शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

जल दिन अध्यादेशाबाबत शाळा अनभिज्ञ

By admin | Updated: March 15, 2016 01:13 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये २२ मार्चला जलदिन साजरा करण्याचे

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीराज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये २२ मार्चला जलदिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या दिनानिमित्त १६ ते २२ मार्च हा जल जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा अध्यादेश सरकारने ९ मार्चला काढला आहे. मात्र, तो अनेक शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे हा दिन साजरा होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.डोंबिवलीतील स.वा. जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब डावणे यांनी सांगितले की, पाणी वाचवाचे धडे आम्ही विद्यार्थ्यांना कार्यानुभव विषयाद्वारे देतो. सरकारने जल दिन साजरा करण्याबाबत काढलेला अध्यादेश आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पाणीवापराविषयी जागृती हा महत्त्वाचा विषय आहे. पाणीकपातीचा फटका आमच्या शाळेला बसत आहे. नुकतेच आठ दिवस शाळेत पाणी आले नव्हते, असे ते म्हणाले.कल्याणमधील द्वारका विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मीरा दळवी म्हणाल्या की, जलदिनाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची काहीच माहीत नाही. आंबिवलीतील पाटील बाल विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका मीना राणे यांनीही शासनाचा जीआर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. सरकारी अध्यादेशापूर्वीच आमच्या शाळेने १ जानेवारीला जलजागृतीचा प्रयत्न केला. केवळ कागदी घोडे १६ मार्चपासून जल दिन साजरा करायचा आहे. त्यासाठी १६ ते २२ मार्चदरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. तो किमान १० दिवसअगोदर शाळांना मिळणे आवश्यक होते. शिक्षण विभागाची जलदिनाची जागृती ही अध्यादेश काढून केवळ कागदी घोडे नाचवण्यापुरतीच होती, अशी टीका जाणकारांकडून होत आहे. तसेच परीक्षांच्या काळात हा दिवस कसा साजरा करणार, असा सवालही त्यांच्याकडून विचारला जात आहे.चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्याने घेण्याचे आदेशजलजागृती सप्ताहात विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषण, पाण्याची गुणवत्ता व जलसाक्षरता याबाबत जागृती करण्यासाठी शालेयस्तरावर चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्यान, वक्तृत्व, शालेय सहली, प्रदर्शन आदी उपक्रम राबवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागातर्फे दिले आहेत.अधिकृत माहिती नाहीसम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले की, सरकारी अध्यादेश व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मला मिळाला आहे. परंतु, अधिकृत माहिती शिक्षण विभागाकडून शाळेपर्यंत पोहोचलेली नाही. सरकारचा उद्देश खूप चांगला आहे. ९ मार्चला काढलेला जीआर आमच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. तो का पोहोचला नाही, याविषयी काहीच सांगता येणार नाही. आमच्या शाळेने पाणी वाचवाचा संदेश देण्यासाठी काही दिवसांपूर्वी पथनाट्य सादर केले होते.