शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

केडीएमटीच्या आगारांची सुरक्षा सुविधांअभावी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

डोंबिवली : केडीएमटी उपक्रमाचे प्रमुख संचलन चालणाऱ्या गणेशघाट आगारातील संरक्षक भिंती कोसळल्यामुळे तेथील सुरक्षा धोक्यात आली असताना वसंत व्हॅलीतील ...

डोंबिवली : केडीएमटी उपक्रमाचे प्रमुख संचलन चालणाऱ्या गणेशघाट आगारातील संरक्षक भिंती कोसळल्यामुळे तेथील सुरक्षा धोक्यात आली असताना वसंत व्हॅलीतील स्व. बाळासाहेब ठाकरे आगार आणि डोंबिवलीतील खंबाळपाडा आगाराची स्थिती फारशी वेगळी नाही. या आगारांकडे पूर्णत: कानाडोळा झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. सातत्याने चोरीच्या घटना घडूनही तेथे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सुविधांअभावी सुरक्षा राखायची तरी कशी, असा प्रश्न तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

खंबाळपाडा परिसरात केडीएमटीच्या आगारासाठी आरक्षित जागा आहे. तेथे केडीएमटीच्या बस उभ्या करण्याचे आणि डिझेल पंप उभारण्याचे प्रस्तावित होते. डोंबिवलीतील बसचे संचलन या आगारातून करण्याचे नियोजनही करण्याचे ठरविण्यात आले होते; परंतु या जागेवर काही वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोठ्या आरसी आणि घंटागाड्या, अशा २०० हून अधिक कचऱ्याच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. कल्याण पूर्वेतील तीन प्रभागांमध्ये कचरा उचलणाऱ्या, डोंबिवलीच्या चार प्रभागांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या येथे उभ्या केल्या जातात.

दरम्यान, आगारात पुरेसे विद्युत दिवे नाहीत. प्रवेशद्वारावरच केवळ बल्ब लावला आहे. त्यात आगारातील बहुतांश ठिकाणी संरक्षक भिंती पडल्याने सुरक्षा राखणे येथील सुरक्षारक्षकांना जिकिरीचे होऊन बसते. याठिकाणी प्रसाधनगृहांची सुविधा नसल्याने सुरक्षारक्षकांसह कचऱ्याच्या गाड्यांवरील चालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कार्यशाळेसाठीदेखील सुसज्ज कार्यालय नसल्याने उघड्यावर गाड्या दुरुस्त कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात दुरुस्तीचे काम करताना तारेवरची कसरत कामगारांना करावी लागत आहे.

------------------------------------------------

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराचीही दुरवस्था

कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराकडेही प्रशासनाकडे दुर्लक्ष झाल्याने आगार दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहे. परिवहन उपक्रमात बस वाढत असताना या आगारातून बसचे संचलन व्हावे, यासाठी हा आगार बांधण्यात आला; परंतु मूळ उद्देशाचा प्रशासनाला विसर पडला आहे. याठिकाणी भंगार अवस्थेतील बस उभ्या करण्यात आल्या आहेत, तसेच आगारात रानही मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यात सापांचा वावर वाढल्याने येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

-----------------------