शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
3
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
4
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
5
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
6
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
7
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
8
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
9
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
10
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
11
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
12
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
13
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
14
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
15
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
16
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
17
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
18
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
19
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
20
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान

केडीएमटीच्या आगारांची सुरक्षा सुविधांअभावी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

डोंबिवली : केडीएमटी उपक्रमाचे प्रमुख संचलन चालणाऱ्या गणेशघाट आगारातील संरक्षक भिंती कोसळल्यामुळे तेथील सुरक्षा धोक्यात आली असताना वसंत व्हॅलीतील ...

डोंबिवली : केडीएमटी उपक्रमाचे प्रमुख संचलन चालणाऱ्या गणेशघाट आगारातील संरक्षक भिंती कोसळल्यामुळे तेथील सुरक्षा धोक्यात आली असताना वसंत व्हॅलीतील स्व. बाळासाहेब ठाकरे आगार आणि डोंबिवलीतील खंबाळपाडा आगाराची स्थिती फारशी वेगळी नाही. या आगारांकडे पूर्णत: कानाडोळा झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. सातत्याने चोरीच्या घटना घडूनही तेथे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सुविधांअभावी सुरक्षा राखायची तरी कशी, असा प्रश्न तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

खंबाळपाडा परिसरात केडीएमटीच्या आगारासाठी आरक्षित जागा आहे. तेथे केडीएमटीच्या बस उभ्या करण्याचे आणि डिझेल पंप उभारण्याचे प्रस्तावित होते. डोंबिवलीतील बसचे संचलन या आगारातून करण्याचे नियोजनही करण्याचे ठरविण्यात आले होते; परंतु या जागेवर काही वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोठ्या आरसी आणि घंटागाड्या, अशा २०० हून अधिक कचऱ्याच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. कल्याण पूर्वेतील तीन प्रभागांमध्ये कचरा उचलणाऱ्या, डोंबिवलीच्या चार प्रभागांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या येथे उभ्या केल्या जातात.

दरम्यान, आगारात पुरेसे विद्युत दिवे नाहीत. प्रवेशद्वारावरच केवळ बल्ब लावला आहे. त्यात आगारातील बहुतांश ठिकाणी संरक्षक भिंती पडल्याने सुरक्षा राखणे येथील सुरक्षारक्षकांना जिकिरीचे होऊन बसते. याठिकाणी प्रसाधनगृहांची सुविधा नसल्याने सुरक्षारक्षकांसह कचऱ्याच्या गाड्यांवरील चालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कार्यशाळेसाठीदेखील सुसज्ज कार्यालय नसल्याने उघड्यावर गाड्या दुरुस्त कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात दुरुस्तीचे काम करताना तारेवरची कसरत कामगारांना करावी लागत आहे.

------------------------------------------------

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराचीही दुरवस्था

कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराकडेही प्रशासनाकडे दुर्लक्ष झाल्याने आगार दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहे. परिवहन उपक्रमात बस वाढत असताना या आगारातून बसचे संचलन व्हावे, यासाठी हा आगार बांधण्यात आला; परंतु मूळ उद्देशाचा प्रशासनाला विसर पडला आहे. याठिकाणी भंगार अवस्थेतील बस उभ्या करण्यात आल्या आहेत, तसेच आगारात रानही मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यात सापांचा वावर वाढल्याने येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

-----------------------