शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

आरटीईच्या प्रवेशासाठी ९,३२६ बालकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:16 IST

प्रवेशाअभावी चिंता; प्रक्रिया पूर्ण करण्याची पालकांची मागणी

- सुरेश लोखंडे ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली जिल्ह्यातील नऊ हजार ३२६ बालकांची पहिली ते केजीच्या वर्गासाठी निवड झाली. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या या बालकांना जिल्ह्यातील ६६९ शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. मात्र, संबंधित शाळेत प्रवेशासाठी गेलेल्या या पालकांना सुटीचा बहाणा करून कार्यालयांमध्ये उभेही करीत नसत. पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या बालकांचे रखडलेले प्रवेश करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या खासगी, अनुदानित व विनाअनुदानित ६६९ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात १२ हजार ९१३ बालकांचे शालेय प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी २0 हजार ६६७ अर्ज आले असता त्यातून या नऊ हजार ३२६ विद्यार्थ्यांची पहिल्या लॉटरीद्वारे निवड झाली आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग आदी सर्व प्रवर्गातील निवड झालेल्या या बालकांचे प्रवेश कोरोनाचे संकट आणि शाळांच्या सुटीमुळे रखडले आहेत. परंतु, आता शाळांचे कार्यालयीन कामकाज सुरू असल्यामुळे या बालकांचे प्रवेश सोशल डिस्टन्सद्वारे करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात ११ हजार ५७४ बालकांना तर केजीच्या वर्गात एक हजार ३३९ बालकांचे प्रवेश आरटीईखाली निवड झालेल्या संबंधित शाळांमध्ये राखीव आहेत. या १२ हजार ९१३ राखीव जागांवरील प्रवेशासाठी नऊ हजार ३२६ बालकांची निवड झाली आहे. उर्वरित प्रवेश अर्जातील त्रुटी, अपूर्ण अर्ज, कागदपत्रांची कमतरता आदी कारणांखाली बहुतांश अर्ज बाद ठरले आहेत. मात्र, पात्र ठरलेले व निवड झाल्याचा मेसेज प्राप्त झालेल्या बालकांचे पालक संबंधित शाळांमध्ये सतत फेºया मारत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्यामुळे ते द्विधा मन:स्थितीत असल्याने त्यांची चिंता वाढलेली आहे.नवी मुंबईत सर्वाधिक प्रवेश रखडलेआरटीईच्या प्रवेशासाठी नवी मुंबईच्या सर्वाधिक दोन हजार ४५ बालकांची निवड झाली असून ते प्रवेश रखडले आहेत. याखालोखाल ठाणे मनपा २ च्या एक हजार ४७५ तर केडीएमसीच्या एक हजार २0४ बालकांची निवड झाल्याचे व कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा ते नावही पालकांना मेसेजद्वारे कळविण्यात आले आहे. पण कार्यालये सुरू असतानाही या बालकांचे प्रवेश कोरोनाच्या भीतीमुळे रखडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यामध्ये अंबरनाथच्या ९८५ बालकांसह कल्याण ग्रामीणचे ९४७, ठाणे १ च्या ८७४ बालकांचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी १ च्या ७३४, भिवंडी २ चे ३४१, मीरा-भार्इंदरचे १६४, मुरबाडचे ५५, शहापूरचे ३४७ आणि उल्हासनगरच्या १५५ बालकांचे शालेय प्रवेश अद्याप रखडले आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा