शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रवेशासाठी ९,३२६ बालकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:16 IST

प्रवेशाअभावी चिंता; प्रक्रिया पूर्ण करण्याची पालकांची मागणी

- सुरेश लोखंडे ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली जिल्ह्यातील नऊ हजार ३२६ बालकांची पहिली ते केजीच्या वर्गासाठी निवड झाली. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या या बालकांना जिल्ह्यातील ६६९ शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. मात्र, संबंधित शाळेत प्रवेशासाठी गेलेल्या या पालकांना सुटीचा बहाणा करून कार्यालयांमध्ये उभेही करीत नसत. पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या बालकांचे रखडलेले प्रवेश करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या खासगी, अनुदानित व विनाअनुदानित ६६९ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात १२ हजार ९१३ बालकांचे शालेय प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी २0 हजार ६६७ अर्ज आले असता त्यातून या नऊ हजार ३२६ विद्यार्थ्यांची पहिल्या लॉटरीद्वारे निवड झाली आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग आदी सर्व प्रवर्गातील निवड झालेल्या या बालकांचे प्रवेश कोरोनाचे संकट आणि शाळांच्या सुटीमुळे रखडले आहेत. परंतु, आता शाळांचे कार्यालयीन कामकाज सुरू असल्यामुळे या बालकांचे प्रवेश सोशल डिस्टन्सद्वारे करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात ११ हजार ५७४ बालकांना तर केजीच्या वर्गात एक हजार ३३९ बालकांचे प्रवेश आरटीईखाली निवड झालेल्या संबंधित शाळांमध्ये राखीव आहेत. या १२ हजार ९१३ राखीव जागांवरील प्रवेशासाठी नऊ हजार ३२६ बालकांची निवड झाली आहे. उर्वरित प्रवेश अर्जातील त्रुटी, अपूर्ण अर्ज, कागदपत्रांची कमतरता आदी कारणांखाली बहुतांश अर्ज बाद ठरले आहेत. मात्र, पात्र ठरलेले व निवड झाल्याचा मेसेज प्राप्त झालेल्या बालकांचे पालक संबंधित शाळांमध्ये सतत फेºया मारत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्यामुळे ते द्विधा मन:स्थितीत असल्याने त्यांची चिंता वाढलेली आहे.नवी मुंबईत सर्वाधिक प्रवेश रखडलेआरटीईच्या प्रवेशासाठी नवी मुंबईच्या सर्वाधिक दोन हजार ४५ बालकांची निवड झाली असून ते प्रवेश रखडले आहेत. याखालोखाल ठाणे मनपा २ च्या एक हजार ४७५ तर केडीएमसीच्या एक हजार २0४ बालकांची निवड झाल्याचे व कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा ते नावही पालकांना मेसेजद्वारे कळविण्यात आले आहे. पण कार्यालये सुरू असतानाही या बालकांचे प्रवेश कोरोनाच्या भीतीमुळे रखडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यामध्ये अंबरनाथच्या ९८५ बालकांसह कल्याण ग्रामीणचे ९४७, ठाणे १ च्या ८७४ बालकांचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी १ च्या ७३४, भिवंडी २ चे ३४१, मीरा-भार्इंदरचे १६४, मुरबाडचे ५५, शहापूरचे ३४७ आणि उल्हासनगरच्या १५५ बालकांचे शालेय प्रवेश अद्याप रखडले आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा