शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

‘सुरक्षा काढणे हे सुडाचे राजकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:55 IST

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष, खासदार राहुल गांधी

ठाणे : देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्या गांधी घराण्याची एसपीजी सुरक्षा काढणे म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे असे सुडाचे राजकारण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. सुडाच्या राजकारणाचा अंत हा नेहमीच वाईट असतो, हा जगाचा इतिहास सत्ताधाऱ्यांनी तपासून पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारने कपात केली आहे. हा निर्णय म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. ज्या सोनिया गांधींनी आपल्या सासूचे पार्थिव आपल्या मांडीवर घेतले. ४६ गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या होत्या. रु ग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. तेव्हा राहुल आणि प्रियंका लहान होते. सहा वर्षांनंतर आपल्या वडिलांचा छिन्नविछिन्न चेहराही ते बघू शकले नाहीत. पतीच्या पार्थिवाचे दर्शनही सोनियांना झाले नाही. राजीव गांधी यांची एवढी निर्घृणपणे हत्या झाली होती. देशाच्या एकात्मतेसाठी गांधी घराण्याने दोन बलिदाने दिली आहेत. त्याच गांधी घराण्याचे सुरक्षाकवच काढणे, हा निव्वळ माणुसकीला अपमानित करणारा संदेश आहे.

असे राजकारण अंतापर्यंत नेतेराजकारणात माणुसकी असावी, मानवी धर्म पाळला जावा; हे साधारण संकेत आहेत. पण, ज्या पद्धतीने भाजप आणि संघ वागते आहे, त्याकडे पाहिल्यावर हे संस्कार आणि संस्कृती नव्हे. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा आजारी पडले, तेव्हा पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी अटलबिहारी यांची भेट घेऊन त्यांना मामा असे संबोधून संसदीय समितीचे प्रमुख बनविले. त्यांना अमेरिकेत पाठवून त्यांच्यावर उपचार करून घेतले. ही संस्कृती ज्या घराण्याने रु जवली, विद्वेष असला तरी मतमतांतरे बाजूला ठेवली.विद्वेष आणणे अयोग्यच्सुसंवाद कायम ठेवला. त्या भारताच्या राजकारणामध्ये इतका टोकाचा विद्वेष आणणे चांगले नाही. सुडाचे राजकारण अंतापर्यंत घेऊन जाते; हा अंत चांगला नसतो, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. अशा प्रकारे सुरक्षा काढणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड