शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जल दिन अध्यादेशाबाबत शाळा अनभिज्ञ

By admin | Updated: March 15, 2016 01:13 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये २२ मार्चला जलदिन साजरा करण्याचे

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीराज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये २२ मार्चला जलदिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या दिनानिमित्त १६ ते २२ मार्च हा जल जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा अध्यादेश सरकारने ९ मार्चला काढला आहे. मात्र, तो अनेक शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे हा दिन साजरा होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.डोंबिवलीतील स.वा. जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब डावणे यांनी सांगितले की, पाणी वाचवाचे धडे आम्ही विद्यार्थ्यांना कार्यानुभव विषयाद्वारे देतो. सरकारने जल दिन साजरा करण्याबाबत काढलेला अध्यादेश आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पाणीवापराविषयी जागृती हा महत्त्वाचा विषय आहे. पाणीकपातीचा फटका आमच्या शाळेला बसत आहे. नुकतेच आठ दिवस शाळेत पाणी आले नव्हते, असे ते म्हणाले.कल्याणमधील द्वारका विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मीरा दळवी म्हणाल्या की, जलदिनाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची काहीच माहीत नाही. आंबिवलीतील पाटील बाल विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका मीना राणे यांनीही शासनाचा जीआर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. सरकारी अध्यादेशापूर्वीच आमच्या शाळेने १ जानेवारीला जलजागृतीचा प्रयत्न केला. केवळ कागदी घोडे १६ मार्चपासून जल दिन साजरा करायचा आहे. त्यासाठी १६ ते २२ मार्चदरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. तो किमान १० दिवसअगोदर शाळांना मिळणे आवश्यक होते. शिक्षण विभागाची जलदिनाची जागृती ही अध्यादेश काढून केवळ कागदी घोडे नाचवण्यापुरतीच होती, अशी टीका जाणकारांकडून होत आहे. तसेच परीक्षांच्या काळात हा दिवस कसा साजरा करणार, असा सवालही त्यांच्याकडून विचारला जात आहे.चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्याने घेण्याचे आदेशजलजागृती सप्ताहात विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषण, पाण्याची गुणवत्ता व जलसाक्षरता याबाबत जागृती करण्यासाठी शालेयस्तरावर चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्यान, वक्तृत्व, शालेय सहली, प्रदर्शन आदी उपक्रम राबवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागातर्फे दिले आहेत.अधिकृत माहिती नाहीसम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले की, सरकारी अध्यादेश व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मला मिळाला आहे. परंतु, अधिकृत माहिती शिक्षण विभागाकडून शाळेपर्यंत पोहोचलेली नाही. सरकारचा उद्देश खूप चांगला आहे. ९ मार्चला काढलेला जीआर आमच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. तो का पोहोचला नाही, याविषयी काहीच सांगता येणार नाही. आमच्या शाळेने पाणी वाचवाचा संदेश देण्यासाठी काही दिवसांपूर्वी पथनाट्य सादर केले होते.