शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

‘सुरक्षा काढणे हे सुडाचे राजकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:55 IST

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष, खासदार राहुल गांधी

ठाणे : देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्या गांधी घराण्याची एसपीजी सुरक्षा काढणे म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे असे सुडाचे राजकारण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. सुडाच्या राजकारणाचा अंत हा नेहमीच वाईट असतो, हा जगाचा इतिहास सत्ताधाऱ्यांनी तपासून पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारने कपात केली आहे. हा निर्णय म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. ज्या सोनिया गांधींनी आपल्या सासूचे पार्थिव आपल्या मांडीवर घेतले. ४६ गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या होत्या. रु ग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. तेव्हा राहुल आणि प्रियंका लहान होते. सहा वर्षांनंतर आपल्या वडिलांचा छिन्नविछिन्न चेहराही ते बघू शकले नाहीत. पतीच्या पार्थिवाचे दर्शनही सोनियांना झाले नाही. राजीव गांधी यांची एवढी निर्घृणपणे हत्या झाली होती. देशाच्या एकात्मतेसाठी गांधी घराण्याने दोन बलिदाने दिली आहेत. त्याच गांधी घराण्याचे सुरक्षाकवच काढणे, हा निव्वळ माणुसकीला अपमानित करणारा संदेश आहे.

असे राजकारण अंतापर्यंत नेतेराजकारणात माणुसकी असावी, मानवी धर्म पाळला जावा; हे साधारण संकेत आहेत. पण, ज्या पद्धतीने भाजप आणि संघ वागते आहे, त्याकडे पाहिल्यावर हे संस्कार आणि संस्कृती नव्हे. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा आजारी पडले, तेव्हा पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी अटलबिहारी यांची भेट घेऊन त्यांना मामा असे संबोधून संसदीय समितीचे प्रमुख बनविले. त्यांना अमेरिकेत पाठवून त्यांच्यावर उपचार करून घेतले. ही संस्कृती ज्या घराण्याने रु जवली, विद्वेष असला तरी मतमतांतरे बाजूला ठेवली.विद्वेष आणणे अयोग्यच्सुसंवाद कायम ठेवला. त्या भारताच्या राजकारणामध्ये इतका टोकाचा विद्वेष आणणे चांगले नाही. सुडाचे राजकारण अंतापर्यंत घेऊन जाते; हा अंत चांगला नसतो, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. अशा प्रकारे सुरक्षा काढणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड