शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

कंत्राटदारांकडून फलक नजरेआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:40 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शहरांतर्गत विकासकामांची माहिती नागरिकांना मिळावी

भार्इंदर: मीरा-भार्इंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शहरांतर्गत विकासकामांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी कंत्राटदारांना कामाच्या ठिकाणी माहितीचे फलक लावण्याचे आदेश २०१६ मध्ये दिले होते. त्याला यंदा कंत्राटदारांनी नजरेआड करून त्यावर प्रशासनही गाफील असल्याचे दिसून येत आहे.शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना मिळावी व त्यांचा विकासकामांवरील विश्वास वाढावा, यासाठी आयुक्तांनी कंत्राटदारांमार्फत कामाची माहिती देणारे फलक लावण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेतला होता. यापूर्वी शहरात अनेक विकासकामे झाली असून काही सुरू आहेत. जी कामे २०१६ पूर्वी झाली, अशा कामांच्या बहुतांश ठिकाणी कंत्राटदारांनी त्या कामांची माहिती देणारे फलक कधीच लावले नाहीत. त्यामुळे त्या कामातील पारदर्शकतेवर नेहमीच संशयाचे वलय निर्माण झाले. शिवाय, त्यावेळी सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणीही मोघम माहितीखेरीज त्या कामांची सविस्तर माहिती देणारे फलक न लावल्याने कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.अशा कामांची माहिती व त्यातील निकृष्ट दर्जाचे प्रमाण वाढल्याचा प्रकार माहिती अधिकार व तक्रारीतून उघड होऊ लागला. यात काहींनी तडजोड करून तक्रारी निकाली काढण्याची प्रथा सुरू ठेवल्याने शहरात निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासह कामांचा पारदर्शीपणा तसेच त्याची सविस्तर माहिती नागरिकांना सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणीच मिळावी, यासाठी तत्कालीन आयुक्तांनी माहिती दर्शवणारे फलक कामाच्या ठिकाणीच लावण्याचा आदेश काढला होता. कंत्राटदाराने तो फलक लावला आहे किंवा नाही, याची शहानिशा संबंधित विभागप्रमुख व भरारी पथकाद्वारे केली जात असे. तर, कामाची पाहणी प्रसंगी थेट आयुक्तांकडून होऊ लागली होती.कामाचे कंत्राट देतानाच त्याच्या कार्यादेशात फलक लावण्याची सक्ती करण्यात आली. काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला प्रशासनाच्याच आदेशानुसार ते फलक काढणे अनिवार्य असल्याचे कार्यादेशात स्पष्ट करण्यात आले. कामाच्या ठिकाणी फलक लावल्याचे छायाचित्र कंत्राटदारांना कामाचे बिल सादर करताना त्यावर चिकटवणे अनिवार्य केले होते. त्यामुळे फलक न लावल्यास तसेच फलक लावल्याचे छायाचित्र बिलावर नसेल तर बिल न देण्याचे आदेश लेखा विभागाला दिले होते. यंदा मात्र कंत्राटदारांनी नजरेआड करून आपले काम पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. तर, कंत्राटदाराच्या या पारदर्शी कारभारावर प्रशासनही गाफील राहिले आहे.