व आरोग्य केंद्रांसाठी ५९.१९ कोटी, रस्तेबांधणी दुरु स्ती आदी कामांसाठी ८४२.१६ कोटी ठाणेकरांच्या एवढ्या निधीचा चुराडा एक वर्षात केला आहे. जर एवढा निधी खर्च झाला असेल, तर तो कोणत्या कामांमधून दिसतो आहे. कोणासाठी खर्च केला गेला, याची उत्तरे शिवसेनेने देणे गरजेचे असल्याचे मत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.