शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

११ हजार विद्यार्थ्यांपुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:21 IST

इयत्ता बारावीचा निकाल आॅनलाइनद्वारे जाहीर होताच प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

जान्हवी मोर्येडोंबिवली : इयत्ता बारावीचा निकाल आॅनलाइनद्वारे जाहीर होताच प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातून बारावीचे १७ हजार २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु, प्रथम वर्षासाठी महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या केवळ सहा हजार ०९५ जागाच उपलब्ध आहेत. त्यामुळे उर्वरित ११ हजार १३१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे.कल्याण-डोंबिवलीत प्रगती, मॉडेल, पेंढरकर, मंजुनाथ, बिर्ला, अग्रवाल, सोनावणे, मुथा ही वरिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या व्यतिरिक्त बॅकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, बीएमएस, बीएमएम, आयटी, कॉम्प्युटर सायन्स आदी विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. कनिष्ठ महाविद्यालये जास्त असली तरी येथे पदवीच्या शिक्षणासाठी तितकी महाविद्यालये नाहीत. मोठ्या संख्येने उत्तीर्ण होणारे बारावीचे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमधील मर्यादित जागा, यामुळे प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे. परिणामी १७ हजार विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळणे कठीण आहे.प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार, जेथे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये एकत्र आहेत, तेथे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयात प्राधानान्ये प्रवेश मिळतो. परंतु, एखादा विद्यार्थी कल्याणच्या कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेला असल्यास त्याला डोंबिवलीतील वरिष्ठ महाविद्यालयात आॅनलाइन प्रक्रियेनुसार गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत आसपासच्या ३० महाविद्यालयांचा पर्याय व नावे सूचविण्याची अट होती. यंदाच्या वर्षी १० महाविद्यालयांची नावे सुचवता येणार आहेत.काही विद्यार्थी उल्हासनगरातील चांदीबाई, आर. के. तलरेजा कॉलेज, ठाण्यातील बांदोडकर, मुलुंडमधील वझे-केळकर व काही मुंबईतील महाविद्यालयांची नावे सुचवू शकतात. सगळेच विद्यार्थी हे कल्याण-डोंबिवलीतील महाविद्यालयांना पसंती देतीलच असे नाही. याशिवाय कर्जत, नेरळ, खोपोली, आसनगाव तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वाशी येथील महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रम व इंजिनिअरींगलाही काही विद्यार्थी पसंती देऊ शकतात. त्यामुळे ११ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईलच असे नाही, असे महाविद्यालयांतील सूत्रांनी सांगितले.सोनावणे कॉलेजचे उपप्राचार्य अशोक पडवेकर म्हणाले, कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. ठाणे विभागात तीन-चार वर्षांपासून हे दिसत असून, त्याचे नेमके कारण समजत नाही. यंदा निकाल मागच्या वर्षांच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढला आहे. कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आणि जागा कमी असल्याने या शाखेत प्रवेशासाठी चुरस जास्त असणार आहे. कला शाखेच्या शिक्षणाचा टक्का घसरला आहे, तर अन्य अभ्यासक्रमांकडे तो वाढतो आहे.मुथा कॉलेजच्या प्राचार्या श्रुती वाईकर म्हणाल्या, यंदाच्या वर्षी निकाल चांगला लागला आहे. त्यामुळे अ‍ॅडमिशन फुल्ल होणार आहेत. विद्यार्थ्यांचा कल हा व्यवसायिक अभ्यासक्रमांकडे जास्त असतो. महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागा मागील वर्षीप्रमाणे असून त्यात कोणताही बदल झाला नाही.पेंढरकर कॉलेज, डोंबिवलीकला- २४०(मराठी), १२० (इंग्रजी), वाणिज्य-४८०, विज्ञान- १२०, बीएससी कॉम्युटर सायन्स- ६०, बीएससी बायोटेक- ३५, बीएससी आयटी- ६०, बीएमएस- १२०, अकाउण्ट अ‍ॅण्ड फायनान्स- १२०, बॅकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स- १२०.बिर्ला कॉलेज, कल्याणवाणिज्य- ६००, बीएससी- २४०, कला- ३६०, बीएससी कॉम्प्युटर सायन्स- ७२, आयटी- १२०, बीएमएस- १८०, मॅनेजमेंट अ‍ॅण्डस्टीडज् - १२० ,अकाउण्ट अ‍ॅण्ड फायनान्स- १२०मुथा कॉलेज कल्याणकला-१२० (मराठीमाध्यम), वाणिज्य- २४०, विज्ञान- १२०, बीएमएस-६०, बॅकिंग इन्शुरन्स-६०,कॉम्युटर सायन्स - ६०, आयटी-६०प्रगती कॉलेज, डोंबिवलीकला-१२०, वाणिज्य-२४०, बीएमएस-६०, बँकिंग आणि इन्शुरन्स-६०, बीएस्सी आयटी-६०सोनावणे कॉलेज, कल्याणकला-२४० (मराठी माध्यम), वाणिज्य-६००, विज्ञान-१२०, बीएमएस-१२०, बीएस्सी आयटी-१२०, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स-४८