शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 04:55 IST

ठाणे-पालघर जिल्हा : समायोजनाचे आदेश

सुरेश लोखंडे 

ठाणे: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांचे रिक्त असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांच्या पदांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करावे, असा शासन निर्णय सोमवारी एक आॅक्टोबर रोजी जारी करण्यात आल्यामुळे या २६ सहायकांना दिवाळीपूर्वीच दिवाळीभेट मिळाली आहे. गेली दोन वर्षे ते विनावेतन या पदावर काम करीत होते.

या अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना काढून टाकण्यात येणार होते. त्यांचे वेतनही बंद करण्यात आले होते. पण त्यांची नोकरी टिकावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लढा दिला. शासनदरबारी त्यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर यश येऊन अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांची नोकरी कायम राहिली. याशिवाय त्यांना रिक्त असलेल्या पूर्णवेळ सहायकांच्या पदांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्याचा निर्णय राज्य शासनास घ्यावा लागला.ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील २६ सहायकांचे आता ‘रिक्त’ असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकाच्या पदांवर, आकृतीबंध निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्याचा शासन आदेश उपसचिव चारूशीला चौधरी यांनी जारी केला. शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नसल्यामुळे दि. १२ फेब्रुवारी २०१५च्या शासन निर्णयानुसार उपरोक्त निर्णय घेणे शक्य झाले.या समायोजनासाठी लागू होणाऱ्या अटी शर्तींनुसार, पूर्णवेळ सहायकाचे त्या शाळेतील पद एकमेव असावे, समायोजन होण्यापूर्वीच्या वेतनाची मागणी करणार नाही, असे हमीपत्र संबंधीत अर्धवेळ प्रयोगशाळा सहायक यांच्याकडून घेण्यात येईल. पूर्णवेळ समायोजन करताना प्रथम तालुक्यामध्ये रिक्त असलेल्या संस्था, शाळांमध्ये समायोजना होणे अपेक्षित आहे. तालुक्यामध्ये पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायक पद रिक्त नसल्यास जिल्ह्यामध्ये संबंधीत सहायकाचे समायोजन करण्यात यावे, असेही उपसचिवांनी जारी केलेल्या या शासन आदेशात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन वर्षे केले बिनपगारी कामच्शिक्षक सेनेचे कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले की, सुमारे दोन वर्षांपासून या अर्धवेळ सहायकांनी बिनपगारी काम केले आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. दोन वर्षे बिनपगारी काम करूनही त्यांना नोकरीची शाश्वती नव्हती. नोकरीची टांगती तलवार डोक्यावर कायम असताना, शासनाने योग्य निर्णय घेऊन प्रयोगशाळा सहायकांना दिलासा दिला आहे. त्यांना आता या निर्णयामुळे न्याय मिळवून देणे शक्य झाले.

टॅग्स :thaneठाणेpalgharपालघर