शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जल दिन अध्यादेशाबाबत शाळा अनभिज्ञ

By admin | Updated: March 15, 2016 01:13 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये २२ मार्चला जलदिन साजरा करण्याचे

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीराज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये २२ मार्चला जलदिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या दिनानिमित्त १६ ते २२ मार्च हा जल जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा अध्यादेश सरकारने ९ मार्चला काढला आहे. मात्र, तो अनेक शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे हा दिन साजरा होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.डोंबिवलीतील स.वा. जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब डावणे यांनी सांगितले की, पाणी वाचवाचे धडे आम्ही विद्यार्थ्यांना कार्यानुभव विषयाद्वारे देतो. सरकारने जल दिन साजरा करण्याबाबत काढलेला अध्यादेश आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पाणीवापराविषयी जागृती हा महत्त्वाचा विषय आहे. पाणीकपातीचा फटका आमच्या शाळेला बसत आहे. नुकतेच आठ दिवस शाळेत पाणी आले नव्हते, असे ते म्हणाले.कल्याणमधील द्वारका विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मीरा दळवी म्हणाल्या की, जलदिनाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची काहीच माहीत नाही. आंबिवलीतील पाटील बाल विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका मीना राणे यांनीही शासनाचा जीआर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. सरकारी अध्यादेशापूर्वीच आमच्या शाळेने १ जानेवारीला जलजागृतीचा प्रयत्न केला. केवळ कागदी घोडे १६ मार्चपासून जल दिन साजरा करायचा आहे. त्यासाठी १६ ते २२ मार्चदरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. तो किमान १० दिवसअगोदर शाळांना मिळणे आवश्यक होते. शिक्षण विभागाची जलदिनाची जागृती ही अध्यादेश काढून केवळ कागदी घोडे नाचवण्यापुरतीच होती, अशी टीका जाणकारांकडून होत आहे. तसेच परीक्षांच्या काळात हा दिवस कसा साजरा करणार, असा सवालही त्यांच्याकडून विचारला जात आहे.चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्याने घेण्याचे आदेशजलजागृती सप्ताहात विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषण, पाण्याची गुणवत्ता व जलसाक्षरता याबाबत जागृती करण्यासाठी शालेयस्तरावर चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्यान, वक्तृत्व, शालेय सहली, प्रदर्शन आदी उपक्रम राबवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागातर्फे दिले आहेत.अधिकृत माहिती नाहीसम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले की, सरकारी अध्यादेश व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मला मिळाला आहे. परंतु, अधिकृत माहिती शिक्षण विभागाकडून शाळेपर्यंत पोहोचलेली नाही. सरकारचा उद्देश खूप चांगला आहे. ९ मार्चला काढलेला जीआर आमच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. तो का पोहोचला नाही, याविषयी काहीच सांगता येणार नाही. आमच्या शाळेने पाणी वाचवाचा संदेश देण्यासाठी काही दिवसांपूर्वी पथनाट्य सादर केले होते.