शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

३२ ऐवजी १४ प्रवाशांसाठीच आसनव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:41 IST

मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतीच काही उपनगरीय लोकल डब्यांमधील आसनव्यवस्था बदलली. मात्र, यामुळे अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा या लांबच्या अंतरावरून

डोंबिवली : मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतीच काही उपनगरीय लोकल डब्यांमधील आसनव्यवस्था बदलली. मात्र, यामुळे अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा या लांबच्या अंतरावरून येणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्याने आता डब्यात केवळ १४ च प्रवासी बसू शकतात.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना सुरुवातीपासूनच ठाणे - कल्याण पुढे आपल्या इच्छित स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी उभे राहूनच प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सीएसएमटी येथून निघालेल्या लोकलमध्ये अभावानेच प्रवासी घाटकोपर, ठाणे स्थानकादरम्यान सहप्रवाशांना जागा देतात. अन्यथा प्रवाशांना अडीच ते तीन तास उभ्यानेच प्रवास करावा लागत असल्याची खंत कर्जत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर गंगावणे यांनी व्यक्त केली. असा ताटकळत प्रवास करावा लागत असेल, तर हजारो प्रवाशांना अल्पावधीतच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल. याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा आणि तातडीने बदल करावा असेही ते म्हणाले.ज्या लोकलची आसनव्यवस्था कमी केली आहे, त्या सर्व उपनगरीय लोकल या केवळ कमी अंतरावरील प्रवासासाठीच चालवाव्यात. सीएसएमटी-कुर्ला मार्गावर तसेच कुर्ला - ठाणे मार्गावर अशा लोकल सोडल्यास प्रवाशांची फारशी गैरसोय होणार नाही, पण कर्जत-कसारा पर्यंत असा प्रवास करणे त्रासाचे आहे.