शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

'चक्रीवादळ' आपत्तीवर मात करणाऱ्या सरावासाठी ठाण्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथची निवड

By सुरेश लोखंडे | Updated: November 2, 2023 17:33 IST

राज्यस्तरीय रंगीत तालीमसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली, अंबरनाथ एमआयडीसी व भिवंडी तालुक्यातील पडघा गाव आदींची निवड करण्यात आली आहे.

ठाणे : चक्रीवादळ आपत्तीवर मात करून ही आपत्ती निवारण्यासाठी कोकण किनार पट्टीमधील जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आली आहे. या राज्यस्तरीय रंगीत तालीमसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली, अंबरनाथ एमआयडीसी व भिवंडी तालुक्यातील पडघा गाव आदींची निवड करण्यात आली आहे. ९ नाेव्हेंबरराेजी या सरावाची रंगीत तालीम पार पडणार आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले.

संभाव्य चक्रीवादळ आपत्ती निवारणविषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन संबंधीत अधिकाऱ्यांना केले. या बैठकीला परदेशी यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ, तहसिलदार संजय भोसले, अंबरनाथच्या तहसिलदार प्रशांती माने आदींसह जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल, आपदग्रस्तांना वाचविण्यासाठी काय तयारी केली जाणार आहे, आपदग्रस्तांची कशा प्रकारे सुटका करणार आहे, आपत्तीच्या अनुषंगाने करण्यात येणारे उपाय योजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनाऱ्यावरील नागरिकांचे स्थलांतरण, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे, फूड पॅकेट आदींच्या तयारीची रंगीत तालीम या निवडलेल्या गांवामध्ये पार पडणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील तीन गावांमध्ये ही रंगीत तालीम होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्वच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. केंद्रीय स्तरावरून या रंगीत तालीमचे बारकाईने निरीक्षण करण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी यात गांभीर्याने सहभागी व्हावे, अशा सूचना परदेशी यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :thaneठाणेcycloneचक्रीवादळ