शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
3
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
4
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
5
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
6
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
7
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
8
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
9
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
10
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
11
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
12
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
13
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
14
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
15
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
16
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
17
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
18
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
19
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
20
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का

२५ वर्षांत सेनेने केला २० हजार कोटींचा चुराडा

By admin | Updated: February 20, 2017 05:57 IST

ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजार कोटींचा चुराडा होऊनही ठाणेकरांना

ठाणे : ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजार कोटींचा चुराडा होऊनही ठाणेकरांना सुविधा मिळाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.या वेळी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध न करता, २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काय केले, याचा ऊहापोह करणारा ‘पंचनामा’ जनतेसमोर सादर केला. या वेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. आव्हाड पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीच्या राज्यात ठाण्याला राज्य सरकार आणि केंद्राचा कोट्यवधींचा निधी मिळाला. मग, शिवसेनेने ठाण्याला काय दिले, काय केले अन् काय आणले, हा आमचा शिवसेनेला सवाल आहे. केेंद्र आणि राज्याकडून आलेल्या २० हजार कोटींच्या निधीत शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून आता ठाणेकर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीलाच ठाण्याची सत्ता देतील आणि ठाण्यात आघाडीचा महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर आनंद परांजपे यांनी एवढ्या निधीचा खर्च कोठे केला, याचा हिशेब जनतेला देणे गरजेचे असल्याचे सांगितले.शिवसेनेनी ठाण्याची कचराकुंडी केली. कळवा येथील मेडिकल कॉलेजचा बट्ट्याबोळ केला. या पांढऱ्या हत्तीला पोसून येथे शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला. ठाणे महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले. साधा कोपरीचा पूल यांना बांधता येईना आणि रिंगरूटची भाषा बोलून दाखवतात, असे आव्हाड म्हणाले. एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना ठाण्याचे पालकत्व स्वीकारून १००० दिवस झाले, मात्र त्यातील १५ मिनिटेही ठाणेकरांसाठी देता येत नसतील, तरया पालकमंत्र्यांचे करायचे काय? ठाण्याचे डम्पिंग होत असताना हे पालकमंत्री काहीच करू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. रिपाइं नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते जर मतदानानंतर शिवसेना आणि भाजपाला पुन्हा एकत्र आणणार असतील, तर ते आता आधुनिक चाणक्य झाले, असेच म्हणावे लागेल, असे आव्हाड म्हणाले. (प्रतिनिधी) खर्च कोणासाठी केला याची उत्तरे द्याठाणे महानगरपालिकेचा २०१६-१७ वर्षाचा २५४९.८२ कोटी एवढा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये पाण्यासाठी २५०.९८ कोटी, घनकचऱ्यासाठी २१८.३३ कोटी, मलनि:सारणासाठी ५९.७५ कोटी, परिवहनसाठी ४५.३६ कोटी आणि परिवहनच्या वित्तीय तुटीसाठी २४ कोटी, आरोग्यासाठी केवळ कळवा हॉस्पिटलसाठी १७.८७ कोटी व आरोग्य केंद्रांसाठी ५९.१९ कोटी, रस्तेबांधणी दुरु स्ती आदी कामांसाठी ८४२.१६ कोटी ठाणेकरांच्या एवढ्या निधीचा चुराडा एक वर्षात केला आहे. जर एवढा निधी खर्च झाला असेल, तर तो कोणत्या कामांमधून दिसतो आहे. कोणासाठी खर्च केला गेला, याची उत्तरे शिवसेनेने देणे गरजेचे असल्याचे मत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.