शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा

By जितेंद्र कालेकर | Updated: May 27, 2024 06:52 IST

ठाण्यातही राजकोटसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: उन्हाळी सुटीसाठी ठाण्यातील शिवाजी मैदानात सध्या ठाणे कार्निव्हल भरविले आहे. त्यासाठी सशुल्क प्रवेश देण्यात येत असून खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल व खेळण्यांची रेलचेल आहे.  एकाचवेळी १०० ते १५० नागरिकांची गर्दी होणाऱ्या या गेमिंग झोनमधील तुटपुुंजी अग्निरोधक यंत्रणा तर आहेच शिवाय आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी मार्गही अपुरे आहेत. 

राजकोटमधील गेमिंग झोनच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेमुळे जत्रेतील मोठे पाळणे आणि सुरक्षेचा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. जांभळी नाका येथे ८ जूनपर्यंत हा मेळा सुरू राहणार आहे. याठिकाणी १० ते १५ विविध विक्रीचे स्टॉल आहेत. ३४ फुटी उंच पाळणा आहे.  सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत भरणाऱ्या या मेळ्याला मोठी गर्दी होते.  

मेळ्याच्या ठिकाणी सात ते दहा अग्निरोधक बाटले आहेत. परंतु, ते धूळ खात आहेत. याठिकाणी असलेल्या संतोष सिंग या कर्मचाऱ्याच्या  माहितीनुसार प्रत्येक पाळणा आणि खेळण्याच्या ठिकाणी हे अग्निरोधक बाटले मेळा सुरू झाल्यानंतर ठेवले जातात. मेळ्यात जाण्यासाठी एकच मोठा मार्ग आहे. त्याच मार्गाने ग्राहक बाहेर पडतात. मात्र, बाहेर जाण्यासाठी दोन अन्यही मार्ग असून त्यातील एक लहान तर दुसऱ्या मार्गाच्या दरवाजाला कुलूप लावले आहे. तो मार्गही ऐनवेळी खुला केला जातो, असा दावा एका कर्मचाऱ्याने केला. मात्र, खाद्यपदार्थ व इतर स्टॉलनजीक अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे आढळले. त्यामुळे ठाण्यातही राजकोटसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

मुंबईत काय स्थिती?

मुंबई : मुंबईतील प्रत्येक बड्या मॉलमध्ये गेमिंग झोन आहे. सुटीच्या दिवशी चिमुकल्यांना घेऊन गेमिंग झोनकडे पालकांचा ओढा असतो. मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी सर्वांना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होते की नाही? हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, पालिका, अग्निशमन दल यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनीही परवानगी देताना सर्व बाबी पडताळायला हवे, असेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईfireआग