शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

‘सुरक्षा काढणे हे सुडाचे राजकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:55 IST

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष, खासदार राहुल गांधी

ठाणे : देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्या गांधी घराण्याची एसपीजी सुरक्षा काढणे म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे असे सुडाचे राजकारण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. सुडाच्या राजकारणाचा अंत हा नेहमीच वाईट असतो, हा जगाचा इतिहास सत्ताधाऱ्यांनी तपासून पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारने कपात केली आहे. हा निर्णय म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. ज्या सोनिया गांधींनी आपल्या सासूचे पार्थिव आपल्या मांडीवर घेतले. ४६ गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या होत्या. रु ग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. तेव्हा राहुल आणि प्रियंका लहान होते. सहा वर्षांनंतर आपल्या वडिलांचा छिन्नविछिन्न चेहराही ते बघू शकले नाहीत. पतीच्या पार्थिवाचे दर्शनही सोनियांना झाले नाही. राजीव गांधी यांची एवढी निर्घृणपणे हत्या झाली होती. देशाच्या एकात्मतेसाठी गांधी घराण्याने दोन बलिदाने दिली आहेत. त्याच गांधी घराण्याचे सुरक्षाकवच काढणे, हा निव्वळ माणुसकीला अपमानित करणारा संदेश आहे.

असे राजकारण अंतापर्यंत नेतेराजकारणात माणुसकी असावी, मानवी धर्म पाळला जावा; हे साधारण संकेत आहेत. पण, ज्या पद्धतीने भाजप आणि संघ वागते आहे, त्याकडे पाहिल्यावर हे संस्कार आणि संस्कृती नव्हे. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा आजारी पडले, तेव्हा पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी अटलबिहारी यांची भेट घेऊन त्यांना मामा असे संबोधून संसदीय समितीचे प्रमुख बनविले. त्यांना अमेरिकेत पाठवून त्यांच्यावर उपचार करून घेतले. ही संस्कृती ज्या घराण्याने रु जवली, विद्वेष असला तरी मतमतांतरे बाजूला ठेवली.विद्वेष आणणे अयोग्यच्सुसंवाद कायम ठेवला. त्या भारताच्या राजकारणामध्ये इतका टोकाचा विद्वेष आणणे चांगले नाही. सुडाचे राजकारण अंतापर्यंत घेऊन जाते; हा अंत चांगला नसतो, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. अशा प्रकारे सुरक्षा काढणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड